निखिल वागळेंची पत्रकारिता?

निखिल वागळेंना मी जेव्हा पासून पाहतोय, वाचतोय तेव्हांपासून मला ते "क्वचितच" कधीतरी निःपक्षपाती वाटले. काही ठराविक लोकांबद्दल ते नेहमीच पुर्वग्रहदोषानेच आणि राजकीय हेकेखोरपणे बोलतात. सामनाही निःपक्षपाती नाही पण तो तसे असल्याची खोटी भूलही देत नाही.
.
काल निखिल वागळेंवर झालेला हल्ला (जो कधीतरी होणारच हे पक्के होते) हा समस्त त्या जातीच्या प्रत्रकारितेवर झालेला हल्ला होता, जी पत्रकारिता तोंडपाटीलकी करत आपलीच सत्ता चालवू पाहते. सातत्याने एकालाच टीकेचे लक्ष करते, ठराविक पक्षाला झुकते माप आणि एखाद्या पक्षाचा द्वेष. बातमीचे, एखाद्या घटनेचे यथार्थ(जसेच्या तसे) वर्णन देतानाही स्वतःच्या मनाचे कलुषित रंग त्यात "बेमालुमपणे" मिसळूनच दिली जाते. विश्लेषण, विवेचन, निष्कर्ष, उपाय सारं काही हेच करून मोकळे होतात. जनता फक्त पाहतच राहते. जनतेच्या रोजच्या जेवणात हळूहळू पण सातत्याने हा विष प्रयोग केला जातो आहे. स्वतःला "बुद्धिजीवी" आणि "निःपक्षपाती" म्हणवून घेणाऱ्या ढोंग्या पत्रकारांनी हे ध्यानी टेवावे. इतके दिवस वागळे सेना, भाजपा, बालासाहेब, मनसे, उद्धव, राज यांच्यावर हल्ला करत होते, काल सेनेने वागळेंवर हल्ला केला. वागळेंनी दूषित शब्दांनी हल्ला केला तर सेनेनं काठ्यांनी.
.
माझी ही ९ वी वेल आहे मार खाण्याचे असे ते गौरवाने सांगत होते, प्रत्येक वेळी आपलीच "धुलाई" का होते ह्याचा त्यांनी जरा "मी" पणाच्या बाहेर येऊन विचार करायला हवाच. पत्रकारिता म्हंजे खूप सोज्वळ मार्ग आहे असे आजचे चित्र बिलकुल नाही, पेड पत्रकारिता हा यांचा पैसा कमाविण्याचा सोपा मार्ग. पैसे घेऊन हे एखाद्याला प्रतिष्ठित बनवून जनतेपुढे पेश करतात तर एखाद्याला प्रतिष्ठितावर चिखल फेक करतात. पुढारीच काय पण पोलिसाकडूनही बंद पाकिटं घेणारे चालू पत्रकारही मी पाहिलेत. आम्ही म्हंजे स्वच्छ, आम्ही म्हणजे लोकशाहीचा ४था स्तंभ, म्हणत यांची मिलिभगत चालू असते. त्यांच्या विरुद्ध आवाज उठविला की सारे "स्वातंत्र्य" नावाखाली एकवटतात. वागळेंनी तर सरळ मुख्यमंत्र्यांना "राजकीय" दम भरला आहे की राऊतांना अटक करा नाही तर मी याला राष्टिय नाही तर आंतरराष्टीय इश्यू बनवील.
मराठी संपादकावर हल्ला, मराठी वाहिनीवर हल्ला, मराठी पत्रकार, मराठी केमेरामन, मराठी रिसेस्पशनिष्टवर हल्ला असं वारंवार ओरडून ते "हा हल्ला मराठी माणसावर आहे" असे काहीतरी "भासवत" होते ... ढोंगी पत्रकारिता म्हणतात ति हिच.
.
वागळेने त्याच्या पत्रकारांना चिथवणी दिली आणि नतर त्यांनी काही शिवसैनिकांना मारहाणही केली.
सेनेला हिंसावादी आणि स्वतःला वागळे अहिंसावादी म्हणवितात ना मग एका गालात मारली तर त्यांनी दुसरा गाल पुढे करायला हवा होता. याउलट ते आपल्या कामगारांनी शिवसैनिकांना मारून जश्यांस तसे उत्तर दिले हे अभिमानाने सांगत होते. याचा अर्थ इतर र्वेळी जे स्वतःकडे गांधीजीच्या तत्त्वाची मक्ते दारी घेतात आणि तोंडपाटीलकी करतात, तेच खरे ढोंगी आहेत..
.
.
सचिन, नारायणगांव, पुणे, २३/११/२००९.

5 प्रतिक्रया:

Unknown ने कहा…

csa

Harshal ने कहा…

तुमचे म्हणणे पुरेपुर पटले. असे विचार करणारे फारच कमी आहेत. Good Job

विक्रम एक शांत वादळ ने कहा…

मला निखील वागळे पत्रकारच वाटत नाहीत.
मस्त लिहिले आहेस रे

बेनामी ने कहा…

Vatvagle gang asa sena mhanate te khota nahi
wagle raj thackeray la motha karto tyache godve gato raj chya sabha live dakhavato varti nivadnukichya tondavar raj cha sasra aslyagat tyachech gungan karto pan ya waglya kade kashimara apla sainik shahid zala te lokana sangnyas puresa wel nasto
ha wagle marathicha mudda nako titka lavun dharato
pan deshat kay chalaley he sanganarya rashtriya batmya chimutbhar velet sangato
yacha ibn var batmya kami ani jahiratich jast asatat(yasathi kadhitar ratri 9 che prime time bagha)
nikhil wagle and company sara maharashtra convet school che vidyarthi aslyagat batmya sangata
tyachya bolanyat nimmi englishach asate
wagle nirbhid mhanavato mag pawar-sule gand che ghotale ka lavun dharat nay
sena yala adhun madhun Lagte te yogya ahe ka ashi ata shanka yete
wagle janate vishayi aapnala khup chinta ahe mhanato mag rahatana matra engraji Sayeba sarkha rahato var koni asa mhanala tar mhanato Tumhala maza etihas mahi nay mhanun tumi asa mhanata
are nikku apla etihas jari changla asala tari bhugol changla thevlyashivay pas hota yet nay
-subhash

सुभाष ने कहा…

वागळे जर नि:पक्षपाती पत्रकार असेल तर त्याने दर्डाशेठ चा लोकमत सोडावा स्वत:ची वाहिनी काढून मनसोक्त हात हालवून बातम्या सांगाव्या
आणि राजचं मन लावून इंग्रजी मिश्रीत मराठीत कवतिक करावं
-सुभाष

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..