<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249</id><updated>2012-02-16T18:15:55.109-08:00</updated><category term='तेजाचा उत्सव'/><category term='ठोसेघर'/><category term='शिवधर्म'/><category term='जुन्नर'/><category term='रिडालोस'/><category term='Adhalrao'/><category term='परमात्मा'/><category term='२००९'/><category term='शेतकरी'/><category term='शरद पवार'/><category term='नववर्ष'/><category term='संभाजी महाराज'/><category term='IBN लोकमत'/><category term='shirur'/><category term='निखिल वागळे'/><category term='julai'/><category term='आधार'/><category term='valase'/><category term='तुकाराम'/><category term='khed'/><category term='आघाडी'/><category term='नारायणगांव'/><category term='गणी'/><category term='junner'/><category term='ambegaon'/><category term='जाहीरनामा'/><category term='farmer'/><category term='देहू'/><category term='सरलष्कर'/><category term='सत्य'/><category term='नील'/><category term='कल्पी'/><category term='महागाई'/><category term='वैदिक'/><category term='राष्टवादी'/><category term='साखर'/><category term='ज्योतिषी'/><category term='म्हलोजी घोरपडे'/><category term='कास'/><category term='doha'/><category term='राजकारण'/><category term='कबीर'/><category term='मुंडण'/><category term='विदर्भ'/><category term='लोकप्रतिनिधी'/><category term='स्वप्न'/><category term='यज्ञ'/><category term='सुप्रियाताई'/><category term='चक्की'/><category term='पुढारी'/><category term='chakki'/><category term='दोहा'/><category term='विधानसभा'/><category term='Nilu Phule'/><category term='महाराष्ट'/><category term='suicide'/><category term='satara'/><category term='आत्महत्या'/><category term='निळोबाराय'/><category term='kas'/><category term='बळी'/><category term='Shivaji'/><category term='sachin gandhul'/><category term='Marathi'/><category term='narayangaon'/><category term='Kabir'/><title type='text'>"पाचोळा"</title><subtitle type='html'>मी अगदीच साळसूद,माझे विचारही वैरणीतूनही शिल्लक राहिलेल्या पाचोळ्या सारखेच. अस्सेच मनात पडून राहिले तर त्यांचा कचरा व्हायला कितीसा वेळ?.  पाचोळाही जपायला हवा, आणि म्हुणूनच ही "पाचोळ्या"ची सुडी रचतोय मी.</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>34</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-814582930104458564</id><published>2011-03-12T06:15:00.000-08:00</published><updated>2011-03-12T06:15:39.022-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शिवधर्म'/><title type='text'>नवा शिवधर्म शक्य आहे का?</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;कुठल्याही धर्माच्या निर्मितीसाठी जे वैचारिक अधिष्ठान, भक्कम पाया असायला हवा तो इथे कुठेच नाही. इतर धर्मातून आयात केलेले विचार, एका धर्माच्या द्वेषापोटी दुसरा धर्म अस्या विचारांची रसमिसाळ करून धर्म स्थापला जाऊ शकतो पण तो रुजवला जाऊ शकत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;धर्मनिर्मीती/स्थापना हि संकल्पनाच पुरातन आणि संक्रमणशील आहे, धर्मनिर्मितीची कल्पना जेव्हा हजारो वर्षापूर्वी धर्माच अस्तित्व नव्हतं तेव्हाच गरजेपोटी उत्पन्न झाली होती, तो काळ त्यास पूरक होता. आजचा काळ "धर्म निर्मिती" स पूरक तर नाहीच, शिवाय नवीन कुठलासा धर्म निर्माण केल्या शिवाय आपण जगूच शकणार नाही असे धर्माचे अवडंबर आज गरजेचेही नाही. धर्मविचार, धर्मसंस्कृति हळू हळू मागे पडत आहे, नावापुरता फक्त धर्माभिमान तेवढा शिल्लक आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;धर्म स्थापणे हि पुरातन आणि अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणूनच हि मंडळी "शिवधर्म स्थापणा" न म्हणता मुद्दामहून "शिवधर्म प्रकटणं" असे संबोधतात, म्हंजे हाही धर्म पुरातनच आहे, तो फक्त पुन्हा प्रकट होतो आहे असा भ्रम देऊ पाहत आहेत. कारण पुरातन असल्याशिवाय धर्मांबद्दल ओढ, आपुलकी निर्माण होणे सहज शक्य नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;धर्मांतर, धर्मनिर्मीती किंवा तत्सम प्रकटीकरणात जितकी ऊर्जा वाया जाईल ति ऊर्जा आहे ति धर्म सुधारण्यात खर्ची घातली तर उपयुक्त ठरले. पण तसे केले जात नाही करणं त्या मागे काही "धार्मिक आणि राजकीय गणिते" नक्की जुळविलेली आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवधर्माने मांडलेल्या तत्त्वांचा लेखाजोखा करायचा म्हटला तरी त्यात कैक न पटणारे विचार आढळतात. शिवधर्माचे जे स्वताचे पुरोगामी विचार आहेत ते या जागतिक उदारीकरणाच्या या जगात ते पुरातनच वाटताहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवधर्माची घोषणा होवून आठ वर्षे तरी नक्की झाली असतील, दरवर्षी लाखो लोक धर्मात येताहेत असे भासवले जात होते. आज किती जन या धर्माचे अनुयायी झाले आहेत हे कळेल काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;साळसूद पाचोळा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-814582930104458564?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/814582930104458564/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2011/03/blog-post.html#comment-form' title='2 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/814582930104458564'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/814582930104458564'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2011/03/blog-post.html' title='नवा शिवधर्म शक्य आहे का?'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-8331799179264948111</id><published>2010-12-13T07:53:00.000-08:00</published><updated>2010-12-13T07:54:26.019-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वैदिक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='बळी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='यज्ञ'/><title type='text'>वैदिक यज्ञबळी</title><content type='html'>महाराजा बळी ने यज्ञ केले होते, म्हंजे तोही वैदिकच होता. इतर असुरांप्रमाणे तोही शिवाचा उपासकच होता. आता महाराजा असलेल्या बळीला यज्ञ बळजबरीने "करायला" लावले हे म्हणणे कितीसे पटू शकते....वैदिक लोकांनी सांगितले आणि पटत नसतानाही बळिराजेने ते एकले असे म्हणायचे आहे काय? महाराजा पेक्षा त्याकाळचे वैदिक उपासक मोठे होते काय?. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि हो, यज्ञात प्राण्यांची आहुती द्या, असे नसून आपण जे काही अन्न म्हणून भक्षण करतो त्यातला काही भाग देवासही द्या हि संकल्पना आहे ति. &lt;br /&gt;रानटी अवस्थेत राहणाऱ्या समाजाचे सिव्हिलायझेशन करण्याची ती प्रक्रिया होती. नरभक्षण करणाऱ्या समाजाला हळूहळू वनस्पती भक्षणाकडे आणण्याची ति प्रक्रिया होती. जेव्हा एक मानव दुसऱ्या मानवाचे भक्षण करितं होता, तेव्हा तुम्ही त्याला जाऊन "आज पासून माणसे खायचे सोडून वनस्पती खा" असे एकदम म्हणाल तर तो ऐकेल काय? &lt;br /&gt;&lt;br /&gt;नरभक्षणाकडुन प्राणी भक्षणाकडे, त्यातही नंतर ठराविक प्राणी खाऊ नका, त्याहिपुढे जाऊन मग ठराविक काळात मांस खावु नका, आणि नंतर वनस्पती खा असे हे रानटी अवस्थेतून नागरीकरणाकडे आणण्याची प्रकिया फार विचारपूर्वक वैदिक ऋषींनी राबविली होती. (ज्या प्राण्यांची संख्या कमी होती, जे उपयुक्त आहेत ते न खाण्यास सांगितले आहे. ज्या विषव्रुत्तिय प्रदेशात हरणे जास्त होती, वनस्पतीसही जी नुकसानकारक होती ती खावीत, त्यांचीच मृगया (शिकार) ) करा. (शिकार करणे, यातही मृग = हरिण, या = जाणे, घालविणे, असेच आहे). ह्यात ज्या हरणाची काहीही चूक नसतानाही मृगया केली जायची, इतर प्राण्यांचा जीव वाचावा म्हणून हा कठोर निर्णयही त्यावेळी फार विचारपूर्वक घेण्यात आला.. त्या हरणांची क्षमाही मागितली जाते, यज्ञाच्या वेळी हरणाच्या कातड्यावर बसून यज्ञ केला जायचा की ज्या मागे हि भावना होती की ह्या यज्ञाचे पुण्य त्याच्या मृतात्म्यासही मिळो. हवन म्हणून नरबळी, प्राणी बळी सोडून आज यज्ञात तीळ, जवस, गहू, इ. वाहिले जाते हे पाहवे... थोडक्यात काय तर जे तुम्ही भक्षण कराल तेच देवासहि अग्नीमार्फत अर्पण करा हेच जे सांगितले होते ते चूक नव्हतेच, हे ध्यानी घ्यावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाकी , चंद्रावर तेच गेले, मंगळावर तेच गेले, इंग्रजांशी संधान त्यांनीच बांधले, तेच शिकले, तेच पुढे गेले, त्यांनी क्षत्रिय राजांना मांडलिक बनविले, त्यांनीच मुसलमानांची भीती घातली हे सगळे आरोप आजतरी १००% निरर्थक आहेत... आणि ह्या आरोपाने काहीही रचनात्मक बदल होणार नाही हे आपणही खास जाणता... तरीही हेच मुद्दे वारंवार का मांडले जातात हेच मला समजत नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-8331799179264948111?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/8331799179264948111/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/12/blog-post.html#comment-form' title='0 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/8331799179264948111'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/8331799179264948111'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/12/blog-post.html' title='वैदिक यज्ञबळी'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-1575185833655759326</id><published>2010-10-24T23:20:00.000-07:00</published><updated>2010-10-25T00:41:19.075-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='kas'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='satara'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ठोसेघर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कास'/><title type='text'>कासची ट्रीप</title><content type='html'>ह्या शनिवार, रविवारी&amp;nbsp;कासचं पठार, सज्जनगड, ठोसेघर, वाई, पाचगणी आणि मेणवली अशी दोन दिवसांची मस्त सुट्टी&amp;nbsp;मारून आलो. सुजीत, कमळ्या, विशाल, आम्या आणि मी सगळे सोमवारी F5 (रिफ्रेश) झालेलो होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/TMUhBzWiSGI/AAAAAAAAAT0/XCt9iq62RTY/s1600/kas.JPG" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="239" nx="true" src="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/TMUhBzWiSGI/AAAAAAAAAT0/XCt9iq62RTY/s320/kas.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;[कासचे जागतिक किर्तीचे पठार]&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;सुज्याची इंडिगो होती, आणि सगळं मार्गक्रमणही त्यानेच केलं. पण&amp;nbsp;त्याचं ड्रायव्हिंग प्रचंड जोरात&amp;nbsp;आणि बेभरंवशाचं असल्याने मी जरा सावधच होतो. मिळेल तेव्हा मिळेल तस्सं आम्ही सुज्याला त्याच्या ड्रायव्हिंग वरून ठोकतच होतो. मी तर&amp;nbsp;त्याला नुसते &amp;nbsp;उपदेशाचे कडक&amp;nbsp;ढोस &amp;nbsp;पाजत होतो, ते त्याचं ड्रायव्हिंग सुधारावं म्हणून नव्हे तर आम्हाला त्यानं पुण्यापर्यंत पोहचवावं, सुखरूप. म्हणून.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिला मुक्काम साताऱ्याला विशालच्या घरीच होता. &amp;nbsp;सुज्या महंजे सपक भाज्या चघळणारा कोकणी. विशालच्या आईनं केलेल्या वांग्याच्या भाजीने त्याच्या कानातून धूरच काढला. "आम्ही सातारकर" हा काय तिखट प्रकार असतो तो त्या बेट्याला आणि आम्हालाही पहिल्याच&amp;nbsp;झटक्यात तिथेच कळला. पण सुज्याची प्रचंड मदत झाली या ट्रीप मध्ये... म्हंजे तो आमचा ड्रायव्हर तर होताच शिवाय गाडीही त्याचीच होती, शिवाय आम्ही&amp;nbsp;सगळॅ संपूर्ण प्रवासात त्याचाच शाब्दिक घाम काढण्याची संधी सोडत नव्हतो. आणि तरीही तो&amp;nbsp;हे सगळं हसण्यातच विलीन करीत होता. असो, कास म्हंजे भन्नाट च आहे. कैक प्रकारच्या फूट भर उंच वाढणाऱ्या, रानटी तरीही नाजुक फुलंच लांबलचक पठार. ३०-३५ प्रकारची फुल त्यावेळी तिथं असावीत. &amp;nbsp;जाताना दुर्बीण घेऊन जा. &amp;nbsp;रस्त्याच्या दुतर्फा फक्त फुलंच फुलं.... आणि जिकडे पाहवे तिकडे नुसते कैमेरेच कैमेरे. अगदी दुकानात पाहिले नसतील इतक्या प्रकारचे कैमेरे पाहायला मिळतील ते फक्त कासलाच. निसर्ग फोटोग्राफिला तात्पुरते का होईना पण प्रचंड&amp;nbsp;"उधाण" आलेलं आहे हे मला तिथं कळलं... निसर्ग चित्रणाचा अगदी सुळसुळाट झाला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुजीत आणि विशालही याच्यातही तोच "सुळसुळाट" संचारला होता. मिळेल ते फुलं ते कैमेऱ्यात टिपत होते... &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/TMUhoDDicxI/AAAAAAAAAT4/nyVO_wqtUs0/s1600/vishal1.JPG" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="240" nx="true" src="http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/TMUhoDDicxI/AAAAAAAAAT4/nyVO_wqtUs0/s320/vishal1.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;[विशालची छुपी फोटोग्राफी]&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;विशल्या... फुलं पाहायला आलेली "फुलं" चोरून टिपण्यात अगदी माहिर. म्हजे तो त्याचा चळच. &amp;nbsp;स्वतःच्या फ्लैट मधून&amp;nbsp;समोरची अंटी कैक प्रकारे त्याने कैमेऱ्यात टिपलेली होती. असो, कास हे ठिकाणही सुचविण्याचं डोकं मात्र त्याचंच. अर्थात त्या निमित्ताने त्याला साताऱ्याला त्याच्या घरीही जाता येणार होतेच. (एकाच दगडात दोन पक्षी)&amp;nbsp;तो रानफुलांचे फोटो कैमेऱ्यात बंदिस्थ करण्यात&amp;nbsp;बेभान झाला होता. शेवटी जेव्हा त्याचा कैमेरा जड झाला तेव्हा फोटो सेशन थांबले आणि गाडी कासच्या तलावाकडे ढाळा-ढाळाने निघाली.... &amp;nbsp;तलावावरून माघारी सज्जनगड गाठला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वडापाव आणि ताकाचा एक एक ग्लास रितवून सज्जनगड सर केला. समर्थांच्या वापरातील वस्तू आणि समाधीचं दर्शन घेतलं. समाधीपुढं शांत बसलो तोच सुजितं आणि कमळ्याने प्रसादालयाकडे नजर फिरवून, &amp;nbsp;प्रसादाच्या नावाखाली जेवणाचा कार्यक्रम (फुकटात) उरकायचा हे ठरवून टाकले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/TMUh3TuRfHI/AAAAAAAAAT8/5svzV38FOuI/s1600/thoseghar.JPG" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="240" nx="true" src="http://4.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/TMUh3TuRfHI/AAAAAAAAAT8/5svzV38FOuI/s320/thoseghar.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;[ठोसेघर]&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;कमळ्या...फिरायची याला लै हौस, नुसता खादाड माणूस. गर्दीमुळे प्रसादालयात जेवण मिळाले नाही. तर म्हणे "तिकडे भक्त निवास दिसतो आहे तिकडे जाऊ यात... मिळेल तिथे" शेवटी गड उतरणीला लागण्यापूर्वी हॉटेलात घुसवून त्याची पेटपुजा करवून घेतली. ठोसेघरलाही प्रत्येकी २ उकडलेली अंडी मागविली होती, त्यातीलही माझ्या वाटणीच्या एका अंड्यावरही ह्याच हरामीने&amp;nbsp;गुपचुप&amp;nbsp;ताव मारलेला होता. शेवटापेर्यंत ह्यानं गाडीतील किन्नरची जागा काही सोडली नाही. हा नुसताच मजा करायला आला होता. ठोसेघरचे दोन उंच&amp;nbsp;धबधबे&amp;nbsp;&amp;nbsp;आकर्षक आहेत पण त्याच्या जवळ जाता येत नाही हि खंतही आहेच. सुज्या आणि आंम्या वर अतिबाका प्रसंग&amp;nbsp;आल्यांमुळे ते मागेच थांबून "तुळस लावण्यासाठी" जागा&amp;nbsp;शोधत होते. शेवटी लेडिज संडासात जावून हे बहाद्दरांनी&amp;nbsp;पोट रिते&amp;nbsp;केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div style="border-bottom: medium none; border-left: medium none; border-right: medium none; border-top: medium none;"&gt;&lt;table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/TMUiEvsugzI/AAAAAAAAAUA/i2dkVyHDqL0/s1600/grp.JPG" imageanchor="1" style="clear: right; cssfloat: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"&gt;&lt;img border="0" height="239" nx="true" src="http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/TMUiEvsugzI/AAAAAAAAAUA/i2dkVyHDqL0/s320/grp.JPG" width="320" /&gt;&lt;/a&gt;&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td class="tr-caption" style="text-align: center;"&gt;[ट्रिपचे मेंबर]&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;अम्या... नुसता सलमानच्या स्टाइलने स्वतःचे फोटो&amp;nbsp;काढून घेण्यावर त्याचा भर. &amp;nbsp;त्याच्या सगळ्या पोझ सलमानसारख्याच. &amp;nbsp;पाचगणीला ह्याचा मामा असतो, सलमानच्या दबंग च्या शूटिंगचे लोकेशन दाखविण्याचं काम त्यांनी केलं. आम्हीही कुठल्याश्या मालिकेच्या शुटिंग्ची आणि त्यांतील नट्या पाहण्याची मजा घेतली. मुंबईचा असलेल्या आम्याचा भामटेपणा कामी आला आणि&amp;nbsp;"शूटिंगसाठी आलोय" असं खोटंच&amp;nbsp;सांगून पावती न फाडता, &amp;nbsp;&amp;nbsp;टेबल पांईट&amp;nbsp;पाहायला मिळाला. वाईत मुक्काम केला. &amp;nbsp;आमितच्या मामाचा गाव आणि बगाड, आणि आमितच्या जुन्या सामानाचं (मैत्रिणीच) घरही&amp;nbsp;पाहायला मिळालं. क्रुष्णामाई मधील ढोल्या गणपतीचे दर्शन घेतले. (तो&amp;nbsp;गणपती सुज्या आणि कमळ्या पेक्षाही जास्त ढोल्या आहे. ) कृष्णामाई इथे&amp;nbsp;बिलकुल&amp;nbsp;संथ वाहत नव्हती. &amp;nbsp;पुढे नाना फडणविसांचा मेणवलीतिल वाडा गाठला. &amp;nbsp;ह्या आम्याला इतिहासातील काही कळत नाही असा माझा पक्का समज झाला आहे. एतिहाशिक वास्तू, चर्चा यांच्या बाबतीत तो न्युट्रल आहे. &amp;nbsp;म्हंजे "तुमचं चालू द्या, मी ऐकतो" ह्या प्रकारातला... तर सुज्या आणि कमळ्या निगेटिव्ह आहेत, म्हंजे "चला, बास करा, निघू" ह्या प्रकारातील.&lt;/div&gt;&lt;br /&gt;वाईच्या जवळच १७८० चा फडणविसांचा वाडा आहे. दुरवस्थेत आहे पण नक्की पाहवा असा आहे. वाड्यामागून क्रुष्णामाई वाहते त्या घाटावर स्वदेशचं शूटिंग झालेलं आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी, त्यातल्या त्यात ह्यांच्यात&amp;nbsp;एकमेव समजूतदार आणि जबाबदार आणि विश्वासपात्र होतो, म्हणून हिशेब आणि&amp;nbsp;कॉंट्री माझ्या कडे होती.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-1575185833655759326?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/1575185833655759326/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/10/blog-post.html#comment-form' title='2 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/1575185833655759326'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/1575185833655759326'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/10/blog-post.html' title='कासची ट्रीप'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/TMUhBzWiSGI/AAAAAAAAAT0/XCt9iq62RTY/s72-c/kas.JPG' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-4247922859537441466</id><published>2010-05-17T19:06:00.000-07:00</published><updated>2010-05-17T19:06:33.421-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='गणी'/><title type='text'>गणी गण गणात बोते बाते - अर्थ</title><content type='html'>दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ह्या चरित्रग्रंथात त्या अभंगाचा अर्थ दिला आहे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या सूत्रमय भजनाचा। अर्थ ऐसा वाटतो साचा।&lt;br /&gt;गणी या शब्दाचा। अर्थ, मोजी हाच असे।।&lt;br /&gt;जीवात्मा म्हणजे गण। तो ब्रह्माहून नाही भिन्न।&lt;br /&gt;हे सुचवावया कारण। गणात हा शब्द असे।।&lt;br /&gt;बोते हा शब्द देखा। अपभ्रंश वाटे निका।&lt;br /&gt;बाते हा शब्द ऐका। तेथे असावा नि:संशय।।&lt;br /&gt;बा या शब्दे करून। घेतले पाहिजे मन।&lt;br /&gt;ते हे आहे सर्वनाम। गण शब्दाऐवजी आलेले।।&lt;br /&gt;म्हणजे मना दिसे नित्य। जीव हा ब्रह्मास सत्य।&lt;br /&gt;&lt;br /&gt;यात स्पष्ट अर्थ दिला आहेच... मुळातच हे एक सूत्रमय भजन आहे असे दासगणू महाराज म्हणताहेत हे ध्यानी घ्यावे, ते शब्द एकमेकांशी सूत्राप्रमाणे संबंधित आहे...&lt;br /&gt;.&lt;br /&gt;तरीही यापुढे जाऊन पटवून द्यायचे झाले तर ....&lt;br /&gt;.&lt;br /&gt;गण शब्दाचा सरळ अर्थ म्हंजे लोक, (त्या अर्थानेच गणराज्य= लोकांचे राज्य, गननायक- लोकांचा नायक, देवगण = देवलोक, वृषीगण = वृषिलोक) गण म्हंजे लोक हा अगदीच तांत्रिक अर्थ झाला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता थोडासा आध्यात्मिक दृष्टीने पाहताना, गण किंवा लोक म्हंजेच जीवात्मा. (जीवात्मा म्हंजे फक्त माणूस असा संकुचित अर्थ नव्हे तर सृष्टीतील सगळे चैतन्य असलेले प्राणी असे सूत्र/अर्थ आहे)&lt;br /&gt;&lt;br /&gt;गुरुवर्य टागोरांच्या "जण गण मन अधिनायक... " चा अर्थ ही "लोकांवर, आत्मावर, मनावर राज्य करणारा... " असाच आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ऋग्वेदामधील सूक्तांमध्ये गणपतीचे वर्णन करताना म्ह्नटले आहे.. &lt;br /&gt;'ओम गणानां त्वां गणपती हवामहे।' &lt;br /&gt;तो गणांचा पती आहे, त्यांना मार्ग दाखवणारा नेता आहे. गणपती हा गणांचा (लोकांचा, जीवात्म्यांचा) अधिपती मानला जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याअर्थी गण म्हंजे जीवात्मा असाच अर्थ इथे अभिप्रेत आहे..&lt;br /&gt;&lt;br /&gt;गणांत म्हंजे गण+आत असा साधा अर्थ आहे. जो जीवात्म्यांच्या आत असतो, जीवात्म्यांशी एकरूप असतो तो परमात्मा. म्हंजेच ब्रह्म असा "गणांत" शब्दाचा अर्थ निघतो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-4247922859537441466?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/4247922859537441466/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/05/blog-post.html#comment-form' title='1 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/4247922859537441466'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/4247922859537441466'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/05/blog-post.html' title='गणी गण गणात बोते बाते - अर्थ'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-1915217541086275314</id><published>2010-03-11T05:50:00.000-08:00</published><updated>2010-03-11T05:50:23.249-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्वप्न'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सत्य'/><title type='text'>सत्य आणि स्वप्न !!</title><content type='html'>सत्याची, वास्तवाची जाणीव बुद्धी वारंवार आपल्याला करून देत असतेच तरीही मन मात्र देहमान विसरून स्वप्नांच्या भराऱ्या मारण्यात दंग असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मन एवढं, एवढं..... आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात" मनानं आपला "मुक्तपणा आणि आवाका" अधोरेखित करण्यासाठी मुद्दामहून म्हटलं. अल्लड मनाची हि टिका वैचारिक,परिपक्व बुद्धीला कळायची, पण त्याचवेळी तिला मनाच्या स्वप्नद्रुष्टीचं, कल्पनाविलासाचं कौतुकही वाटायचं. म्हणून बुद्धी संयम राखत शांतच राहायची. पण बुद्धीचं अपत्य असलेल्या कडू सत्याला ते टोचलं. सत्याने लगेच तोफ डागली..... " हो... हो, आभाळात सहज जाता पण पाय भुईवर नसतात त्याचे काय? " सत्य कडू असतं हे पुन्हा मनाला पटलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;" अरे आम्ही तर पृथ्वीवर राहून स्वर्गातही फेरफटका मारून येऊ शकतो" आता मनाची कड घ्यायला स्वप्न कुठसं जागं झालं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"हो स्वर्गात फिरायला सगळे उत्साही असतात हो!.... पण मरायला कोनीच तयार नसतो त्याचे काय?" सत्याने स्वप्नाला अजून एक वास्तववादी टोला हाणला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"मी म्हणतो, जर क्षितिजाच्या पलीकडे पाहण्याचं स्वप्न आणि दृष्टी असेल तरच क्षितिज गाठता येऊ शकते,... हे निर्वादित सत्य आहे" स्वप्नाने ताकद दाखविली.&lt;br /&gt;&lt;blockquote&gt;&lt;span style="color: black;"&gt;&lt;strong&gt;&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;blockquote&gt;&lt;span style="color: black;"&gt;&lt;strong&gt;"अरे पण क्षितिजाला अंत नसतो,... म्हणून आपलं क्षितिज आपणच ठरवायचं असतं, आप आपल्या ताकदीप्रमानं..... " सत्याचा सल्ला. स्वप्नाजवळ असलेल्या कल्पनाशक्तीची वास्तवाशी सांगड घातली की यश हमखास ह्याची सत्याला जाण होती.&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;/blockquote&gt;&lt;/blockquote&gt;"स्वप्न म्हणजे सुखद वाऱ्याची झुळुक, अंगावरून गेली की अमाप सुख देऊन जाते. स्वप्नाविना जीवन भकास, ऑक्शिजन वींना जळणारी काडी विझते तसं स्वप्नांविना जीवन विझून जाते" स्वप्नानं आपलं महत्त्व गायलं. सत्याला ते जरासं पटलं पण त्यानं आपला हेका न सोडता म्हटलं. " पण स्वप्न जर साकार झालं नाही तर त्याचा सारखा वैरी नाही, मग ते तुम्हाला उध्वस्थ करते. वास्तवहीन स्वप्न पाहिलेली कैक जन उध्वस्थ झालेत ना" हळूहळू चर्चा रचनात्मक होवू लागली होती.&lt;br /&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;/div&gt;&lt;blockquote&gt;&lt;/blockquote&gt;&lt;blockquote&gt;&lt;div style="text-align: justify;"&gt;&lt;strong&gt;"डोनाल्ड कर्टिस म्हणाले होते We are what and where we are because we have first dreamed it. स्वप्न पाहणे किती महत्त्वाचे आहे बघ? " स्वप्नाने आपली बाजू पुन्हा लावून धरली&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;/blockquote&gt;. &lt;br /&gt;"स्वप्न तर आपण झोपेतही पाहतो, क्षणोक्षणी, पदोपदी पाहतो, पण असली स्वप्ने नंतर आठवतही नाहीत. स्वप्न म्हणजे जे आपण झोपेत पाहतो ते नव्हे तर जे आपण जागेपणी पाहतो आणि जे आपली झोप उडविते ते, "जागेपणी" म्हंजे फक्त डोळे उघडलेले असे नाही तर आपला आवाका, आर्थिक आणि शारीरिक ताकद, ते साकारण्यासाठी हवी असलेली वास्तववादी बुद्धी यांची पुरती कल्पना असणे होय" सत्याने त्याचे तत्त्वज्ञान मांडले. स्वप्नाला हळू हळू वास्तवाची जाण ठेवण्याचं महत्त्व पटू लागले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"स्वराज्याचं स्वप्न शिवरायांनीही पाहिलं, पण ते साकारताना त्यांनी सदैव वास्तवाचं भान ठेवले होते. मुघल, आदिल यांच्या घासालाही आपण पुरणार नाहीत हे वास्तव स्वराज्याच्या स्वप्ना बरोबरच त्यांनी सदैव ध्यानी ठेवले होते. कधी माघार, कधी तह, तर कधी आक्रमण करत त्यांनी स्वप्न साकार केलेच.... श्वासात भिनलेलं स्वप्न ठेचा लागल्यानं वाऱ्यावर सोडून दिलं नाही.. स्वप्नाच स्थित्यंतर ध्येयात व्हायला पाहिजे. " सत्यानं स्वप्नाला दाखला दिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दोघांनाही एकमेका सोबत गेल्याशिवाय यश मिळणार नाही याची खात्री झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;" भान ठेवून स्वप्न, ध्येय ठरवायचे आणि बेभान होवून त्याची अंमलबजावणी करायची... "स्वप्नाने अनुमोदन दिले.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-1915217541086275314?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/1915217541086275314/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/03/blog-post.html#comment-form' title='3 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/1915217541086275314'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/1915217541086275314'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/03/blog-post.html' title='सत्य आणि स्वप्न !!'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-9173135742351277152</id><published>2010-01-30T06:25:00.000-08:00</published><updated>2010-01-30T06:27:05.867-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='संभाजी महाराज'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='म्हलोजी घोरपडे'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सरलष्कर'/><title type='text'>मराठ्यांचा शेवटचा सरलष्कर</title><content type='html'>"आबा, गाठू ना आपण शिरकान येळेवर?"&lt;br /&gt;"आरं?, निस्त पोचून काय कामाचं? येळ आली तर शीर काटून ठिवाया लागय, शिवाजीऱ्हाज्याचा अंकुर जपाया!"&lt;br /&gt;&lt;blockquote&gt;&lt;strong&gt;मराठी दोलत डुबवू पाहणाऱ्या त्या भयाण काळरात्री तो म्हातारा आपल्या दोन बांड्या पोरांसह जीवाच्या आकांतानं दौडत होता... पन्हाळ्यावरून.. संगमेश्वराकडे.... घाट-पांदीतून... गचपानातून...., कारण त्यांच्याही पुढे औरंग्याचा मुकर्रबखान सावज टिपायला उरफोडीनं दौडत होता...&lt;/strong&gt; &lt;/blockquote&gt;मध्यरात्र उलटली नसेल तोच सपासप शांतता भेदीत दोन घोडाइत सरदेसायांच्या वाड्यात घुसले...खबर ऐकून कनोजाचा थरकाप उडाला... कसेबसे सावरीत ते सुखदालनाकडे झेपावले... महाराजांना जागे केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"को&amp;nbsp;S&amp;nbsp;ण ?"&lt;br /&gt;&lt;br /&gt;"वकुत न्हाई..&amp;nbsp; घोडा फेकत एक फौज रानांतनं दौड घेतिया.. धन्यांनी खिन्नभर देरी न करता ह्याच वक्तीला संगमेश्वर सोडावं" - "इथल्या पांगपरास दौडीत लैई घोडा हाय.. तड न्हाई लागाय्ची" भेदरलेले खबरे एकापाठोपाठ बोलते झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"शिर्क्यांची, शिर्क्यांची माणसं असतील&amp;nbsp;ती, गनीमाची काय बिशाद ह्या गचपानात घुसायची? " महाराज जराश्या गाफीलपणानं बोलले....काळोखातल्या गाफीलपणाचा अंदाज त्यांना नीटसा आलाच नव्हता, अरेरे... चुटपुटत खबरे बाहेर पडले.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;कोंबडं आरवायच्या आत,... अन दैव बलवत्तर म्हणून मुकर्रबखानाच्याही काही घटका अगोदर, आडवाटेनं जीवाची पर्वा न करता म्हातारा संमेश्वराच्या वेशीत शिबंदीसह घुसला... वायू वेगाने संगमेश्वराला घेर टाकत पांगणाऱ्या शिबंदीतून नरड्याच्या घाटा फुटून थरकाप उडविणाऱ्या कैक किलकिल्या उडाल्या.... " हाS र हाS र म्हादेव!!! ".... अन.. त्या विरायच्या आत... आली... घुसली...बेभान, बेलाग, शिवपुत्राच्या रक्तासाठी पिछाडलेली गनीमांची फौज धुरळा उडवीत वेशीच्या आत घुसली. "धीS न धीS न" आरोळ्या, कालवा, टापां साऱ्यांचा चिखल झाला...&lt;br /&gt;&lt;br /&gt;भयकातर झालेले कुलेश, राया, अंता छत्रपतींना गदगदा हालवत किंचाळले "घात झाला... इळभर थांबू नगासा, घात झालाया.. हत्यार घ्या नि भाईर पडा... निघा.. निघा"&lt;br /&gt;&lt;br /&gt;गर्रकन वळत.. म्यानातील तलवार सर्रकन उपसत.. म्यान तिथंच फेकून देत... त्याच हातात शंभुराजे ढाल तोलते झाले. " चला, भाईर व्हा, गाव येरगटलाय गनीमानं". राया, अंता, कुलेश, अर्जोजी, महाराज एकाच आवेगानं वाड्या बाहेर पडले... घोडी धरलेले मोतदार जीव डोळ्यात आणून टकमका दरवाज्याकडेच पाहत होते.. मराठ्यांचा राजा बाहेर काढण्यासाठी... वाचविण्यासाठी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&amp;nbsp;पण एव्हाना म्हाताऱ्याची फळी फोडून दहा-पंधरा हसम आत घुसले होते... पाठोपाठ पिसाळलेला इखलासखानही पिछाडीला शे-पाचशे हशम घेऊन महाराजाच्या अंगावर धडकला..&lt;br /&gt;.पण म्हाताऱ्याचा सारा "जीव" महाराजांत अडकल्याने, जिवाची अन गनीमांच्या वारांची दोघांचीही पर्वा न करता म्हातारा संताजी-बहिर्जीसह पुढे झेपावलाच.... इखलासखानाला ते मोठ्या जिकरिने दरवाज्यापासीच आडवे आले...... झालं, टापा, आरोळ्या, खणाखणाट करत.. दरवाज्यावरच कुरुक्षेत्र पेटलं! &lt;br /&gt;&lt;br /&gt;संभाजीराजांनी कसाबसा चंद्रावत माडांखाली घेतला.. लागलीच म्हाताऱ्याने स्वतःचा घोडा धन्यापासी नेला... भिंगरी सारखा तो धन्याभोवती फिरवत... वार झेलत.. वार करत.. म्हातारा ओरडत होता.. "धनी...धनी..भांगा काढा धनी.. नावडी.. व्हडक्यात बसून निघा.. जीवाची बाजी लावू आमी".. म्हाताऱ्याच्या मुखातून मराठी दोलत अक्षरशः आक्रोशत होती..&lt;br /&gt;&lt;br /&gt;हातचे हत्यार सपासप फिरवत संभाजीराजे भांगा मिळेल तसा चंद्रावत घुसवत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;blockquote&gt;&lt;blockquote&gt;&lt;strong&gt;"म्हातारा, संताजी, बहिर्जी, कुलेश, अर्जोजी असे जानकुर्बान मराठे वादळातून दिवली जपून न्यावी तसे शिवाजीऱ्हाज्याच्या अंकुराला, शिवपुत्राला, मराठ्यांच्या राजाला नेण्याची पराकाष्टा करत होते. पाठीवरून घामाच्या धारा फुटल्या होत्या, नरड्याला कोरड पडली होती तरीही म्हातारा एकाही गनीमास राज्यांच्या जवळ फिरकू देत नव्हता... जीव गेला तरी बेहत्तर पण राजा वाचवायचाच या इर्षेने तो पेटला होता, अगदी बाजीप्रभू देशपांड्यांप्रमानं.."&lt;/strong&gt;&lt;/blockquote&gt;&lt;/blockquote&gt;काफरांच्या राज्याच्या अंगलटी भिडण्याच्या आड हा थेरडा येतो आहे हे हेरलेला इखलास म्हाताऱ्याकडे बोट दाखवत खाटिकाप्रमाने किंचाळला "घेर डालो, बुढ्ढेको.. घ्रेर डालो". ....आणि महाराजांची कड धरून असलेल्या म्हाताऱ्याला चवताळलेल्या हशमांनी लागलीच घेरून टाकलं... महाराजांच्या फळीपासून त्याला तोडून एकटं केलं जाऊ लागले... तरीही अजूनही हत्यार अन बुढी बोली कडकडत होती " धनी, नावडी, व्हडकी"... &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण आता?.... म्हाताऱ्याच्या अंगावर जागाच नव्हती जखम झेलायला.. &lt;br /&gt;आणि झालाच.. ...&lt;br /&gt;शेवटचा हाशमी वार.. . जाड पात्याच्या हाशमी तेगीचा... &lt;br /&gt;म्हाताऱ्याच्या छाताडावर.. !!!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हातारा जनावरावरून खाली कोसळला... धाडकन.&lt;br /&gt;दोलतिचा पाचवा मर्दांना सरलष्कर कोसळला.... ...."म्हलोजी घोरपडे" कोसळला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;साळसूद पाचोळा.&lt;br /&gt;आधार- "छावा- शिवाजी सावंत"&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-9173135742351277152?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/9173135742351277152/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/01/blog-post_30.html#comment-form' title='17 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/9173135742351277152'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/9173135742351277152'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/01/blog-post_30.html' title='मराठ्यांचा शेवटचा सरलष्कर'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>17</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-2417300769306392801</id><published>2010-01-29T06:30:00.000-08:00</published><updated>2010-01-29T06:30:04.045-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लोकप्रतिनिधी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='राजकारण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सुप्रियाताई'/><title type='text'>"किंमत मोजावी लागेल"- सुप्रियाताई पवार.</title><content type='html'>&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/S2Lv2jOfX5I/AAAAAAAAAS0/Me9pWuuZvNA/s1600-h/lavasa1.JPG" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" height="122" kt="true" src="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/S2Lv2jOfX5I/AAAAAAAAAS0/Me9pWuuZvNA/s200/lavasa1.JPG" width="200" /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;काही प्रश्न विचारायचे राहिले म्हणून नवीन पोस्ट... &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;लवासासाठी आपण बेमालूम पाने जंगलाची कत्तल करता आहात त्याची किंमत केव्हा चुकवणार? &lt;br /&gt;&lt;br /&gt;अनेक औषधी वनस्पती काटून आम्हाला विनाशाकडे ढकलता आहात त्याची किंमत केव्हा चुकवणार?&lt;br /&gt;&lt;br /&gt;जंगले समूळ उद्ध्वस्त करून आणि डोंगरमाथे व उतार यावर बुल्डोझर फिरवून पाणलोटक्षेत्राचा विध्वंस केल्याची किंमत कोण चुकवणार?&lt;br /&gt;&lt;br /&gt;पर्यावरण विषयक, प्रदूषण विषयक, आदिवासी जमीन हक्क, कमाल शेतजमीन धारणाविषयक सारे कायदे धाब्यावर बसवून, शासनाच्या जमिनी सवलतीच्या दरात घेऊन, सार्वजनिक धरणक्षेत्रात हस्तक्षेप करण्याची परवानगी घेऊन, कोटय़वधीच्या मुद्रक शुल्काच्या सवलती घेऊन लवासा लेकसिटी बांधली जात आहे...बिनदिक्कतपणे ती योजना पुढे रेटली जात आहे. हे कसे घडू शकते आणि ....त्याची किंमत किती आणि कोन चुकवणार?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-2417300769306392801?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/2417300769306392801/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/01/blog-post_29.html#comment-form' title='3 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/2417300769306392801'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/2417300769306392801'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/01/blog-post_29.html' title='&quot;किंमत मोजावी लागेल&quot;- सुप्रियाताई पवार.'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/S2Lv2jOfX5I/AAAAAAAAAS0/Me9pWuuZvNA/s72-c/lavasa1.JPG' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-7497704125279434011</id><published>2010-01-27T09:37:00.000-08:00</published><updated>2010-01-27T09:45:34.578-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लोकप्रतिनिधी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='राजकारण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='सुप्रियाताई'/><title type='text'>"किंमत मोजावी लागेल"- सुप्रियाताई पवार.</title><content type='html'>आता खऱ्या अर्थाने ताई शरद पवारांच्या कन्या आणि बारामतीकर वाटू लागल्या. बारामतीकर दुसऱ्यांना संपविण्यासाठीच आहेत. फक्त पवारांनी न धमकावता, न बोलता अगदी नियोजनबद्ध कारस्थाने रचत विरोधक आणि स्वकीयांना देखिल न चुकता "किंमत" चुकवायला लावली. ताईंकडे तो छुपागूण काही दिसत नाही. &lt;br /&gt;&lt;blockquote&gt;&lt;blockquote&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: #444444;"&gt;"आ. शिवतारे हे ताई सारखे जन्मताच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेले नाहीत, हे खरे असले तरी शिवतारे बापूंनाही लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने निवडून दिलेले आहे हेही ताई कदाचित विसरलेल्या नसतील पण आपण पवार साहेबांच्या कन्या आहोत, आणि आपण काहीही बोलू/करू शकतो हा अहंभाव त्याच्यात आहे हे मात्र नक्की झाले. "&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;/blockquote&gt;&lt;/blockquote&gt;लवासा आणि तत्सम कैक प्रकरणे जर त्या दाबू शकतात तर शिवतारे सारखा सामान्य आमदार दाबायला कितीसा काल असा काहीसा भ्रम ताईंचा झाला तर नसेल ना? मुळातच शिवतारे राजकारणात पैसा कमावण्यासाठी आलेले नाहीत हे ताईंनी लक्षात घेतले नाही. त्यांच्या कडे पवारांपेक्षा कमी पैसा आहे, तसे असूनही पेश्यासाठी राजकारण करणार नाही हे ते निक्षून सांगताहेत, तसे वागताहेत देखिल. मुळातच त्यांना "पुरंदरचा बुलंद" आवाज बनायचे आहे हे पैसा आणि सत्ता मिळविण्यात मशगुल झालेल्यांना कळलेलं दिसत नाहीये. आणि म्हणूनच ते त्याच तडफिणे पुरंदरचे प्रश्न मांडताहेत. पुरंदर म्हंजे पुणे महानगर पालिकेचा कचरा डेपो नाही, त्यांनी उचलेल्या या भूमिकेला तेथील खासदार म्ह्ननून आपणही आधार देऊन "लोकप्रतिनिधी" पदाची आब राखायला हवी होती. ते का केले नाही याचे स्पष्टीकरण देणे आपण का टाळता आहात. पुरंदर मधून आपणास कमी मताधिक्य मिळाले म्हणून असे वागत असाल तर पुढच्या वेळी अजून बिकट अवस्था होईल कारण पुरंदरची जनता "पवारांना" बांधील नाही हे न विसरणे. आणि आपल्या सारखेच फाडफाड इंग्लिस शिवतारे आणि इतरांनाही बोलता येते हे ही न विसरणे आणि राग आला तरी मातृभाषाच वापरायलाही न विसरणे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;blockquote&gt;&lt;blockquote&gt;&lt;strong&gt;&lt;span style="color: #444444;"&gt;"ताईसारखे खासदार असलेले लोकप्रतिनिधी जर सरकारी अधिकाऱ्यांची बाजू घेऊन, अधिकाऱ्यांना सुरक्षित करू पाहत असतील तर हा "लोकप्रतिनिधी" ह्या पदाचा सरळ सरळ घनघोर अपमान आहे..."&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;/blockquote&gt;&lt;/blockquote&gt;&lt;br /&gt;आयुतांना कडून उत्तर अपेक्षित असताना एका लोकप्रतिनिधीने दुसऱ्या लोकप्रतिनिधीचा त्यांच्याच मतदार संघातील प्रश्नांसाठी अवमान करणे म्हनेजे जनतेचा अपमान करण्यासारखे नाही काय?. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपण मुळी त्यांना निवडून देतो ते आपले प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडावेत म्हणूनच ना? प्रश्न विचारले तर म्हणे मोठी किंमत चुकवावी लागेल, हा काय प्रकार? आवाज चढवलेला तुम्हाला आवडत नाही, तर मग दुसरं कुणी बोलत असताना मध्येच तोंड घालणे कसे काय बरे आवडते?&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुप्रिया ताईंना पुरंदर मध्ये मते मागण्यासाठी यावे लागते, शिवतारेंना बारामतीत जावे लागत नाही त्यामुळे ताईंनी संयमाने घेतलेले त्यांच्याच फायद्याचे आहे. अजित दादा आणि ताईंचा "वर्चस्वाचा" लढा चालू झाला आहेच तेव्हा भविष्यात दादा शिवतारेंचा उपयोग ताईंच्या मुसक्या आवळण्यासाठी करू शकतात हेही लक्षात घ्यावे.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;link- &lt;a href="http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=75616&amp;amp;boxid=1263915&amp;amp;pgno=7&amp;amp;u_name=0"&gt;http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=75616&amp;amp;boxid=1263915&amp;amp;pgno=7&amp;amp;u_name=0&lt;/a&gt;&lt;br /&gt;link - &lt;a href="http://1.bp.blogspot.com/_3LiAGEv9aLo/S1w55BxS1oI/AAAAAAAAAUI/8-GdJMq3oJ8/s1600-h/235318531.jpg"&gt;http://1.bp.blogspot.com/_3LiAGEv9aLo/S1w55BxS1oI/AAAAAAAAAUI/8-GdJMq3oJ8/s1600-h/235318531.jpg&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-7497704125279434011?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='enclosure' type='' href='http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=75616&amp;boxid=1263915&amp;pgno=7&amp;u_name=0' length='0'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/7497704125279434011/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/01/blog-post_27.html#comment-form' title='8 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/7497704125279434011'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/7497704125279434011'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/01/blog-post_27.html' title='&quot;किंमत मोजावी लागेल&quot;- सुप्रियाताई पवार.'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-2621856502126929365</id><published>2010-01-13T08:32:00.000-08:00</published><updated>2010-01-13T08:35:29.840-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='साखर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शरद पवार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='राजकारण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ज्योतिषी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='महागाई'/><title type='text'>मी काही ज्योतिषी नाही</title><content type='html'>ते माहित्यं आमाला साहिब, तुमास्नी ते कळं असतं तर कांग्रेस सोडून, पंतप्रधानाच्या कुर्ची साठी ससेहोलपट करण्याची पाळी(व्येळ) तुमच्यावर आलीच नस्ती.. अन तुम्ही देवलसी बी नाइत, पंधरवड्यास्नी लस घ्याया इलायतेला जाया लाग्त हे बी ठाऊक हाय साऱ्यांसी.&lt;br /&gt;मागं नाशकात तुमी कांद्यावर बोलला नाहीत तर लोकांनी कांदं फेकलं होतं तुमच्यावर नाही का साहेब? बरं झालं तुम्ही काही का व्हहिना पण साखरेवर बोल्लात ते, नायतर&amp;nbsp;ऊसाची टिप्परं मारली असती लोकांनी?... लोकांचा काय नेम घेता?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुमी कृषी अन पुरवठा मंत्री हात, तुमचा एरिया म्हंजी क्रिटेट, ओलंपिक, ई. ई... कृषीमंत्र्याचा आण महागाईचं काय बाय संबंध तरी हाय का? मायाबहंजी कडं तुम्या चेंडू टाकलाच त्याबरोबर संरक्षण नाय्तर रेल्वे बिल्वे मंत्री जबाबदार हाइत असं म्हटलं अस्त तरी झ्याक झालं अस्तं, "ग्लोबल वार्मींग" हे कारणं चालतं मग हे बी चालून गेल्यं असत कि? अस्सं बोलून पब्लिक गोंधळून सोडायचं अन मग मूळ मुद्दा आपसूक बाजूला सारायचा हे आता आमच्यासारख्या बीन अकलेच्यानं तुमच्या सारख्या जाणत्या राजाला सांगायची गरज बी नाय म्हणा. साखर खाली कधी येणार हे तुमास ठाऊक नाय, पण ती वर जाणार हे भविष्य निवडणुकीच्या काळात आपणच साम्गतली व्हतं, पार तंतोतंत खरं निघालं बुवा ते? आपल्या क्रुर्पेने यापारी अन साठेबाजां लै कमावलं म्हणत्यात. म्हंजे अगुदर २० रु किलू नि हिच साखर निर्यात केली आणि आता तिच साखर मागात आयात करताय ना? &lt;br /&gt;&lt;br /&gt;मागं इदरभात लै शेतकरी जीवांनिशी मेलं, पण तुम्ही कामाच्या व्यापामुळं तिकडं बी फिरकला नाहीत. मनमोहनजी आले तेव्हा त्यांच्या बरोबर "निमंत्रण" नव्हते तरी आला व्हता. मयतिला अन दशकियेला जायला निमंत्रणाची गरज नस्तीच म्हणा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता कच्ची साखर बाहेरून येणार, इथले कारखाने तिच्यापासून पक्की साखर बनवणार. अन मग ऊस पिकवणारा शेतकरी परत मरणार असं दिसतंय... तुमी म्हण्ल्याप्रमानं मग आमी २-३ ज्योतिंशांकडं जाऊन आलो, पण ज्योतिषशास्त्रात साखरेला भविष्य नसतं अस म्हणत्यात त्ये. रस्त्यावरचेच ज्योतीशी ते त्यांना काय तुमच्यागत अक्कल हाय व्हय...? &lt;br /&gt;असू द्या, बरं बाकीचं जाऊ द्या यावर्षी ऊसाला तरी यवस्थित भाव द्या म्हंजे झालं साहिब. आप्ला बी दोन-चार एकर हाय आवंदाच्याला म्हनुन.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आप्ला साळसूद पाचोळा. (ध्यान असु द्या)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-2621856502126929365?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/2621856502126929365/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/01/blog-post_13.html#comment-form' title='2 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/2621856502126929365'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/2621856502126929365'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/01/blog-post_13.html' title='मी काही ज्योतिषी नाही'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-312060617833769930</id><published>2010-01-01T08:54:00.000-08:00</published><updated>2010-01-01T08:54:45.761-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='महाराष्ट'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='राजकारण'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='२००९'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नववर्ष'/><title type='text'>२००९- आले आणिक तसेच गेले.</title><content type='html'>हेही वर्ष मागच्या सारखेच संपले. भरभराट काहीच झाली नाही. वर्ष संपले, दुःख तसेच राहिले. नवीन वर्षही यापेक्षा काय वेगळे असणार?. (म्हणूनच वर्षारंभाचे काही देणं घेणं नाही, त्याबाबतही अगदी साळसूद आहोत) &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कसाबची गैंग लाटेवर स्वार होवून सावधपणे बेसावध मुंबैत घुसली, त्यांनी मुंबई धुतली. किलकिल्या डोळ्यांचे आर. आर. बोलपाटिल बोलून फसले, आणि मंत्रालयात पोहचायच्या आत त्यांची उपमुख्यमंत्र्यासह गृहमंत्र्याचीही खुर्ची गायब झाली. पण २००९ चा पायगुण चांगला म्हणून "फिरून परत भोपळे चौकात" तसे आर. आर. परत गृहमंत्री झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हलक्या फुलक्या विलासरावांनाही मुख्यखुर्चीतून मेणबत्तीवाल्यांनी खाली ओढलेच. २००९ ने त्यांना "अवजड" मंत्री करून सांत्वन (डिग्रेडेशन म्हटलं तरी चालेल, नाहीतर महाराष्टातून राजकीय हद्दपारीच म्हणा) केले. एव्हाना शिवराज पंaपाटलांनाही आपल्या साऱ्या सुटांसह नातवंडांना संभाळण्या साठी लातूरलाच धाडण्यात आले. (मिडिया आणि मेणबत्ती वाल्यांची ही कारागिरी)&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे मेणबत्ती वाले नंतर (मतदानाच्या दिवसी) दिसलेच नाहीत. (अन्यथा पुन्हा कांग्रेस आली असती काय? )&lt;br /&gt;&lt;br /&gt;यावर्षी नारायण राणेंनी बरीच (म्हंजे अनेक) राजकीय वादळे उठविली, मात्र दुसऱ्यांचे छप्पर उडायच्या ऐवजी त्यांचे २-३ समर्थक आमदार तंबुसोडून पळाल्यामुळे राणेंचेच वासे कोलमडले. या वर्षात कैक वेळा ते घोड्यावर बसून दिल्ली ला गेले पण मैडमने त्यांना गाढवावर बसवून माघारी पाठवले. मुख्यमंत्रिपद दूर पण हद्दपारीचा लखोटा मात्र मिळाला. २००९ मध्ये रानेंच्या "स्वाभिमानाची" शेपटी हालविणारी शेळी झालेली दिसली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यावर्षी पावसाचा अंदाज आलाच नाही. वाऱ्याची दिशा कशी, कुठे, कधी बदलली ते कळलेच नाही. राजकीय वारं हि तसेच होते. अशोक चव्हाण परत मुख्यमंत्री झाले आणि आमचं ते प्रथम मुख्यमंत्री झाले होते तेव्हा "आ" झालेलं तोंड अजूनही आवासुनच आहे. महाराष्टाचा मुख्यमंत्री कसा नसावा ह्याचं अप्रतिम उदाहरण म्हणेन मी. हायकमांड म्हंजे काय असते तेही समस्त महाराष्टाला यांच्या दूर-दुष्टी मुळे कळले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मराठा आरक्षणाची गणगवळण यावर्षी फडावर आली होती, पण त्यांना गर्दी काही खेचता आली नाही. निवडणुकांचा बाजार संपताच अ-विष्णुअवतारी खेडेकर, मेटे आदी मंडळीच्या तोंडून आरक्षणातला "आ" देखिल परत ऐकायला आला नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वरळी च्या सी लिंक वर स्व. राजीव गांधीनी स्व. स्वा. वीर सावरकरांवर कुरघोडी केली. अगदी डॉ. आंबेडकर, पुं. ल. देशपांडे आदी रेस मध्ये होते पण परत एकदा महाराष्टाची पवार, चव्हाण, देशमुख यांच्या साक्षीने उपेक्षा झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लोकसभेने पवारांच्या रा. कॉ. ला चांगला दणका दिला. राजू शेट्टी आणि सदाशिवराव मंडलिक तर हात धुऊन पवारांच्या मागे लागले होते. लवासा उर्फ लेक सिटी, अजितदादांचा हवामहल,सडका गहू, महागाई, कर्जमाफी, ऊसाची टिपरं, (मोफत? )वीज, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कैक मुद्दे पवारांना गुद्दे देत होते, आता पवार संपताहेत की काय असं वाटत होतं पण विधानसभेला सावरले ते. खा. पद्मसिंह पाटलांना वर्षाच्या मध्यावर थोडासा मनस्थाप भोगावा लागला. पण आता ते वरदहस्तामुळे सुखरूप बाहेर निघताहेत असे दिसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पैसा, फोडाफोडी, उसनवारी आणि निवडून येईल त्याला उमेदवारी ह्या गोष्टीचा महाराष्टाच्या राजकारणात यावर्षी चंगळवाद झाला. बराच तरून वर्ग यावर्षी राजकारणात सक्रिय झाला. ( तरुण म्हंजे राजकारण्यांची मुले एवढाच अर्थ) नितेश राणेंचा (आणि त्यांची कुठलीशी संघटना आहे तिचा) इथे विशेष उल्लेख करावा लागेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;२३ ऑक्टोबरला सकाळपर्यंत उद्ववाचेच सरकार येणार असे वाटत होते पण दुपारी ते गाजर आहे हे स्पष्ट झाले. जनता जनार्धानाला परत आघाडीचेच "अजब" सरकार हवे होते. सेनेसाठी २००९ २००४ सारखाच दुर्दैवी ठरला, तर ह्याच वर्षी राजठाकरेंनी आपली तटबंदी मजबूत असून मनसेचा मारा किती पल्ल्यांचा आहे हेही दाखवून दिले. वर्षभर ते बऱ्याच ठाण्यांना हजेरी लावत फिरत होते. बिहार, उ. प्रदेश, हरियाना इकडून देखिल वर्षभर त्यांना हजेरीसाठी निमंत्रणे येत होती. हिंदी बोलणारे कलावंत मराठी स्टेजवर (उत्सफुर्तपणे? ) यायला लागले आणि न विसरता "मी महारष्टियन आहे" असंही मोडक्या मराठीत सांगायला लागले. हा या वर्षीचा सकारात्मक बदल म्हणावा लागेल. काठ्या वाटपा पासून ते मार खाई पर्यंत अनेक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय आबू आझमींनी हजेरी लावली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नोव्हेंबराला बाळासाहेबांवर टिका केली म्हणून शिवसैनिकांनी निखिल वागळेंना मारले. ते निर्भीड पत्रकार आहेत हे महाराष्टाला यावर्षी पुन्हा एकदा कळले. (९ वेळा हल्ला झाला तरी ते पत्रकारितेचा "हेका" सोडत नाहीत याला म्हणतात निर्भीड.) आम्ही निरपेक्ष, आम्ही लोकशाहीचा चोथा खांब म्हणताना "पेड पत्रकारितेवर" हा निर्भीड पत्रकार एक चकार शब्दही बोलला नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;महाराष्टासाठी अजून एक अभिमानाची बाब घडली. नितीन गडकरींना भाजपाचे राष्टिय अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. आता २०१० मध्ये त्यांनी स्वतःचे पोट कमी करून आपल्याला मान आहे हे दाखवून दिले पाहिजे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;अश्या कैक राजकीय घटना या वर्षी होवून गेल्या. महाराष्टाचा "विकास" झाला असं म्हणण्यासारखं विशेष असं काही ह्या वर्षी घडलेलं&amp;nbsp;दीसलं नाही. वर्ष संपले, महाराष्ट मात्र परत तस्साच राहिला.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-312060617833769930?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/312060617833769930/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/01/blog-post.html#comment-form' title='7 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/312060617833769930'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/312060617833769930'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2010/01/blog-post.html' title='२००९- आले आणिक तसेच गेले.'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-6022413698331715017</id><published>2009-12-28T09:53:00.001-08:00</published><updated>2009-12-28T09:53:39.000-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='देहू'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तुकाराम'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निळोबाराय'/><title type='text'>तुकोबांची देहू</title><content type='html'>ह्या आठवड्याचा शनिवार तुकोबामय होता, अजूनही मनात त्याच गोष्टी घोळत होत्या म्हटलं चला एकदा ते सारं उतरून टाकूयात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आई-दादा,खेडेकर काकू,  रुपालीसह नील, भजन शिकणारी छोटी मंडळी समृद्धी, निशांक, निनाद आणि निर्मिती हि सरासरी दुसरी-तिसरीतील छोटी मंडळी. त्यांना संत तुकाराम पाहायचा होताच पण भंडारा हा डोंगर आहे आणि आपल्याला डोंगरावर जायचे आहे म्हणून आतून खूश होती. भंडारा ला ते वारंवार भराडी म्हणत होते. (भराडी नावाचा एक डोंगर आमच्या गावी आहे म्हणून)&lt;br /&gt;&lt;br /&gt;जिथे तुकोबांची गाथा बुडविली त्याच ठिकाणी साऱ्यांनी पवित्र भावनेने पाणी पायावर घेतले.  जिथे पवित्र गाथा बुडविली, जिथे ती पुन्हा बाहेर आली तिथेच ४-५ देहुकर बाया "तुकारामाशी घेणे-देणे नाही, आमचा धुणं धुण्याशी मतलब" अश्या सामूहिक निर्विकारी भावनेनं गोधड्यांची घाण धुण्याचं कर्म करत होत्या. त्यांमुळे रुपालीने सांगूनही मी पाण्यात उतरलो नाही. दादांनी मुलांना तुकोबरायाची जमेल तसी "बायोग्राफी" सांगायला एव्हाना सुरुवात केलेली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गाथा बुडविल्यानंतर तुकोबराय अन्नपाण्यावाचून १३ दिवस ज्या शीळेवर बसले होते तीही शेजारीच आहे. आता तिथे विठू-माउलीचं छोटंसं मंदिर आहे. "मग गाथा पाण्यात का बुडविल्या? " ह्या मुलांच्या प्रश्नाला मला तितकंसं योग्य उत्तर देता आले नाही पण मी वेळ मारून नेली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्याच्या शेजारी ह, भ. प. पांडुरंग घुले यांच्या प्रयत्नातून साकारलेलं "गाथा मंदिर" आहे. मध्यभागी तुकोबरायांचं ६/७ फूट बैठं शिल्प आहे. मंदिरातील दोन्ही मजल्यांवर गाथेतिल अंदाजे ५००० अभंग कोरलेले आहेत. पण ते वाचणारे फारच कमी होते.  (एवढे अभंग कोरण्यापेक्षा दृश्य (चित्र, शिल्प) स्वरूपात ते लोकांसमोर ठेवले असते तर ते लवकर आणि जास्त लोकापर्यंत पोहचले असते अशी प्रतिक्रिया मी आमच्यातच नोंदवून दिली). नरसिंहाने फाडलेला हिरण्यकशपू, प्रल्हादावरचे अत्याचार,विष्णू, रामाने सेतू बांधण्यासाठी सागरास केलेले आवाहन ही ३ शिल्पे आहेत.. अप्रतिम आहेत ती. पण ह्या शिल्पांचा इथे काय संबंध असा मूळ प्रश्न कैक जणांच्या मेंदूत येतो, माझ्याही आलाच. ( नरसिंह, राम हे विष्णू अवतार आहेत, विठ्ठल म्हंजे विष्णूचेच एक रूप असा मी साधा संबंध लावला, आणि तो खराही निघाला. ) शिल्पांची इत्थंभूत (मला माहीत होती तेवढी) माहिती इतरांना देण्याच काम मी चोख केले आणि इथून बाहेर पाडण्यापूर्वी नील ने माझ्या पैंटवर "ओला प्रसाद" देऊन मला धन्यवाद देण्याचं काम चोख केलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गाथा मंदिरानंतर आम्हाला (मला) निळोबाराय भेटले, तुकोबांचे हे आवडते शिष्य मला तुकोबांपेक्षाही सहज भावले. हेच ते निळोबाराय ज्यांच्या साठी तुकोबा पुन्हा धरतीवर आले होते.  तुकोबांनी सदेह वैकुंठ गमणं केल्यानंतर, इंद्रायणी काठी जिथे गाथा परत सापडल्या होत्या त्याच ठिकाणी संत निळोबाराय तुकोबांच्या भेटीसाठी अन्नपाण्यावाचून बसले. साक्षात विठ्ठल त्याच्या समोर प्रकट झाले तर " तुला कुणी बोलावले?, मला फक्त माझ्या तुकोबांनाच भेटायचे आहे" म्हणत त्यांनी डोळे बंद केले. आणि शेवटी तुकोबांना यावंच लागलं. तुकोबांपुढे भगवंतालाही डावलणारा, दुय्यम स्थान देणारा हा निस्मिम भक्त मनाला अलगद भिडला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इंद्रायणीचे पाणी आळंदीपेक्षा इथे मात्र शुद्ध आहे. बोटिंगची सोयही आहे. पण आम्ही ती सोय न वापरता पैसे आणि वेळ वाचवला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इथुनच खेडेकर काकुंनी नील ला "मायेने" खेळणं घेतलं, दोन दिवस झालेत अजून ते त्याने तोडलं नाहि.&lt;br /&gt;&lt;br /&gt;देहुतिल मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरील गरूडावर बसलेल्या तुकारामांकडे पाहताना मुलं "आरे हे ह्या गरूडावर बसून गेलते काय? " म्हणून विचारत होती.  दर्शन जरा घाईतच झाले, पण तुकाराम आणि शिवराय याची जिथे भेट जाली तिथे मात्र मी आवर्जून थांबलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाजारपेठेकडे पाहताना त्या मुंबाजीचा वाडा आणि वंशज पाहण्याची सुप्त इच्छा जाली होती, पण विचारायचे कसे आणि कुणाला हे कळत नव्हते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इंद्रायणीचा वन वे ब्रिज पार करून भंडारा गाठला. मध्येच संत जगनाडे महाराज, ज्यांनी तुकोबारायांचे सारे अभंग लिहले त्यांचे सुदुबरे गाव लागले. घाट मस्त आहे. डोंगरमाथ्यावरून पिंपरी-चिंचवड, चाकण आणि मावळ तालुक्याचा मस्त एरिअल देखावा दिसतो. उत्तरेला भाम डोंगरही दिसतो. ह्याच डोंगरांनी तुकोबांना हवा असलेला एकांत दिला होता.  ह्या दिवसात तिथे सप्ताह चालू असतो. मंडपात प्रवचनकाराचे आध्यात्मिक डोस चालू होते, मंडपाबाहेर आम्ही भेळ-बिस्किटांचा अल्पोपाहार करत होतो. पूर्वी इथे काळ्या कौलांचा मोठा वाडा होता त्यात तुकोबराय, विट्ठल-रुक्मिणी इ. मुर्त्या होत्या. तो जतन करायच्या ऐवजी सरकारने वाडा पाडून सिमेंट मध्ये बिनकळसाचे मंदिर बांधून आपला आध्यात्मिक दृष्टिकोन दाखवून दिला आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चला.... जीवनातिल अजून एक दिवस सार्थकी लागल्याचा आनद अजुनही आहेच.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-6022413698331715017?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/6022413698331715017/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post_28.html#comment-form' title='0 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/6022413698331715017'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/6022413698331715017'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post_28.html' title='तुकोबांची देहू'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-889431928614693670</id><published>2009-12-20T18:32:00.000-08:00</published><updated>2009-12-20T18:56:21.927-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कबीर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='परमात्मा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='तेजाचा उत्सव'/><title type='text'>कबीर- तेजाचा उत्सव.</title><content type='html'>संत कबीर आपल्या मुक्तीचा उत्सव प्रकट करताना म्हणताहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;लाली मेरे लाल की, जित देखू तित लाल।&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;लाली देखन मैं गई, मैं भी हो गई लाल ॥&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div class="separator" style="clear: both; text-align: center;"&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sy7jxNBEujI/AAAAAAAAARE/hoX_UwMZwUk/s1600-h/SupremeFather.JPG" imageanchor="1" style="clear: left; cssfloat: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"&gt;&lt;img border="0" ps="true" src="http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sy7jxNBEujI/AAAAAAAAARE/hoX_UwMZwUk/s200/SupremeFather.JPG" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;जो अनुभवता येतो पण शब्दात उतरवता येत नाही असा ब्रह्मानंद, कबीर इथे रंग-प्रतिमाच्या माध्यमातून साकारताहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लाल रंग म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा उत्सव!! आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, आत्मा हा परमात्म्याचाच साक्षात्कार आहे. हा अपूर्व सोहळा ते फक्त "लाल" रंगाच्या प्रतिमेतून जिवंत करू पाहताहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परमात्मा, परब्रह्म "तेजाचा संचय" आहे. साहजिकच ते तेज साध्या डोळ्यांनी पाहणे किंवा हदयात साठविणे अशक्यच आहे. आणि म्हणूनच प्रत्येक भक्त ह्या "तेजाला" रंग, रूप, आकार, गूण देऊन आपल्या-आपल्या देवतेच्या रूपात पाहतो. (कुणी त्याला ईश्वर, कुणी बुद्ध, तर कुणी येशूचं नाव देतं). तेजाचा साक्षात्कारही मग आपण याच रूपात अनुभवतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेजाचा अनुभव म्हंजे "शुद्धतेचा अनुभव". &lt;br /&gt;&lt;br /&gt;कबीर हे पुर्वजन्मी शुक मुनी होते, त्यामुळे या ज्ञानी संताची सुररवातच निर्गुण साधनेने झाली होती. मुक्ताई, ज्ञानदेव, सौपण, निवृत्ती ह्यांनाही हे ज्ञानपण जन्मताच लाभले होते. हनुमंताने जन्मातच सूर्यबिंबाकडे झेप घ्यावी, उड्डाण घ्यावे असी ही जन्मजात पुण्याई.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अशी हि पुण्याई फार थोड्या महायोग्यांच्या वाट्याला येते. कबीर त्यापैकीच एक. ते प्रभू रामचंद्रांकडे चरित्र, चारित्र्य, गुण यांपुढेही जाऊन एक निखळ ब्रह्मानंद म्हणून पाहायचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परमात्म्याचं तेज पाहता पाहता ते स्वतःच त्यात विलीन होताहेत,...... एकरूप होताहेत........ त्या तेजाचाच एक अंश बनून जाताहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(हा दोहा मला प. पू. आण्णासाहेब मोरे, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी ह्यांच्या आध्यात्मिक लिखाणातून अर्थासह मिळाला, त्यातला सारांक्ष मी देतो आहे. साध्या शब्दांमागे दडलेला प्रचंड अर्थ असंच मी ह्या दोह्याबददल म्हणेन.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सचिन, नारायणांव, पुणे, १९/१२/२००९&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-889431928614693670?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/889431928614693670/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post_20.html#comment-form' title='3 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/889431928614693670'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/889431928614693670'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post_20.html' title='कबीर- तेजाचा उत्सव.'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sy7jxNBEujI/AAAAAAAAARE/hoX_UwMZwUk/s72-c/SupremeFather.JPG' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-7702216900301391156</id><published>2009-12-16T03:58:00.001-08:00</published><updated>2009-12-16T03:58:58.424-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कबीर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मुंडण'/><title type='text'>कबीर -बारबारके मुंडने भेड न बैकुंठ जाय.</title><content type='html'>.&lt;br /&gt;मुंड मुंडाए हरी मिले सब कोई ले मुंडाय,&lt;br /&gt;बारबारके मुंडने भेड न बैकुंठ जाय.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा "मुंडणावरिल" अजून एक दोहा आमचे एक मनोगती शरद कोर्डे यांनी अर्थासह सुचवला. मलाही तो खूपच आवडला.&lt;br /&gt;मुंडण (हजामत) करून परमेश्वरप्राप्ती होत असेल तर सर्वांनी मुंडण करावं. (पण लक्ष्यात घ्या) वारंवार केस (लोकर) कापल्याने (कापूनही) मेंढी स्वर्गाला जात नाही.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;इथेही कबीर साधे, रोखठोक आणि सहज पटणारे उदाहरण देऊन प्रबोधन करताहेत की वैकुंठप्राप्ती साठी असल्या कर्म-कांडांची काडीमात्र गरज नाहीये. त्यात उगाच जीवन व्यर्थ घालवू नका.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)&lt;br /&gt;&lt;br /&gt;सचिन, नारायणगांव, १6/१२/२००९.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-7702216900301391156?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/7702216900301391156/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post_16.html#comment-form' title='1 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/7702216900301391156'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/7702216900301391156'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post_16.html' title='कबीर -बारबारके मुंडने भेड न बैकुंठ जाय.'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-141811879123571391</id><published>2009-12-10T17:45:00.001-08:00</published><updated>2009-12-10T17:52:34.028-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कबीर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Kabir'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='doha'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='दोहा'/><title type='text'>कबीर- केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार.</title><content type='html'>केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार&lt;br /&gt;&lt;br /&gt;मन को काहे न मुंडिए, जामें विषे विकार.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कबीर ह्या दोह्यातून समाजप्रबोधनाबरोबरच तत्कालीन दृष्टचालीरितींवरही टिका करत असावेत असे वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कबीरजी वेद, कुराण, धर्म ह्या गोष्टी बाजूला ठेवून, निसर्गनियमाला धरून आपल्या स्वतःच्या तर्काने प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करायचे. त्यांचा जन्म जरी ज्ञात नसला तरी कालावधी १४४०-१५१८ हा होता. त्याकाळी स्त्री विधवा झाल्यास, भावकीतिल कुणी मृत झाल्यास किंवा कुठल्याही धार्मिक हेतूने मुंडण करणे बंधनकारक होते. चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथातही दीक्षा घेतलेल्या साध्वींना मुंडासे करावे लागते. क्रित्येक भट-भिक्षुकही ज्ञानधारनेसाठी मुंडण करीत. केस अपवित्र झालेत, सुतकी झालेत म्हणून धर्म सांगतो म्हणून आपण त्यांचे मुळासकट उच्चाटन करतो, तेही वारंवार. पुजारीही देवप्राप्तीसाठी सदैव मुंडण करतात.  कबीर नेमकेपणाने इथेच बोट ठेवताहेत. तसं पाहिले तर केसांनी शरीराचं काहीही बिघडवलेलं नसते, तरीही आपण आपलं पावित्र्य, इस्वरप्राप्ती, ध्यान-ज्ञान इ. इ. साठी विनाकारण केसांचे उच्चाटन करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण... त्याच शरीराचा एक भाग असलेलं मन की ज्यात वेळोवेळी दूषित, अपवित्र, विषारी, विषयी (भौतिक) विचार जमा होतात. षड्रिपूंचे वास्तव्य तेथेच असते.  अध्यात्माच्या सानिध्यात गेल्याने तात्पुरते हे सारे मनविकार साफ होतातही पण पुन्हा ते जोमाने वाढू लागतातच. आणि म्हणूनच केसांना दोष देत त्यांचे शंभर वेळा मुंडण करण्यापेक्षा ह्या विषारी मनाचे सतत मुंडन व्हायला हवे, मगच तुम्ही पवित्र व्हाल, ईश्वराच्या जवळ जाऊ शकाल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)&lt;br /&gt;&lt;br /&gt;सचिन, नारायणगांव, ११/१२/२००९.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-141811879123571391?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/141811879123571391/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post_10.html#comment-form' title='2 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/141811879123571391'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/141811879123571391'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post_10.html' title='कबीर- केसों कहा बिगाडिया, जे मुंडे सौ बार.'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-1602127636930125209</id><published>2009-12-05T06:25:00.000-08:00</published><updated>2009-12-05T06:33:24.770-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चक्की'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कबीर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Kabir'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='chakki'/><title type='text'>कबीर - चलती चक्की देखकर ..</title><content type='html'>&lt;strong&gt;चलती चक्की देखकर दिया कबीरा रोए,&lt;br /&gt;दुई पाटन के बीच में शाबुत बचा ना कोए.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कबीर ह्या दोह्यातून निसर्गाचं एक विदारक पण वास्तववादी सत्य मांडताहेत. चक्की म्हंजे &lt;span class=""&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SxpumSn4zCI/AAAAAAAAANw/0L3V9mc_jiY/s1600-h/chakki.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5411759506352294946" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 99px; CURSOR: hand; HEIGHT: 140px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SxpumSn4zCI/AAAAAAAAANw/0L3V9mc_jiY/s320/chakki.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;जाते&lt;/span&gt;, जे जुण्याकाळात धान्य दळण्यासाठी वापरलं जायचं. त्याला दोन पाटे (पाटन किंवा चाके) असतात, एक जमिनीत स्थिर असते तर दुसरे त्यावर गरगर फिरत असते. चलती चक्की प्रमाणे हे जीवन गतिमान आहे, आणि त्यात शाश्वत असे काहीही नाही. सारं काही त्यात भरडले जाणार आहे, असाच साधा अर्थ आपणास कळतो.&lt;br /&gt;पण.....,&lt;br /&gt;कबीरा फिरणारं जातं पाहून रडताहेत कारण..... ..&lt;br /&gt;त्यांना याद्वारे निसर्गातील एक अन्यायकारी सत्याची जाणीव झालीय. पृथ्वी आणि आकाश या निसर्गाच्या दोन चाकांमध्ये जे काही येईल मग सुख- दुःख, प्रेम-राग, न्याय-अन्याय, मान-अपमान सारं काही भरडून निघणार आहे. इथे दुर्जनाबरोबर आणि "दुर्जनांप्रमाणेच" सज्जनाचाही शेवट ठरलेला आहे. (सुक्या बरोबर ओलं ही जळते) दोघांनाही अंतिम न्याय एकच आहे. निसर्गाची गती शाबूत ठेवण्यासाठी हा "बदल" आवश्यकच आहे ह्या अगतिकतेमुळे कबीरांना वाईट वाटते आहे.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;जीवनातील अश्वाश्वतता आणि गतिशीलता दाखविण्यासाठी सामान्य, साध्या जात्याचं उदाहरण देतात. बऱ्याच वेळा ते बहिणाबाईंसारखेही वाटतात.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;em&gt;(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ मी देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)&lt;/em&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-1602127636930125209?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/1602127636930125209/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post_05.html#comment-form' title='5 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/1602127636930125209'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/1602127636930125209'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post_05.html' title='कबीर - चलती चक्की देखकर ..'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SxpumSn4zCI/AAAAAAAAANw/0L3V9mc_jiY/s72-c/chakki.jpg' height='72' width='72'/><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-8607720922268370278</id><published>2009-12-04T09:41:00.000-08:00</published><updated>2009-12-05T04:35:28.970-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कबीर'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Kabir'/><title type='text'>कबीर- तेरा साई तुझमें.</title><content type='html'>जैसे तिल में तेल है जो चकमक में आग,&lt;br /&gt;&lt;br /&gt;तेरा साई तुझमें है तू जाग सके तो जाग.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;कैक वर्ष माणूस देव, अंतिम सत्य, आत्मा या गोष्टी शोधू पाहतो आहे, कबीरजीं ह्या दोहयातून भगवंत आहे, आणि त्यापर्यंत पोहचता देखिल येते, हे सत्य सउदाहरण सांगताहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जसं बि (तिल) मध्ये तेल असते, ते आपणास बाहेरून दिसत नाही. तसेच गारगोटी (चकमक) बाहेरून निर्जीव वाटते, पण एकमेकांवर घासल्यास त्यातून आगीच्या ठिणग्या बाहेर पडतात. म्हणजे गारगोटिच्या आतही ऊर्जा, चैतन्य असते आणि तेच अंतिम सत्य आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अगदी त्याचप्रमाणं, तू ज्या ईश्वराला शोधण्यासाठी अहोरात्र, दाहिदिशा फिरतो आहे,  तो तुझ्या आतच आहे. आणि म्हणून तू जागा हो,  स्वतःच्या मी पणातून बाहेर ये, आणि तुझ्या आत, अंतर्मनात त्याचा शोध घे. तुझं बाह्य रूप म्हणजे तू नाहीसच हे तुला आपसूक उमगेल. हनुमंताने नव्हते का त्याच्या प्रभूला अंतर्मनातच शोधले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ईश्वर बाहेर सापडणे अशक्य आहे कारण तो आपल्या आतच वास्तव्यास आहे.  त्याला इतरत्र शोधण्यात मिळालेलं जीवन वाया घालवू नकोस, अन्यथा तू सदैव असत्याच्या गाढ झोपेतच राहशील अशी "जाग सके तो जाग" म्हणून दाट समजही देताहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चला आपणही दिवसातून कधीतरी, दोन क्षण का होईना अंतर्मनातील ईश्वराला शोधण्या साठी नक्की देऊयात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(कबीरजींच्या दोह्याचा मला भावलेला, उमगलेला अर्थ मी देतो आहे, आपण त्यात मौलिक भरही टाकू शकता)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-8607720922268370278?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/8607720922268370278/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post_04.html#comment-form' title='1 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/8607720922268370278'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/8607720922268370278'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post_04.html' title='कबीर- तेरा साई तुझमें.'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-2220254675456224313</id><published>2009-12-03T09:09:00.000-08:00</published><updated>2009-12-03T09:12:28.703-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नील'/><title type='text'>नील - वय वर्षे ६ महिने.</title><content type='html'>नील, आता सहा महिन्याचा झालाय. सहा महिने चिमणपाखरासारखे कसे भुरकणं निघून गेले हे कळलेच नाही. तो या जगात प्रवेशीत व्हायच्या अगोदरच आम्ही त्याचं नाव ठरवून ठेवलं होतं, कसे कुणास ठाऊक पण रुपालीला (प्रत्येक स्त्री प्रमाणे) मनोमन वाटायचं की मुलगाच होणार म्हणून. आमच्या घरातील साऱ्या मुलांची नावे "नि" ने चालणारीच आहेत, म्हणजे निशांक, निनाद, निर्मिती...... आणि आता नील.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;नील म्हंजे निळा किंवा एक रत्न असा साधा अर्थ माझ्या मनी होताच. त्याच बरोबर नल-नील ह्या रामायणातील व्यक्तिरेखाही आहेत. पुराण काळात भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ज्ञ होते. ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते होते.  प्रभू श्रीरामाला लंकेत प्रवेश करण्यासाठी "रामसेतू" बांधण्याची संकल्पना पुढे आली. रामसेतू बांधण्याचं कार्य नल आणि नील या वास्तुतज्ञांनी विश्वकर्माच्या मार्गदशनाखाली केलं होतं. स्वर्गाचा अधिपती इंद्र याच्या कानातील मण्याला "नीलमणी" किंवा "नील" असही म्हटले जाते.&lt;br /&gt;हनुमंताने संजीवनी वनस्पती साठी द्रोणागिरी पर्वत उचलून नेताना त्याचा काही भाग खाली पडला, तो पडलेला भाग म्हंजे "पुरंदर" किल्ला. पुरंदर म्हंजे इंद्राचेच एक नाव. पुराणात या किल्ल्याचा उल्लेख "इंद्र नीलपर्वत" असाच आहे.  पुराणकालीन संदर्भ असल्याने आम्ही हेच नाव फिक्स केलं. तसेच नील आर्मस्ट्रॉग, नील मुकेश हि आलिकडची नावेही माहीत होतीच.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;३ किलो असलेला नील आज ७ किलोचा झाला आहे. सुरवातीला तो नुसताच प्रकाशाच्या दिशेने टक लावून पाहायचा,  आवाज झाला की जागीच हालायचा. आता मात्र आवाजाचा दिशा हि तो ओळखतो आहे. आपल्याला "नील" म्हणतात हेही तो ओळखतो, कारण नील म्हटलं की तो नक्की वळून पाहतोच आणि हलकंसं हसून किंवा हुंकार देत प्रतिक्रियाही देतो. एकटाच छताकडे पाहत खेळत बसतो,रडणं अगदीच कमी. पण आता हळूहळू हट्टी व्हायला लागलाय, त्याच्या हातातील वस्तू, खेळणं काढून घेतलं की त्याला प्रचंड राग येतो. बाहेर, टेरेसवर फिरायला नेलं की येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईट-टेललाईट त्या दिसेनाश्या होईपर्यंत पाहत राहतो. आई त्याला कसली तरी बडबड गीतं (स्वतःच्या रचना) एकवीत असते. म्हंजे "कावू, कावू ये ये, नीलला खाऊ दे दे वैगेरे वगैरे.  तसा तो ओळख विसरत नाही, परवाच माझे वडील २ आठवड्यांनातर आले होते, त्यांच्याकडे कित्येक वेळ विचित्र नजरेनं पाहत होता, ओळख आठवण्याचा प्रयत्न करीत होता, ओळखल्या नंतर मात्र बाबांशी जाम हसायला, खेळायला लागला. कानाजवळ हलूच आवाज केला तर लहान मुलं झोपेत देखिल हसतात हे एक नवलच आहे.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;ऑफिस मधून घरी गेल्यावर मी त्याला झोपेतून हमखास जागा करतो, आणि मग त्याची झोप मोड केली म्हणून त्याच्या आईचा शाब्दिक मार खातो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-2220254675456224313?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/2220254675456224313/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post.html#comment-form' title='5 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/2220254675456224313'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/2220254675456224313'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/12/blog-post.html' title='नील - वय वर्षे ६ महिने.'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-8969379461530290935</id><published>2009-11-26T19:14:00.000-08:00</published><updated>2009-11-26T19:18:56.132-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कल्पी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आधार'/><title type='text'>आधार</title><content type='html'>&lt;em&gt;[कल्पी नामक ओर्कुटिने याचा पूर्वार्ध लिहिला होता.... मी माझ्या मनातील "हा" उत्तरार्ध त्यास जोडला. कारण कुटुंब, बायका-पोरं, आई-वडील यांच्या साठी वेळ न देता कामात अहोरात्र व्यस्त राहणाऱ्यांवर माझा राग आहे.... ]&lt;/em&gt;&lt;br /&gt;.&lt;br /&gt;राजन खूपच महत्त्वाकांक्षी बनला होता. स्वतःचा टुमदार बंगला त्याला स्वप्नात दिसायचा. कधी स्वतःच्या गोल्डन बेंझ मधून, अनिता आणि संपदांसह भरधाव धावेल असे त्याला झाले होते. त्याच साठी त्याला पैसाची आस लागली. एप्रिल जवळ आला होता.  बिचारा राब राब राबायचा, रात्री उशिरा घरी यायचा, जेवणाच्या टेबलवारही लैपटोप वर कामात मग्न असायचा. तसं त्याचं अनितावर उतू जाईपर्यंत प्रेम होते. पण त्या साठी त्याच्याकडे सध्या वेळ नव्हता. बॉसनेही मग राजनच्याच बोकांडी जास्तीत जास्त कामाचे ओझे टाकायला सुरुवात केली. कंपनीच्या अपेक्षा पूर्णं करणे अवघड होवू लागले,  ओझ्याने राजन चे शरीर चेपले, अन मानसिक ताणाने मन. त्याला धड झोपही लागणे अवघड होवू लागले. राजन जाळ्यात पुरता गुरफटून गेला. तरीही त्याचे अनितावर प्रचंड प्रेम होते. आपलं सैंडवीच होतेय हे त्याला बोचत होते. त्याच स्वप्न त्याच्या पासून दूरदूर पळत होती, मृगजळा सारखी.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;अश्याच एका रात्री उशिरापेर्यंत थांबून तो घरी जात होता. आज बॉसने त्याची खरडपट्टी केली होती. नको तितकी, नको त्या शब्दात. तरीही त्याला मूग गिळून थांबावे लागत होते.  डोळे चरचरत होते, रस्त्याच्या प्रकाशानेही डोळे चमकायचे, दुखायचे. पुढचं दिसायचंही नाही.  कंपनीच्या कार मध्ये बसताना मात्र त्याला आज काहीतरी भयानक रुतत होतं.... अनिता, संपदा, घर यांजबरोबर आपल्या स्वप्नांपासून प्रचंड दूर गेल्याची घरघर त्याच्या मेंदूत चालू झाली. मनावर हरल्याचा दबाव येऊ लागला....आवेगाने त्याच्या मनाचं संतुलन ढासळत होतं, परत सावरतं होतं. वेग वाढतोय, नव्हे तो नेहमीपेक्षा किती तरी जास्त आहे हे त्याच्या ध्यानी येण्याइतपत शांत तो नव्हताच. कुठल्याश्या दबावानं मन मोकाट सुटलं होतं. पिसाळलेल्या कुत्र्यासारखं.....सुसाट, दिशाहीन, तंद्रीत........  आणि अचानक समोरून येणाऱ्या डंपरचा हेडलाईट राजंनच्या डोळ्यावर चमकला. स्वप्न, वेग, मन सारं त्याच्या नियंत्रणाबाहेर गेलेलं होतं, केव्हाच..!!!&lt;br /&gt;स्वप्नांच्या aया जीवघेण्या प्रवासात केव्हा थांबायचे, केव्हा परतायचे हे त्या बिचाऱ्याला कळलेलंच नव्हते.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;आज, दोन वर्षांनी, अनिता पडवीत उभी राहून झाडाभोवती गुरफटलेल्या वेलीकडॆ बघत होती. नाजुक वेल आधार मिळाला म्हणून सरळ सरळ वाढायला लागली नाहीतर जिकडे रस्ता मिळेल तिकडे बेधुंद माणसाप्रमाणे पसरली असती.&lt;br /&gt;वेलीला आपली सर्वात जास्त आणि नितांत गरज आहे हे त्या झाडाला पक्कं माहीत असावं, नाहीतर "आधाराविना" ती वेलही जमिनीवरच विखुरली असती.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;सचिन, नारायणगांव, पुणे, २७/११/२००९&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-8969379461530290935?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/8969379461530290935/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/11/blog-post_26.html#comment-form' title='0 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/8969379461530290935'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/8969379461530290935'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/11/blog-post_26.html' title='आधार'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-1333277662476636182</id><published>2009-11-24T21:37:00.000-08:00</published><updated>2009-11-24T21:44:38.407-08:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='IBN लोकमत'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='निखिल वागळे'/><title type='text'>निखिल वागळेंची पत्रकारिता?</title><content type='html'>निखिल वागळेंना मी जेव्हा पासून पाहतोय, वाचतोय तेव्हांपासून मला ते "क्वचितच" कधीतरी निःपक्षपाती वाटले. काही ठराविक लोकांबद्दल ते नेहमीच पुर्वग्रहदोषानेच आणि राजकीय हेकेखोरपणे बोलतात. सामनाही निःपक्षपाती नाही पण तो तसे असल्याची खोटी भूलही देत नाही.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;काल निखिल वागळेंवर झालेला हल्ला (जो कधीतरी होणारच हे पक्के होते) हा समस्त त्या जातीच्या प्रत्रकारितेवर झालेला हल्ला होता, जी पत्रकारिता तोंडपाटीलकी करत आपलीच सत्ता चालवू पाहते. सातत्याने एकालाच टीकेचे लक्ष करते, ठराविक पक्षाला झुकते माप आणि एखाद्या पक्षाचा द्वेष. बातमीचे, एखाद्या घटनेचे यथार्थ(जसेच्या तसे) वर्णन देतानाही स्वतःच्या मनाचे कलुषित रंग त्यात "बेमालुमपणे" मिसळूनच दिली जाते. विश्लेषण, विवेचन, निष्कर्ष, उपाय सारं काही हेच करून मोकळे होतात. जनता फक्त पाहतच राहते. जनतेच्या रोजच्या जेवणात हळूहळू पण सातत्याने हा विष प्रयोग केला जातो आहे. स्वतःला "बुद्धिजीवी" आणि "निःपक्षपाती" म्हणवून घेणाऱ्या ढोंग्या पत्रकारांनी हे ध्यानी टेवावे. इतके दिवस वागळे सेना, भाजपा, बालासाहेब, मनसे, उद्धव, राज यांच्यावर हल्ला करत होते, काल सेनेने वागळेंवर हल्ला केला. वागळेंनी दूषित शब्दांनी हल्ला केला तर सेनेनं काठ्यांनी.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;माझी ही ९ वी वेल आहे मार खाण्याचे असे ते गौरवाने सांगत होते, प्रत्येक वेळी आपलीच "धुलाई" का होते ह्याचा त्यांनी जरा "मी" पणाच्या बाहेर येऊन विचार करायला हवाच. पत्रकारिता म्हंजे खूप सोज्वळ मार्ग आहे असे आजचे चित्र बिलकुल नाही, पेड पत्रकारिता हा यांचा पैसा कमाविण्याचा सोपा मार्ग. पैसे घेऊन हे एखाद्याला प्रतिष्ठित बनवून जनतेपुढे पेश करतात तर एखाद्याला प्रतिष्ठितावर चिखल फेक करतात. पुढारीच काय पण पोलिसाकडूनही बंद पाकिटं घेणारे चालू पत्रकारही मी पाहिलेत. आम्ही म्हंजे स्वच्छ, आम्ही म्हणजे लोकशाहीचा ४था स्तंभ, म्हणत यांची मिलिभगत चालू असते. त्यांच्या विरुद्ध आवाज उठविला की सारे "स्वातंत्र्य" नावाखाली एकवटतात. वागळेंनी तर सरळ मुख्यमंत्र्यांना "राजकीय" दम भरला आहे की राऊतांना अटक करा नाही तर मी याला राष्टिय नाही तर आंतरराष्टीय इश्यू बनवील.&lt;br /&gt;मराठी संपादकावर हल्ला, मराठी वाहिनीवर हल्ला, मराठी पत्रकार, मराठी केमेरामन, मराठी रिसेस्पशनिष्टवर हल्ला असं वारंवार ओरडून ते "हा हल्ला मराठी माणसावर आहे" असे काहीतरी "भासवत" होते ... ढोंगी पत्रकारिता म्हणतात ति हिच.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;वागळेने त्याच्या पत्रकारांना चिथवणी दिली आणि नतर त्यांनी काही शिवसैनिकांना मारहाणही केली.&lt;br /&gt;सेनेला हिंसावादी आणि स्वतःला वागळे अहिंसावादी म्हणवितात ना मग एका गालात मारली तर त्यांनी दुसरा गाल पुढे करायला हवा होता. याउलट ते आपल्या कामगारांनी शिवसैनिकांना मारून जश्यांस तसे उत्तर दिले हे अभिमानाने सांगत होते. याचा अर्थ इतर र्वेळी जे स्वतःकडे गांधीजीच्या तत्त्वाची मक्ते दारी घेतात आणि तोंडपाटीलकी करतात, तेच खरे ढोंगी आहेत..&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;सचिन, नारायणगांव, पुणे, २३/११/२००९.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-1333277662476636182?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/1333277662476636182/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/11/blog-post.html#comment-form' title='5 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/1333277662476636182'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/1333277662476636182'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/11/blog-post.html' title='निखिल वागळेंची पत्रकारिता?'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-4333879016934541347</id><published>2009-10-08T06:14:00.000-07:00</published><updated>2009-10-08T06:35:17.477-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='जाहीरनामा'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आघाडी'/><title type='text'>जाहीरनामा-- - रद्दीत जमा.</title><content type='html'>&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Ss3qK4TCvLI/AAAAAAAAANI/8EiHo-mSb5c/s1600-h/untitled.bmp"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5390221801664199858" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 117px; CURSOR: hand; HEIGHT: 141px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Ss3qK4TCvLI/AAAAAAAAANI/8EiHo-mSb5c/s320/untitled.bmp" border="0" /&gt;&lt;/a&gt;जाहीरनामा म्हंजे तो पाळलाच पाहिजे असे काही बिलकुल नाही. किंबहुना "न पाळणाऱ्या आश्वासनांची जाहीर यादी" म्हणजे जाहीरनामा. (जो निवडणूकीनंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकायचा असतो. )&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;मागच्या जाहीरनाम्यात फुक्कट वीज देतो असा लिखित शब्द आघाडीने दिला होता, पाळला नाही, (फुक्कटच काय पण विकतही २४ तास वीज देण्याची यांची लायकी नाही हे नंतर कळले. ) वर "अश्या थापा निवडणूकीच्या तोंडावर मारायच्या असतात, त्या पाळण्यासाठी थोड्याच असतात" हेही विलासराव आणि सुशिलभाउ या हंसाच्या जोड्याने स्वच्छ अश्या निर्लज्जपणाने हसत सांगितले होते, त्याचबरोबरीने "२००० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करू" हेही आश्वासनही ती "प्रिटींग मिस्टेक" म्हणत झटकले होते, तेव्हाच जाहीरनामा पाळण्यासाठी नसतोच हे आम्हांस पटले. (पण मग, तो का छापतात ते कळत नाही)&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;यावेळी जरा नवीन शक्कली लढवल्यात,म्हंजे मागच्या वेळी गूगली टाकली होती आता गुल्ले पिसलेत.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;जनतेला डायरेक्ट "लखपती" करण्याचे आश्वासन आघाडीने दिले आहे. ३५-४० हजार दरडोई उत्पन्न १ लाखांपर्यंत वाढविले जाणार आहे. (ते कसे? ते अजून ठरविलेले नाही.... शेअरबाजार, सट्टाबाजार, मटका नाहीतर जुगारात पैसा लावला तर १ लाखाचा आकडा नक्की गाठता येईल)&lt;br /&gt;यावेळीही पुन्हा फिरून त्याच भोपळे चौकात येत सालाबादप्रमान "भारनियमन मुक्त महाराष्टाची" घोषणाही त्यात आहेच. (पुढच्या किती निवडणुकांत हे तोंडीलावायला असेल कुणास ठाऊक? )&lt;br /&gt;५ वर्षात १० लाख घरे बांधणार हेही एक आश्वासन आहे. (आणि त्या घरांत ५० लाख जनता राहणार) चांगले आश्वासन आहे पण १० लाख जरा अतीच झाले नाही का? ( कदाचित १ काचे प्रिटींग मिस्टेकंमुळे १० झाले असावेत, तरीही हि मिस्टेक मतदानानंतर मान्य करणार असतील)&lt;br /&gt;पर्यावरणाचा समतोल राखला जाईल असाही एक विचित्र मुद्दा त्यात घुसडलेला आहे, तो कशासाठी हे काही मला कळले नाही बुवा. (म्हंजे मतांचा आणि त्याचा संबंध असेल असे वाटत नाही म्हणून)&lt;br /&gt;शिवराय, आंबेडकर यांचे सागरी स्मारक उभारणार, हे मात्र छान गाजर दाखवले आहे. पुतळ्यांमध्ये ३००-३०० करोड घालायला पैसा आहे, विदेश दोऱ्यांसाठी पैसा आहे, स्वतःच्या सुरक्षेसाठी पैसा आहे, मग गरीबांना, शेतकऱ्यांना द्यायच्या वेळीच तिजोरीत खडखडाट का असतो बरे?&lt;br /&gt;शेतकऱ्यांना ३% व्याजाने कर्जे देताहेत, अगोदर त्यांची कर्जेमाफीची मागणी तर पूर्णं करा.&lt;br /&gt;मुलींना जन्मताच सव्वालाख रु देणार. (इथेही युतीच्या वचननाम्याची ढापा ढापी) ह्या साठी दरवर्षी कमीत कमी ३०० करोड वेगले टेवावे लागतील याचा विचार कोण करणार?&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;अजूनही बराच २१ कलमी कार्यक्रम आहे, असल्या हास्यास्पद जाहीरनाम्यामुळे आघाडीचाही कार्यक्रम लागू शकतो.&lt;br /&gt;महाराष्टात जी लाखो बेरोजगारांची फौज तयार होते तिच्यासाठी मात्र इथे जागा नाहीच. कदाचित ते सैन्य ते प्रचारासाठी राखून ठेवणार असतील...&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;br /&gt;सचिन, नारायणगाव, पुणे. &lt;/div&gt;&lt;div&gt;(इमेजस सोज्यन्य - ग्रफिटी.)&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-4333879016934541347?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/4333879016934541347/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/10/blog-post_08.html#comment-form' title='3 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/4333879016934541347'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/4333879016934541347'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/10/blog-post_08.html' title='जाहीरनामा-- - रद्दीत जमा.'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Ss3qK4TCvLI/AAAAAAAAANI/8EiHo-mSb5c/s72-c/untitled.bmp' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-4280209953683410503</id><published>2009-10-05T09:36:00.000-07:00</published><updated>2009-10-05T09:43:23.279-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शरद पवार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='रिडालोस'/><title type='text'>रिडालोस - कशासाठी? कुणासाठी?</title><content type='html'>राज ठाकरेंनी मनसे ची स्थापना करून एव्हाना २ वर्षे झाली होती. इथपर्यंत सारं काही आलबेल होतं.&lt;br /&gt;पण.....&lt;br /&gt;"महाराष्ट माझा" म्हणत "मराठीपणासाठी" मनसेने आंदोलने पेटवायला सुरुवात केली आणि हुशार कांग्रेस नेत्यांनी इथेच दुरचा विचार करून सुमडित राजकीय डाव टाकायला सुरुवात केली. हि मराठीपणाची आग "पाहिजे तेवढी" आणि "पाहिजे तशी" फोफावी म्हणून मुद्दामहून कॉग्रेसनेच कारवाई करण्यास वेळ लावला हे सर्वश्रुत आहेच. त्यावर आगीत तेल ओतणारे निरुपम, क्रुपाशंकर यांसारख्या आपल्याच तोंडपाटिल नेत्यांची "वाजती घंटा" अहोरात्र वाजवत ठेवली. ज्या मराठी टक्क्यांच्या भरवशावर शिवसेना आणि राष्टवादी सत्तेच्या जवळ जाऊ पाहत होते त्या मतांचे जास्तीत जास्त विकेंद्रीकरण करून त्या दोन्ही "महाराष्टिय" पक्षांना शह देण्याची हि "तिरकस" चाल होती.&lt;br /&gt;सेना, राष्टवादिनेही या चालीकडे काहीसे दुर्लक्षच केले होते.&lt;br /&gt;पण.......&lt;br /&gt;काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांत मनसेने अनपेक्षित प्रमाणात "मराठी" मते गोळा करून "कांग्रेशची चाल" किती अचूक होती याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कांग्रेस नं. १ तर राष्टवादी चोथ्या स्थानाला फेकला गेला आणि....... शरद पवार खाडकन जागे झाले. राष्टवादिच्या अस्तित्वावर शंका घेतली जाऊ लागली, विलिनीकरणाची मागणीही झाली.&lt;br /&gt;आता....&lt;br /&gt;कांग्रेसच्या या "तिरकस" चालिला, कांग्रेसच्यच तंबूत राहून, काहीतरी " वाकडी चाल" करून शह देणे गरजेचे होते अन्यथा येणाऱ्या विधानसभेत राष्टवादिची घसरणं थांबविणे अवघड आहे हे पवारांच्या ध्यानी एव्हाना आलेले होतेच.&lt;br /&gt;आणि...... मग शोध चालू झाला वाकडया चालीसाठी वापरायच्या घोडयाचा.... घोडाही ठरला आणि चाल हि.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;पवारांनी वाकडी चाल खेळण्यासाठी पटावरचे आपलं नेहमीचं, अगतिक असलेलं प्यादं हातात घेतलं. शिर्डीतल्या दारुण पराभवामुळे का होईना पण, त्यांच्यात शिल्लक राहिलेल्या स्वाभिमानाने (? ) लाचारीवर मात केली होती. कांग्रेसकडून पुरते फसवलो गेल्याची पीर-पीर, धुस-फुस दलित नेत्यांमध्ये चालू होतीच. कॉग्रेसची परंपरांगत असलेली "दलित" आणि मुस्लिम मते तोडण्यासाठी ह्यापेक्षा उत्तम प्यादे आणि ह्यापेक्षा उत्तम वेळ(संधी) ह्या राजकीय डावात नाही हे ओळखूनच ह्या प्यादाला वजिराची वस्त्रे चढवून "रिडालोस" ची स्थापना करवून घेण्यात आली.&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Ssohf8zS3_I/AAAAAAAAANA/Jl6tocjEYfI/s1600-h/kings.gif"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5389156736883154930" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 127px; CURSOR: hand; HEIGHT: 151px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Ssohf8zS3_I/AAAAAAAAANA/Jl6tocjEYfI/s320/kings.gif" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;आता हा वजिर कांग्रेसच्या राजाला शह देण्यास कितपत यशस्वी होतो यावर राष्टवादिचे यशापश बरेच आधारीत आहे.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;"तुम्ही आमची गाय मारली आम्ही तुमचे वासरू मारू" ह्याच साठी हि नवी आघाडी आहे, हि पवारांचीच एक जातीय+राजकीय खेळी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.&lt;br /&gt;पण निवडनुकीनंतर, मनसे शिवसेना-भाजपाच्या वळचनीला आणि आठवले मिळतिल तेवढ्या शिलेदारांसह परत कांग्रेस दरबारी मुजऱ्यास गेले तर पवारांच्या राष्टवादिचे भवितव्य परत दोलायमान होणार हेही नक्की.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(रिडालोस - रिपब्लिकन डावी लोकशाही समिती, नाव मुद्दाम नोंद करतो आहे कारण निवडणुका नंतर हिचे अस्तित्व टिकेल का या बाबत शंका आहे. )&lt;br /&gt;&lt;br /&gt;सचिन, नारायणगाव, पुणे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-4280209953683410503?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/4280209953683410503/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/10/blog-post_05.html#comment-form' title='9 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/4280209953683410503'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/4280209953683410503'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/10/blog-post_05.html' title='रिडालोस - कशासाठी? कुणासाठी?'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Ssohf8zS3_I/AAAAAAAAANA/Jl6tocjEYfI/s72-c/kings.gif' height='72' width='72'/><thr:total>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-7427482177643233851</id><published>2009-10-01T01:23:00.000-07:00</published><updated>2009-10-01T01:45:06.975-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='पुढारी'/><title type='text'>खुडुक पुढारी</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SsRripbhZnI/AAAAAAAAAMw/W0eRCW13f-g/s1600-h/kombadi.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5387549297222968946" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 179px; CURSOR: hand; HEIGHT: 125px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SsRripbhZnI/AAAAAAAAAMw/W0eRCW13f-g/s320/kombadi.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;कर्माने बदल घडो अथवा न घडो, पण काळाचं आपलं स्वतःच संक्रमण नेहमीच चालू असतं. सत्तेच्या खुर्चीची दावेदारी बदलण्याचा किंवा ती टिकविण्याचा काळ असाच दर ५ वर्षांनी येतच असतो... निवडणुक हे सत्तापरीवर्तनाचं लोकशाहीतील एकमेव साधन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मंदिराच्या गाभाऱ्यात घुसताना दारातील कासवाला पायदळी तुडविणे अनिवार्य असते त्याप्रमाणेच सामान्य जनतेच्या भावना, आशा, देव, देश, संस्कृती पायदळी तुडवत भुईसपाट करतच ही राजकीय मंडळी विधानभवनात प्रवेशीत होतात. कोंबडीने अंडी आणि खुडुक राजकारण्यांनी खुर्च्या उबवाव्यात, त्यातून जन्माला आलेल्या त्यांच्या घरंदाज पिलावळींचे मन, मिशरुढ फुटायच्या आतच "बापाप्रमाणेच समाजसेवेला" वाहून घ्यायला हावरट झालेलं असते. काय तर म्हणे कलाकारांची मुले कलाकार, तसेच राजकारण्यांची मुले राजकारणी.. किती सोपं आहे नाही?.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सत्ता पुढाऱ्यावर स्वार झाली की सत्तेमुळे त्याचा मुजोरपणा वाढतो, असह्य गरीबांच्या पाठीवर कोरडे ओढण्यात जो माजलेला उन्मत्त आनंद असतो त्याचा ते पुरेपूर उपभोग घेतात. पुऱ्या मतदासंघात गुंडाराज करून धुमाकूळ घालणारे कैक आहेत. विधानभवनात जनतेच्या प्रश्नांना गावकुशीचा रस्ता दाखवून "थोबाडबंद" राहणारे म्हणजे तर कडीच. एकाच कामाचे आळी-पाळीने श्रेय लाटणारेही अनेक, आणि एकाच रस्त्याचे पाच-पाच वेळा नारळ फोडून "नुसतेच" उद्घाटन समारंभ करणारेही अनेक. "खादाड असे माझी भुख, चतकोराने मला न सुख" हा सदगुण तर फारच "सामान्य" आहे, नव्हे तर तो मूळ स्थायीभावच आहे. त्यामुळे नगरसेवक झाला रे झाला की त्याला आमदार/खासदार होण्याचे भुकेलेले वेध लागलेच म्हणून समजावे.&lt;br /&gt;कुठेतरी वाचलं होतं, लाचारी, हुशारी, मगरुरी, निलाजरेपणा, क्रूरपणा या साऱ्याला दिखावुपणाची फोडणी, सत्यनिष्ठा आणि स्वाभिमान शून्य म्हणजे पुढारी. हे प्रताप साऱ्यांकडेच असतात म्हणूनच की काय "या" पिकाला प्रचंड "गळित" मिळते.&lt;br /&gt;दुर्मिळ असले तरी काही पुढारी अजूनही "बरे" आहेत. त्यातल्या त्यात "बऱ्या" असणाऱ्याला "निवडणे" ह्या उपर आपण काय करावे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;हां.. सत्तापरिवर्तन जनताजनार्दनच करतो, पण सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची ताकद त्यात नसते, तो मूकच असते, बऱ्याच वेळा त्याची मुस्कटदाबी केलेली असते, त्याच्या खडखडाट झालेल्या पेटितं पेश्यांचं दान टाकून त्याच्या कडून मतांचा आशीर्वाद बळजबरीने घेतला जातो. ... मतदार म्हंजे एका रात्रीचा राजा, अन नंतर बोकांडी बोजा हे ठरलेलं.&lt;br /&gt;शेवट काय तर... जनतेसाठी हे सारे खुडुकच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(खुडुक म्हंजे अंडे न देणारी कोंबडी.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;images from- google images.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-7427482177643233851?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/7427482177643233851/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/10/blog-post.html#comment-form' title='1 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/7427482177643233851'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/7427482177643233851'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/10/blog-post.html' title='खुडुक पुढारी'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SsRripbhZnI/AAAAAAAAAMw/W0eRCW13f-g/s72-c/kombadi.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-2478878552648902047</id><published>2009-09-11T10:26:00.000-07:00</published><updated>2009-09-12T09:47:53.094-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शरद पवार'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='राष्टवादी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विधानसभा'/><title type='text'>केविलवाणी राष्टवादी पार्टि. -विधानसभा २००९.</title><content type='html'>&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SqqM5E3X5QI/AAAAAAAAAMQ/hhqsy2PielI/s1600-h/congress-logo.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5380267617033905410" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 75px; CURSOR: hand; HEIGHT: 106px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SqqM5E3X5QI/AAAAAAAAAMQ/hhqsy2PielI/s320/congress-logo.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SqqMhROZu8I/AAAAAAAAAMI/MHb6m5FaTn4/s1600-h/Nationalist_Congress_Party_300.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5380267208034859970" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 77px; CURSOR: hand; HEIGHT: 110px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SqqMhROZu8I/AAAAAAAAAMI/MHb6m5FaTn4/s320/Nationalist_Congress_Party_300.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt; आघाडी व्हावी म्हणून राष्टवादिला आपल्या स्वाभिमानाची सारी कापडे बासनात गुंडाळून कांग्रेसचे उंबरठे झिजवावे लागताहेत. नाहीतरी सत्तेच्या मुजोरपणामुळे त्यांच्या स्वाभिमानाचे घमेंडीत रुपांतर झाले होतेच आणि म्हणूनच २००९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत जनतेने त्यांच्या कपड्यांचे लक्तरात रुपांतर केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लोकसभेच्या जागावाटपापुर्वी राष्टवादिने पवारांना पंतप्रधान पदाचे स्वयंघोषित उमेदवार जाहीर करून, कधी स्वबळाची भाषा करत, तर कधी शिवसेनेशी युती करण्याची धमकी देत कांग्रेसची हुर्ये केली होती. तरीही अवघे ८ (वजा १, म्हणजे उदयनराजे भोसले) खासदार असूनही कांग्रेसने परत शरद पवारांना कृषीमंत्री पद + बोनस २ मंत्रिपदे का दिली हे काही कळत नव्हते.&lt;br /&gt;४ महिन्यांवर आलेल्या महाराष्टच्या विधानसभा निवडुनुका डोळ्यांसमोर ठेवून हे मंत्रिपदाचे जाळे शरद पवारांवर कांग्रेसने फेकले होते.&lt;br /&gt;लोखंडाच्या सळईची एक बाजू बिचकुळ्यात अडकवली की दुसरी बाजू पकडून तिला हवे तसे वाकविता येते. पवारांना मंत्रिपदाच्या बिचकुळ्यात पकडून, राष्टवादिला क्यंटिलिव्हर प्रमाणे वाकविता येईल हे गणित जुन्या जाणत्या कांग्रेसच्या अभियंत्यांनी तेव्हाच केले होते हे नक्की. आघाडी नाही केली तर केंद्रातील मंत्रिपदे जाणार आणि केली तर वाट्याला कमी जागा मिळणार. खिंडीत पकडून आपली कोंडी करण्याचा प्रकार होणार हे ह्या जाणत्या राजाला उमगले कसे नाही हेच कळत नाही.? की पदरात पडणाऱ्या मंत्रिपदांच्या गाजर मोहामुळे त्यांना ते उमगलेच नाही, हे तेच जाणो....&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यावर कहर म्हणून राष्टवादी हा विचारहीन पक्ष, कालबाह्य झालेले बुजगावणे इ. इ. असून त्याचे कांग्रेस मध्ये विलिनीकरण करा असे सल्ले दिग्विजयसिंहा पासून विलासरावापर्यंत साऱ्यांनी यावेळी मुद्दामहून दिले.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;वेगळं अस्तित्व टिकविण्याच्या अट्टाहासाठी आर. आर आणि दादांना बरीच शाब्दिक सारवासारव करावी लागली. जेवणाच्या पंक्तीत वाढपे कमी आणि सूचना देणारे जास्त असा हा एकमेव पक्ष. पवारांनी भरमसाठ पुढारी तयार केले, तेही आपल्या अपेक्षांसह बंडखोरी करणारच.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;सत्ते साठी लाचार, त्यासाठी घेतलेल्या कोलांट उड्या यामुळे राष्टवादी हा टवाळीचा विषय होवू पाहत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;विदर्भ-मराठवाड्यात लोणच्या पुरताच असलेल्या राष्टवादीचा आता पश्चिम महाराष्टातही टांगा पलटी होवू पाहत आहे. ऊस, साखरसाठा, महागाई, किडका गहू इ. चे खापर पवारांवर फुटले आहेच. त्यात पद्मसिंह पाटलांच्या शौर्याची भर.&lt;br /&gt;कांग्रेस कडून कितीही मानहानी होत असेली तरी "धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होवू नये म्हणून आघाडी व्हावी" असा ढोंगी पवित्रा आर आर आबा घेताहेत..&lt;br /&gt;ज्या स्वाभिमानी मुद्द्यासाठी वेगळा पक्ष स्थापन केला तो मुद्दाच केव्हाच गळून पडला आणि अवध्या १० वर्षात त्यांचा स्वाभिमान पार लीन, मलिन झाला.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;या साऱ्याचा फायदा कांग्रेस, आपल्यापद्धतिने पवारांवर कुरघोडी करण्यासाठी न करेल तर नवलच. लालू, पासवान, मुलायम यांच्यावरही थोड्याफार फरकाने हा प्रयोग झालाच आहे..... आणि यशस्वी ही झाला आहे.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-2478878552648902047?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/2478878552648902047/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/09/blog-post.html#comment-form' title='7 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/2478878552648902047'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/2478878552648902047'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/09/blog-post.html' title='केविलवाणी राष्टवादी पार्टि. -विधानसभा २००९.'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SqqM5E3X5QI/AAAAAAAAAMQ/hhqsy2PielI/s72-c/congress-logo.jpg' height='72' width='72'/><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-8570861141359611348</id><published>2009-08-27T06:23:00.000-07:00</published><updated>2009-08-27T06:32:55.303-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Nilu Phule'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Marathi'/><title type='text'>सूर्यास्त - निळू फुले</title><content type='html'>निळू भाऊंचा पिक्चर म्हणजे बेरकी नजर, कुरघोडीचं कुटील राजकारण, सत्तेमुळे मुजोर झालेला गावचा सरपंच, स्वार्थानं माखलेला पुढारी नाहीतर मदमत्त झालेला हरामी पाटील हे गणित फिक्स ठरलेलं. असल्या ऐकाऐक व्यक्तिरेखेचे अनेक पैलू निळू भाऊ साकारायचे. मधल्या काळातील जवळ जवळ प्रत्येक चित्रपटाची कथा सारखीच असायची. निळू भाऊंच्या बऱ्याच चित्रपटात बलात्काराचा सीन हा ठरलेला असायचाच. ह्यावर विनोद करताना निळू भावू म्हणायचे " कथा तिच, बलात्कारही तोच, बाई हि तिच,..... कमीत कमी तिची साडी तरी बदला. "&lt;br /&gt;.&lt;br /&gt;लहानपणी त्यांचे चित्रपट पाहताना चित्रपटागणिक त्यांच्याबद्दलची द्वेषभावना, चीड वाढायची. त्याकाळी गावोगावी पुजा, पाची, बारसे, घरभरणी नाहीच झाले तर गणपतीत पडद्यावर पिक्चर पाहायला मिळायचे. निळू फुलेची पडद्यावर एंट्री झाली की आमचा रक्तदाब वाढायचा, श्वासोच्छ्वास इतका मंद व्हायचा की ह्या निळू फुले नामक व्हिलन पिक्चर मध्ये नसावाच असे वाटायचे, असला तरी त्याचा लवकरात लवकर खात्मा व्हावा म्हंजे आम्हाला राहिलेला पिक्चर स्वस्थपणे पाहता येईल असे मनोमन वाटायचे.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;बाया-बापड्या&lt;/span&gt; तर त्याला सामूहिक शिव्यांची लाखोळी वाहायच्या. आमच्या पदरी त्यांना कधीच आदर नव्हता.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;पण हळू हळू पडद्यावरचा निळू फुले आणि त्यामागचा निळू भाऊ यांत असलेली प्रचंड तफावत जाणवू लागली. कलाकाराचं सामाजिक जगणे कसे असावे याचा सर्वोत्कृष्ट दाखला म्हंजे निळू भाऊंचे जीवन. प्रचंड आणि सदैव सामाजिक जागरूकता असलेला माणूस हि त्यांची खरी ओळख. त्यांचा खलनायक जितका आठवतो तितकेच हळव्या स्वभावाचे, पाणीदार डोळ्यांचे, हसरे निळू भाऊ आज &lt;span class=""&gt;आठवताहेत.&lt;/span&gt;&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SpaJYIbv4oI/AAAAAAAAALo/XG7LIUUPO0Y/s1600-h/nilu.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5374634252986999426" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 261px; CURSOR: hand; HEIGHT: 189px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SpaJYIbv4oI/AAAAAAAAALo/XG7LIUUPO0Y/s320/nilu.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;.&lt;/p&gt;&lt;p&gt;.&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;span class=""&gt;.... त्या सूर्यास्ताला हि चित्ररूपी श्रद्धांजली.&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;सचिन, नारायणगाव, २७/८/२००९ &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-8570861141359611348?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/8570861141359611348/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/08/blog-post.html#comment-form' title='1 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/8570861141359611348'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/8570861141359611348'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/08/blog-post.html' title='सूर्यास्त - निळू फुले'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SpaJYIbv4oI/AAAAAAAAALo/XG7LIUUPO0Y/s72-c/nilu.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-6295136749269265045</id><published>2009-06-03T22:27:00.000-07:00</published><updated>2009-06-03T22:33:15.630-07:00</updated><title type='text'>आणाबाबाच कुत्रं .</title><content type='html'>पाळीव प्राणी किती बहाद्दर, बिलंदर आणि मोकाट सुटलेला असू शकतो याचा भन्नाट नमुना म्हंजे आणाबाबाचं कुत्रं. (आणाबाबा हे त्याच्या मालकाच नाव). दिसायला काळं आणि रगेल करामती यामुळं ते गावंविख्यात झालं होतं. मळ्यातिल सगळ्यांनाच त्याचे कलागुण कलाविष्कारासह पाहायला, अनुभवायला मिळायचे.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;त्यानं त्यांचा सारा श्र्वानबंधुभाव बिघडवलेला होताच, त्यामुळे मळ्यातिल कुत्री त्याला त्यांच्यात घेतच नव्हती. आणि आता मनुष्यजमातीची टवाळी करणे हा नवीन धंदा त्यानं चालवला होता. (कुणी निंदा कुणी वंदा, याची त्याला तमा नव्हती)..&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;अंधारात दूर ढेकळाच्या वावरात बसून ते रात्री बेरात्री आकाशाकडे त्वांड करून बेसुरा राग आळवायला लागलं की चक्क झोपलेले श्रोतेही टक्क जागे होवून बसायचे. आणि "हाड..हाडये,..... याच्यारं आयला,.... आ..य घातली.. या कुत्र्यानं पार वाट लावली झोपेची, तुज्याऱं आता" अश्या शाब्दिक दादींन बरोबर दगडव्रुष्टी ही व्हायची. भोंगा आणि तुतारी यांच्या मधला नाद म्हणजे आनाबाबाच्या कुत्य्राचा जबडा. एक तुतारी द्या मज आणून फुंकीन ती मी स्वप्राणाने (तुतारी फक्त फुटलेली असावी) असला त्याचा नाद....&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिल्या पहिल्यांदा गप्पा मारणाऱ्याच्या सायकलवर मुतायचं, नंतर नंतर तर गप्पा मारत उभ्या असणाऱ्याच्या पायजम्यावर तंगडी (जमेल तितकी) वर करून ओला प्रसाद द्यायला लागलं. पायाला गरम ओलाव्याचा भास होवून सावरायच्या आत गडी दूर पसार...&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;विक्षिप्तपणाचा कळस म्हंजे दुपारच्या वेळी हा गडी शेताकडे निघायचा.... शेतात जेवणं झाल्यावर उरलं सुरलेलं पाटीखाली बाभळीच्या सावलीला झाकून ठेवलेलं असायचं. ज्या वावरात माणसं काम करताना दिसायची त्या वावरात याचा प्रवेश व्हायचा. भल्या मोठ्या मळ्यातही मानसांच्या सुगाव्यानं त्याला पाटी नेमकी सापडायची अन मग ती पाटी ओली केल्याशिवाय हा पुढे जायचा नाही.... कधी कधी जेवायच्या अगोदरच आनाबाबाच्या कुत्र्याचं आगमन-आणि गमणं झालेलं असायचं आणि मग साऱ्या कामगारांची जेवणाची सुट्टी घरी जाऊन जेवण्यासाठी लांबायची... शेतमालक शिव्यांची लाखोळी तर कामगार वरवर मात्र शिव्याच द्यायचे.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;मित्राची आंधळी आई पाटाच्या पाण्यावर भांडी धुवत बसायची, त्याचवेळी हे महाशय नेमकं धुतलेल्या भाड्यांवर मुत्रविसर्जन करून ऍटित तिथून रवाना व्हायचे. पारावर गाडलेल्या पाण्याच्या घागरीवर तर याची विशेष नजर, तिच्यातीलच पाणी पिणार आणि त्या थंड उपकाराची परतफेड म्हणून तिच्यावरतीही पाय वर करून ओला आशीर्वाद देणार..., तर कुणाच्या वाळत टाकलेल्या कपड्यावर डाग पाडणार.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;त्याला चोपायचं म्हटलं तरी तेही कुना नेमबाज्यांस शक्य नव्हते. दगड किंवा दांडकं कसेही मारा तो ते अगदीच आरामात हुकवायचा वर छद्मीपणे हसत तेथेच थांबायचं जेणेकरून मारेकऱ्याचा रागाचा पारा अजून गरम व्हावा..&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;अगदी जसपाल राणाच काय घेऊन बसलात पण सुक्ष्मलक्षभेद करून भुंकणाऱ्या कुत्र्याच्या जबड्याचा भेद डोळ्यावर पट्टी बांधून अर्जुनानाने केला होता.. तेव्हा तिथे आणाबाबाचे हे "श्वान" असते तर त्याने अर्जुनास १०१ टक्के धर्नुविद्यापरीक्षेत नापास केले असते. नेमबाजीचा झालेला गर्व अचुकपने धुळीला मिळवून, अर्जुनाच्या डोळ्याची पट्टी सोडायच्या आत आणाबाबाच्या कुत्र्यानं त्याच्याही भरजरी धोतरावर लघुशंका करण्याचा महाभारतिय आनंद लुटला असता.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;विन्या, मन्या, आन्या, संत्या, पिंट्या (प्राणी संघटनेच्या भीतीमुळे नावांत बदल केला आहे बरका) यांची भाद्रपदाच्या एका सायंकाळी सदर प्रश्नावर बैठक झाली. राजकीय मुसंड्यांपेक्षाही सरस व्यूहरचना करण्यात आली.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;कुत्र्यांच्या प्रणयाचा श्रावणी भाद्रपद असल्याने मळ्यातिल सारेच कुत्रे, कुत्रीभोवतीच लोंढा घोळत असायचे. ठरलं... कुत्रीला रात्रीच्या वेळी दोरीनं शेराच्या झाडाला बांधायचे. साऱ्यांनी दगडं, काठ्या घेऊन चोहोबाजून दबा धरून बसायचं... रात्री ९.३० च्या सुमारास पिठाच्या लोभा पोटी उंदीर जसा पिंजऱ्यात घुसावा तसं आणाबाबाचं कुत्रं चक्रव्यूहात घुसलं आणि कुत्रीशी लघट करायला लागलं... कुत्रीला बांधून ठेवलं म्हणजे नक्कीच काहीतरी काळंबेरं असायला पाहिजे हे त्या गावगुंडाडाच्या ध्यानी आलंच नाही. कामदेवाने त्याला ते सुचू दिलंच नाही.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;मुडात यायची वेळ आणि अचानक साऱ्यांनी अकस्मात प्रकट होवून केलेला हल्ला-बोल यानं त्याची पळता भुई थोडी झाली. साऱ्यांनी त्याला पटकन गराडा घालून मग धू धू धुतला आणि बदड बदड बदाडला...&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;कसं बसं ते वेढ्यातून बाहेर पडलं, तर मागून दगडांचा मारा झाला.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;सारी मंडळी दम लागेपर्यंत खाली पडू पडू हसत होती, आणि आणाबाबाच कुत्रं मग दम लागून तोंडाला फेस येइस्तोवर मिळेल त्या दिशेनं, चुकूनही मागं न पाहत जे सन्नाट पळत सुटलं ते परत कुणा मनुष्य जातीच्या जवळ आलंच नाहीच.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;सचिन, नारायणगाव, पुणे, ३/६/२००९&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-6295136749269265045?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/6295136749269265045/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/06/blog-post_03.html#comment-form' title='0 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/6295136749269265045'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/6295136749269265045'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/06/blog-post_03.html' title='आणाबाबाच कुत्रं .'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-4408954757778164140</id><published>2009-05-23T06:43:00.000-07:00</published><updated>2009-05-23T06:48:35.579-07:00</updated><title type='text'>कृषीमंत्री-क्रिझ सोडताना...</title><content type='html'>काही शेतकरी नुकतेच(२ वर्षापूर्वी) मनमोहनसिंगांना भेटले.हात जोडून ते पंतप्रधानांना म्हणाले " मालक, आम्हाला नोकरी द्या, शेती नकोच,........ जगलो वाचलो तर शेती करता येईल". शेतकऱ्यांनी शेतीविषयी एक चक्कार शब्दही काढला नाही. हि उदाहरणे शेती कोमात चालल्याची नाहियेत तर काय आहे? त्याचा संबंध खचितच वीजखात्याशी आणि क्रुषिखात्याशी आहे हे तर सहज समजायला हवेच. शेतकऱ्यांच्या आत्महतेचा दोष मग ह्यांना नाही द्यायचा तर कुणाला द्यायचा? त्या शेतकऱ्यांच्या झोपडीत शिरून त्यांची चौकशी करावी असेही, ह्या मंत्र्यांना कधी वाटले नाही. पंतप्रधान विदर्भात आले तेव्हा त्यांच्या मागून हे विदर्भात आले....&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;सरदार वल्लभभाई पटेल मान्सून आला की प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना रात्री बेरात्री फोन करून विचारायचे, "पावूस व्यवस्थित आहे का? पेरणी झाली का? "... आणि विशेष म्हणजे ते गृहमंत्री होते, कृषीमंत्री नव्हेते... वल्लभभाईंची ती तळमळ कृषीमंत्र्यांमध्ये कधी दिसलीच नाही.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;२५ वर्षापूर्वी देशातील ७०% शेतकरी असलेल्या जनतेचा देशाच्या जी.डी. पी. मध्ये वाटा होता ६०%...आणि आज देशातील ६५% जनता शेतीवर अवलंबून असताना देशाच्या जी.डी.पी. मध्ये शेतीच वाटा २५% पेक्षाही कमी आहे, हे मंत्र्यांची खात्यावर किती आणि कशी पकड आहे हेच तर दाखवतेय... काय परफॉरमंस आहे राव? ६% नि शेतकऱ्यानं कर्ज देतो म्हणाला होतात? कुठे आहे ते? विसरला वाटत? साहेब अजूनही महाराष्टातिल ५५% शेतकऱ्यांवर पर हेड सरासरी १६००० रु कर्ज आहे,.. महागडी औषधे, बी-बियांनी, खते, कीटकनाशके, मशागत खर्च मिळून सरासरी ११००० रु उत्पन्न खर्च, आणि उत्पन्न केवळ १५०००, कसं सुधारायचं आम्ही?&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;लवकरच तुम्ही पायउतार व्हाल, पण शेतकऱ्यांच्या मानगुटी वरील ह्या अनुत्तरीत प्रश्नांचं काय? ....&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;ह्या इनिंगची पुरी मैच संपेपर्यंत आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, अगदी एकटक..... मात्र स्कोअर बोर्ड काही हललाच नाहि....&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;आता क्रिझ सोडण्यापुर्वी, जाता जाता एखांदा चोका-छक्का तरी मारा?&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;...सचिन, नारायनगाव, पुणे. 11 may 2009.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-4408954757778164140?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/4408954757778164140/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/05/blog-post_23.html#comment-form' title='3 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/4408954757778164140'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/4408954757778164140'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/05/blog-post_23.html' title='कृषीमंत्री-क्रिझ सोडताना...'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-2508823014958009161</id><published>2009-05-09T07:22:00.000-07:00</published><updated>2009-05-09T08:57:41.711-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='julai'/><title type='text'>एका मावशीची आठवण.</title><content type='html'>जुलै १९९५  ला मी पुण्याच्या अभिनव कला मंदिरात प्रवेश घेतला... पहिल्यांदाच खेड्या-पाड्यातून उच्चभ्रू जगात आल्यावर आपला गावंढळ साधेपणा सतत आपल्या दरिद्री मनाला टोचत असतो, हिणवत असतो। माझ्याही अवस्था या नियमाच्या बाहेर नव्हती. पण त्याबद्दल मी कधीतरी लिहीलच...&lt;br /&gt;.&lt;br /&gt;हा,॥ तर कॉलेजचा प्रवेश घेतला, पण हॉस्टेलाची मात्र सोय होत नव्हती। रिक्षावाल्यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे विद्यार्थी गुह, मराठा हॉस्टेल, अशी दोन चार स्वस्तातील हॉस्टेल पाहिली पण कुठेही सोय झाली नाही. थकलो होतो त्यापेक्षा निराश च जास्त झालो होतो...&lt;br /&gt;शेवटी मी, आई, आणि दादा तिघांनीही खडकवासला गाठला। मामानं "आत्माराम शंकर नलावडे (गुरुजी)" यांच्या नावे एक चिट्टी लिहून दिली होती. "मुलाची वसतिगृहात सोय होईपर्यंत २-३ दिवस तुमच्याकडे ठेवावे. " दादांनी वर्गावर्गात जाऊन नलावडे गुरुजी कोण असी विचारपूस केली, आई तसी त्यांना पुसटसी ओळखायची. दादांनी त्रयस्थासारखी निमुटपने फक्त चिट्ठी पुढे केली. (ओळख नसतानाही "मुलाला ठेवा" अशी विनंती करायलाही त्यांना मुलासाठी कमीपणा वाटला नसता, तरीही चिट्टी मुळे आपलं काम सोपं होईल म्हणून ते बोलले नसावेत. )&lt;br /&gt;गुरुजी पडवीत उभे राहून चिट्टी वाचत होते आणि आई, दादा मूकपणाने त्यांच्याकडे थकलेल्या आशेने पाहत होते। आई-दादांकडे पाहताना मी मात्र केविलवाणा झालो होतो. दादा काही बोलणार नव्हते, आईनेच गुरुजींना ति व इंदुबाई (गुरुजींची बायको) यांच्यातील नात्याची ओळख सांगावी आणि विनंती करावी असे सांगून ठेवलेले होतेच. पण तेही सांगण्याची गरज नव्हती, कारण काकांनी आनंदाने चालेल म्हणत मान हालविली होती. वर्ग सोडून ते आम्हाला घरी घेऊनही गेले. तिथेच चिऊ भेटली.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;नाण्देडफाट्याच्या शाळेत जाऊन लगेच तिघेही इंदुबाईंनां भेटलो। आईला पाहून तिला अनपेक्षित आनण्द झाला. आईला त्या "बाई", तर आई तिला "इंदू मावशी" म्हणून हाक मारायची॥ कुठल्यातरी नात्यानं आइची ती मावशी लागायची... मीही मावशीच म्हणू लागलो. मी तिथे राहणार आहे म्हटल्यावरही तो आनंद तसाच टिकून होता, किंबहुना तिला माझं प्रचंड कौतुकच वाटत होतं. त्याच दिवशी तिनं साऱ्या शाळेत मला कितीतरी कौतुकानं मिरवलं होतं, अगदी हेडमास्तरापर्यंत. ..&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;माझ्या चेहऱ्यावरून आणि डोक्यावरून फिरणारा तिचा तळवा मज आई जैसाच वाटायचा॥ आयुष्यात आक्समातपणे भेटूनही नीस्वार्थपने मदत करणारी नितळ माणसे मिळणे म्हणजे सुदैवच। मावशी-आणि काका मला तसेच होते.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;संध्याकाळी मावशीचा मुलगा मनू भेटला, मनु आणि चिवुताई बद्दल कधितरी वेगळं लिहिलच...&lt;br /&gt;.&lt;br /&gt;२-३ दिवसानंतर, पुणे विद्यार्थी गृहात सोय झाली पण काका-मावशीने निक्षून सांगितले की आम्ही याला इथेच ठेवणार, अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळू याला. दादांना वाटायचे हॉस्टेलच बरे उगाच अतिपरिचयात अवज्ञा व्हायची आणि मुलाचा नंतर राग-राग व्हायचा। दादा ऐकत नाहीत म्हटल्यावर काकांनी शेवटी "भेदाचं" शश्त्र काढतं म्हणाले " ठीक आहे, शेवटी तुमचा मुलगा आहे, काय करायचे आहे ते करा पण आम्हांस वाटते इथेच ठेवा। "............. दादांना यापुढे काय बोलावे हे कळेनासे झाले। दोन वर्षे मी तिथे राहिलो पण शब्दच काय पण रागीट नजरेनंही मावशीनं कधी माझ्या कडे पाहिलेलं मला आठवत नाही।&lt;br /&gt;.&lt;br /&gt;सकाळी कालेज असायचे। मला तेच सहाला उठवायचे, पण त्याअगोदर माझ्यासाठी अंघोळीच गरम पानी बाथरुम मध्ये काढलेलं असायचे. अंघोळ होईपर्यंत किचन ओट्यावर चहा, बिस्किटे ठेवून काका बाहेर अंगण झाडायला गेलेले असायचे. ज्या ज्या दिवशी घरात बिस्किटे नसायची त्या त्या दिवसी चहा च्या कपाशेजारी दहाची नोट न चुकता ठेवायचे. माझ्या नकळतच सारं काही निमुटपने व्हायचं, जाताना "जाऊ का काका? " एवढाच प्रातःसंवाद व्हायचा...&lt;br /&gt;.&lt;br /&gt;मावशीला माझ्या चित्रकलेचं खास अप्रूप होतं, शेजारी, सारे नातेवाईक आणि घरी येणाऱ्या प्रत्येकास ति आवर्जून माझा उल्लेख करायची। चित्रे दाखवायची. माझ्या नावानंतर "बाळ" हे विशेषण ति बऱ्याचदा वापरायची, अगदी मायेच्या मायेनं. कपड्यानं पासून ते कुठली भाजी करू इतपर्यंत ती मला सामावून घ्यायची. माझ्याकडून कधी- कुठली अपेक्षा मावशीनं ठेवली नव्हती. माझ्या वागण्या-बोलण्यालाही कधी नावं ठेवली नाहीत. कसं वागावं, काय बोलावं ह्याचेही डोस कधी दिले नाहीत. जीवनाचं कुठलंही मामुलीसं तत्त्वज्ञानही तिने मला ऐकविले नाही. पण एखाद्याला जीव कसा लावावा हे मी तिच्या प्रत्येक वागण्यातून, तिच्यानकळत पाहत होतो, अनुभवत होतो. माझ्यावर तिचे अगणित उपकार आजही आहेत, पण तिनं त्याचं प्रदर्शन कधीच केलं नाही. उपकाराच्या भावनेचा हलकासा स्पर्श देखिल तिला कधी शिवलाच नाही. तिच्या साधेपणानं ह्या साऱ्या "मी" पणाच्या दुर्गुणांवर तिच्याही नकळतपणे मात केली होती.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;मनू आणि चिवुताई ह्या स्वतःच मुलांवर जे तिचे उपजत प्रेम होते तिच सहजता तिने माझ्याबाबतीतही ठेवली होती, सहजतेतून आम्हाला आम्ही सुरक्षित असल्याचा भास व्हायचा। ती सूर्यासारखी नव्हतीच, पण जमेल तेवढा भाग प्रकाशमान करण्यासाठी मिणमिणतं राहणारी पणती मात्र नक्की होती.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;अशी लोभस मानसं सध्या भेटतच नाहीत, आयुष्यातील कैक मित्रांना मी मावशी बद्दल आवर्जून आत्मीयतेने सांगायचो, अजूनही सांगतो। यापुढेही नक्की सांगत राहिला...&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;मावशीच्या देहावर पुष्पहार अर्पण करून तिचे शेवटचे अंतदर्शन घेताना, तिच्या हळव्या तळव्यांच्या प्रेमळ स्पर्शाभास होवून डोळ्यांच्या कडा पुन्हा आपसूक ओलावल्या......&lt;br /&gt;&lt;br /&gt;.......&lt;br /&gt;सचिन, नारायणगाव, पुणे, ९/५/२००९&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-2508823014958009161?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/2508823014958009161/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/05/blog-post_09.html#comment-form' title='1 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/2508823014958009161'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/2508823014958009161'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/05/blog-post_09.html' title='एका मावशीची आठवण.'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-4364476988015680183</id><published>2009-05-04T07:10:00.000-07:00</published><updated>2009-05-04T07:12:52.332-07:00</updated><title type='text'>शिवरायांच्या यशाचे श्रेय</title><content type='html'>"ब्राह्मन नसते तर स्वराज्य मिळाले असते काय, आणि एकतरी हिंदु राजा झाल असता काय?" असे विचार एका मित्राने (अर्थात ब्राह्मण) मांडले। त्यास उत्तर देताना....&lt;br /&gt;.&lt;br /&gt;शिवरायांच्या यशाचे श्रेय तर्कशास्त्र  द्र्य्ष्ट्या  कुणाला द्यावयाचे झाले तर ते शिवरायांच्या स्वतःच्या कल्पकतेला, धैर्याला, संयमाला आणि त्याबरोबरिने असलेल्या उत्कट इच्छेलाच द्यावे लागेल॥ आई-वडील, गुरू, मार्गदशक, संत, देव, दैव, मराठे, मावळे, ब्राह्मण, मुसलमान सरदार, सैन्य गड, किल्ले, सह्यांद्री ह्यांचाही त्यात सहभाग होता। पण म्हणून ब्राहमण किंवा अमुक अमुक नसते तर स्वराज्य मिळाले नसते असे मानणे म्हणजे मानणाराचा फुसका अहंभाव आहे..&lt;br /&gt;.&lt;br /&gt;एकलव्य आणि कर्णाकडे तरी कुठे होते गुरू, राजपद आणि पैसा?   पण तरीही ते शून्यांतून उभे राहिले होतेच ना? विजिगिषू मन असेल तर गड, किल्ले सोडा मानसे देखिल तयार करता येतात..&lt;br /&gt;ब्राहमण नाहीत म्हणून स्वराज्याचे काम थांबले असते असे आपणास वाटतेच कसे॥? स्वराज्य म्हणजे काय सत्यनारायण होता की काय?..&lt;br /&gt;.&lt;br /&gt;शून्य असलेले हेरखाते आणि सागरी आरमार जर महाराज उभारू शकत होते तर "ब्राह्मणी डोकी" तैयार करणे कितीसे अवघड होते? उगाच "सामूहिक मीपणाचा" चा भाव धरणे चुकीचे आहे॥   मी म्हणेन जर ब्राहमानानी राज्य आणि राजकारणात सहभाग घेतला नसता तर त्यांच्या उपजिवेकिचे दुसरे साधन ते काय राहिले असते?   त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असती..&lt;br /&gt;.&lt;br /&gt;। ब्राहमणच काय पण क्षुद्राति-क्षुद्र समाजाचाही सहभाग होता हे अगदी मान्य आहे॥ अगदी प्रामाणिक, निष्टापुर्ण सहभाग होता,..   पण म्हणून "फक्त" ब्राहमण होते म्हनून राजे होते हे फारच एकलांगी आणि विषारी विधान आहे..&lt;br /&gt;.&lt;br /&gt;.... कुठे अनंतात विलीन झाला असाल तेथून थोडा वेळ काढून या... आणि माफी मागून हे विष पसरविणे थांबवा..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-4364476988015680183?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/4364476988015680183/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/05/blog-post_04.html#comment-form' title='4 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/4364476988015680183'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/4364476988015680183'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/05/blog-post_04.html' title='शिवरायांच्या यशाचे श्रेय'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-8519231525492079857</id><published>2009-05-02T02:28:00.000-07:00</published><updated>2009-05-04T08:45:06.734-07:00</updated><title type='text'>शापिताचे मरण अटळ.</title><content type='html'>गेले दोन आठवडे निरस झालेलं रूटीन आजपासून परत पूर्वीसारखं आणि पुन्हा (अर्थात माझ्यामनासारखं) सेट होणार होतं ... मी जाम खूश होतो.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;बातम्यांचा मी जाम शोकिन.. येन निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात माझा टीव्ही कर्णाच्या शापित रथासारखा चालेनासा (निकामी) झाला होता॥ हो हो शापितच झाला होता टीव्ही...&lt;br /&gt;.&lt;br /&gt;ऑफिस आणि रात्रीची झोप सोडून शिल्लक राहिलेला सारा वेळ लक्षभेद टीव्हीचाच करायचो। अगदी जेवताना देखिल लक्षभेद चुकायचा नाही॥ आपल्या पेक्षा दुसऱ्याच कुठल्यातरी भौतिक वस्तूकडे ध्यान लागलंय आणि आपल्याकडे "दुर्लक्ष" होतोय म्हटल्यावर बायकोने त्र्याग्याच्या अभंगाबरोबरिने टाळ कुटणे चालविलेले होतेच.. अधून मधून टीव्हीमुळे आम्हा-दोघात घंटानादही व्हायचा आणि दोन-दोन दिवस निनादत राहायचा.. तरीही मी काही तीवाही कडे पाठ फिरवत नव्हतो... परिणामतः तिने आपला मोर्चा तिच्याकडेच(टिव्हि) वळविला. तो बंद पडावा, फुटावा, त्याला मुंग्या याव्यात असले शिव्या-शाप ती टिव्हिस देऊ लागली... आणि काय आश्चर्य टिव्हिचा एसएमपीएस जळाला आणि टिव्हि बंद पडला... एसएमपीएस नाही तर पुरं कीट जळल्याच मेकॅनिक ने सांगितल्यावर शाप किती मनःपूर्वक आणि अंतःकरणाच्या तळापासून दिले असावेत याचा अंदाज आलाच... मज वेड्याला शेवटी नव्या टिव्हिची सोय करावी लागलि.&lt;br /&gt;।&lt;br /&gt;.&lt;br /&gt;कुठल्याश्या देशात म्हणे झाड तोडायचे असेल तर त्यास तोडत नाहीत तर सारे गाववाले त्या झाडाभोवती गोळा होतात आणि त्यास शिव्यांची लाखोळि वाहतात, आणि ते शापित झाड झिरून झिरून जळून जाते...&lt;br /&gt;.&lt;br /&gt;सत्यता मनोमन पटली.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-8519231525492079857?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/8519231525492079857/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/05/blog-post.html#comment-form' title='0 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/8519231525492079857'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/8519231525492079857'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/05/blog-post.html' title='शापिताचे मरण अटळ.'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-7196251862085875654</id><published>2009-04-26T18:59:00.000-07:00</published><updated>2009-05-04T08:51:21.588-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='sachin gandhul'/><title type='text'>खासदारकीच व्होंटिंग</title><content type='html'>&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SfUSNppSHPI/AAAAAAAAAKA/dWwzF0WbRK4/s1600-h/Indian-elections-villager-001.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5329185759789456626" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 224px; CURSOR: hand; HEIGHT: 157px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SfUSNppSHPI/AAAAAAAAAKA/dWwzF0WbRK4/s320/Indian-elections-villager-001.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;खासदारकीच व्होंटिंग उद्या होणार होतं।&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;.&lt;br /&gt;रात्रीचे १०।३० वाजले असतानाही, मी पुण्याहून आमच्या गर्भवती सौभाग्यवतीसह गावाला जायला निघालो, राजगुरुनगर मधून विकास लाही घेतला. शेवटी हक्काच्या ३ मतांचा प्रश्न होता. &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;.&lt;br /&gt;रात्रीचे ११.०० वाजताहेत न वाजताहेत तोच मोबाईल खणानला,.. गावातून मोठ्या भावाचा फोन.&lt;br /&gt;हालो..&lt;br /&gt;आरं.. कुठं पर्यंत आलाय ?&lt;br /&gt;राजगुरुनगर मध्ये आहे, का रे?&lt;br /&gt;आरे तिकडे भोसरी आणि हडपसर मधी ती लोकं १५००-२००० रु मतांमागे वाटायला लागलेत असं म्हणत्यात? जरा चौकशी कर आन लग्गेच फोन मार आम्हाला?&lt;br /&gt;मीही भोसरिच्या स्थानिक मित्रांना फोन मारले, बातमीला दुजोरा मिळाला, आन आमची चलबिचल चालू झाली।&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;.&lt;br /&gt;रस्त्याने कैक ठिकाणी स्कारपिओ गाड्या आणि त्यांच्या आडोशाला चाललेल्या वाटाघाटी दिसल्या. रात्री १२.३० ला गावात पोहचलो, कार्यकर्ते कट्यावर मतफोडा-फोडी टाळण्यासाठी पहारा देतच होते. मांगवाडा, महारवाडा असल्या वस्त्यांकडे जरा बारकाईने ध्यान द्यावे लागते... नाहीतरी तसेही ते आमच्या बाजूने चालत नाहीतच.. जिकडून पैसा तिकडं उदो उदो हे त्यांचं ठरलेलं. आन आमच्या कडे त्याचा (पेश्यांच्या) सदैव वानवाच.&lt;br /&gt;रात्री दोन सव्वा दोन पर्यंत जागून सकाळी गावात हजर... आम्हाला बूथ टाकण्यासाठी ४००० रु तर विरोधकांना त्यांच्या उमेदवाराकडून १०००० रु मिळालेले. पेश्यांसाठी काम करणारे आम्ही नव्हतोच. नेहमीप्रमाणे उत्फुर्त पणे कामाला लागणारी आमची टीम जमली होती.. स्कार्पिओ, बोलेरो, व्हैन, टु व्हिलर जमेल त्या गाडीवरून वस्त्या-वस्त्यांवरून मतदार गोळा करून बूथवर आणून सोडायचा धडाका चालू झाला... म्हाताऱ्यांना ४-४ वेळा कुठलं बटणं दाबायचं (आणि कुठलं चुकूनही दाबायचं नाही) हे काळजीनं प्रत्येक जणं सांगायचाच.... गायकवाड मळा, धनवाट, झोपडीमळा, खंडागले मळा, थोरात मळा, गावठाण, कधी कधी एका-एका मतासाठी दहा-वीस किलोमीटरची मजल मारायला लागायची तरीही मागे हटायचो नाही... त्यांचा पोलिंग एजंट मतदान केंद्रात काही गडबड करतोय हे कळताच आम्ही सारे तिकडे धावलो.. जाम बाचाभाची झाली. वारंवार केंद्रात घुसून ढवळाढवळ करू पाहणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यायचो. मतदान केंद्रातील रांगेत मत फोडाफोडी होवू नये म्हणून दोन-तीन जन २०-२५ मिनिटांच्या अंतरानं मतदानाला जायचो... ४. ३० वाजता मी मतदान केले. ५ वाजेपर्यंत जास्तीत जास्त म्हणजे ६६ टक्के मतदान करून घ्यायला आम्ही यशस्वी झालो.. मतपेट्या शिलबंद झाल्या "भारत सरकार" च्या महिंद्रा मार्शल मधून पुण्याकडे पार्सल झाल्या... आणि आम्ही निकालापर्यंत (१६ मे)अगदी निर्धास्त झालो.. मुक्ताई च्या समोर छोटी खानी सभा घेऊन साऱ्यांचे आभार प्रदर्शन झाले... साऱ्यांना "झटून" काम केल्याची पावती मिळाली.... आपलाच उमेदवार येणार, अशी साऱ्यांनी अभिमानी अलिखित ग्वाही दिली...&lt;br /&gt;.&lt;br /&gt;सभा संपते ना संपते तोच हळूहळू "थकल्याची" जाणीव झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सचिन, नारायनगाव, पुणे, २३/४/२००९.&lt;br /&gt;फोटो सोजन्य - गुगल. ईमेजेस मधून &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-7196251862085875654?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/7196251862085875654/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/04/blog-post_26.html#comment-form' title='0 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/7196251862085875654'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/7196251862085875654'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/04/blog-post_26.html' title='खासदारकीच व्होंटिंग'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SfUSNppSHPI/AAAAAAAAAKA/dWwzF0WbRK4/s72-c/Indian-elections-villager-001.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-5837957372225353697</id><published>2009-04-15T08:02:00.000-07:00</published><updated>2009-05-04T08:57:50.739-07:00</updated><title type='text'>महामानवाची जयंती</title><content type='html'>काल महामानवाची जयंती झाली।।&lt;br /&gt;.&lt;br /&gt;तत्कालीन समाजाने लाथाडलेल्या पतितांना सामाजिक विषमते विरुद्ध अखेरपर्यंत लढत देत धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय उन्नती साठी आकाशपाताळ एक करणाऱ्या "जीवनाचा" हा जन्म दिन। आंबेडकरांच्या शब्दरुपी असलेल्या जीवनपटावर, विचारांवर, विद्वत्तेवर, व्यासंगावर, बुद्धिजिवीपनावर, त्याचबरोबर निर्दोष असूनही जन्मदोष देत मिळालेल्या विटंबनेवरून आठवणींचा प्रकाशझोत फिरवण्याचा हा दिवस.... पण प्रत्यक्षात संध्याकाळी नशेत तर्र होवून नाचणारी अनुयायी मंडळी पाहिली आणि हि "रिपब्लिकन चळवळ" नेमकी उलट दिशेने चालली आहे ह्याची खात्री झाली&lt;br /&gt;.&lt;br /&gt;सामान्य अनुयायांबद्दल चर्चा सध्या बाजूला ठेवूयात, पण त्यांचे नेते, पुढारी आणि बाबासाहेबांचे वंशज म्हणविणाऱ्यांनीही बाबासाहेबांच्या फक्त नावाचा वापर करीत, बाबासाहेबांच्याच विचाराला, हेतूला स्वार्थ, अभिमान आणि मान-मर्यादे पोटी कधी नकळत तर कधी जाणुंबुजून बगल दिली। आरकक्षनाच्या कुबड्या घेतलेल्या ह्या धडधाकट समाजाला या नेत्यांनी खरेखुरे अपंग बनविले, गेल्या ५७-५८ वर्षात त्यांना घटनेतील आरक्षणाचा उपयोग त्यांच्या समाजा साठी करता आला नाही. किंबहुना समाज शिकला सवरला तर तो आपसूकच आपल्याला दूर ढकलून देईल हे कदाचित ते जाणत असावेत।&lt;br /&gt;.&lt;br /&gt;गरिबीवर मात करत, दिव्याखाली रात्रोंदिन अभ्यास करत बॅरिस्टर होणाऱ्या स्वतःच्या नेत्याचं उदाहरणही हा समाज विसरून गेला. असे असताना मग नुसती :जयंती साजरी करण्यात काय अर्थ राहतो?।&lt;br /&gt;.&lt;br /&gt;१९५७ ला स्थापन झालेला रिपब्लिकन १९५८ ला लगेच फुटला। रुपवते, खोब्रागडे, गायकवाड, गवई, आंबेडकर, आठवले, कवाडे, ढसाळ पासून ते मायावती पर्यंत कैक पक्ष, गट, तट पडले. मतांसाठी कांग्रेस, राष्टवादिनेही रिपब्लिकनांचा पुरेपूर वापर करून घेतला. एक खासदारकी मिळविण्यासाठी सारा पक्ष आणि विचार दोन्ही कांग्रेसच्या दावणीला बांधणारे आठवले, गवई पाहिले की हे बाबासाहेबांच्या विचारांचे रखवाले आहेत की वापरकर्ते आहेत हे शहाण्यास आपसूक समजते॥&lt;br /&gt;.&lt;br /&gt;दलितांचा एक रिपब्लिकन पक्ष असावा हे बाबासाहेबांच्या स्वप्न त्यांच्या जाण्यानंतर लगेचच त्यांच्याच अनुयायांनी तुकडे तुकडे करून टाकले...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-5837957372225353697?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/5837957372225353697/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/04/blog-post_15.html#comment-form' title='0 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/5837957372225353697'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/5837957372225353697'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/04/blog-post_15.html' title='महामानवाची जयंती'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-8757820701070373884</id><published>2009-04-07T09:19:00.000-07:00</published><updated>2009-09-12T09:52:14.218-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='नारायणगांव'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='narayangaon'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='जुन्नर'/><title type='text'>"ना रा य ण गां व"</title><content type='html'>"ना रा य ण गां व" असं लांबचक म्हणायच्यापेक्षा "नाऱ्यांगाव" किंवा त्यातहि सुधारित आव्रुत्ति म्हणजे "नारांगाव".आठवडी बाजारालायेणाऱ्या साऱ्या जुन्नरिंच्या तोंडवळनी पडलेलं. त्याचा प्रत्यय दर शनिवारि चांगलाच येतो..पुण्यात नव्यानेच आलेला एकजण दत्त दर्शनासाठि आपल्या बाईक वर चक्क ८० किलोमीटरचा प्रवास करुन या नाऱ्यांगावला आला तेव्हा त्या बेट्याला "नारायणपुर" आणि "नाऱ्यांगाव" हयातला फरक काय तो आयुष्यभरासाठि कळला. "निरा प्यायची ईच्छा आन चुकुन ताडिच्या दुकानात घुसल्यासारखी ससेहोलपट झाली" अशी भावना त्या सभ्य म्हणवुन घेणार्या माणसाची?.आता नारायणगड जवळ आहे म्हणुन "नारायणगाव" असा माझा समज आहे, पण त्याहिपेक्षा "गणपीर" डोंगर जास्त जवळ असताना "नारायणगड"च का? हे मला अजुनही न सुटलेल कोड आहे..गावाला वेढा देवुन जाणारी मीना नदि म्हण्जे "घाण" वाहुन नेण्यासाठि व लोकांनी "घाण" करण्यासाठि आहे ह्याचा प्रत्यय नदिच्या कडेने हिंडल्यानंतरच येतो. प्रत्येक गावाला गावकुशीचा रस्ता असतो ज्याला सुशिक्षित "बायपास" व गावकरी "गोखाडिचा रस्ता" म्हणतात तो नारांगावात नेमका कुठे आहे ह्याचा मात्र गोंधळ आहे.&lt;br /&gt;पुणे-नासिक हायवेवर असण्याचा बिनचुक फायदा उचलत हया गावाने तालुक्याच्या गावावरहि मात केलि. अगदि कानामागुन येवुन तिखट झालयाप्रमाणे, (तशी इथली मिसळहि तिखटच असते बरका) पण......... .&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sdt9Tp3Pp8I/AAAAAAAAAJw/D08VMfex2Qo/s1600-h/st.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5321985161276925890" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 260px; CURSOR: hand; HEIGHT: 234px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sdt9Tp3Pp8I/AAAAAAAAAJw/D08VMfex2Qo/s320/st.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt; वर्षानुवर्षे अगदि रंगरुपानं काडीमात्रहि न बदलले इथलं एस.टि स्टॅडं म्हण्जे मात्र करमणुकिचाच विषय. त्यातल्या "शेवंता थिएटर्स" च्या बोर्डवर कुठलंया पिक्चरचं (कि हिरोईनच) पोस्टर लागलय ह्यावर पोरांची विषेश नजर. (मुंलिबद्दल आपल्या काय माहित नाहि बुवा) शेजारच्या लिंबाच्या जुनाट झाडांखाली लक्ष्मीनारायण, अलंकार क्लाथ सेंटर किंवा प्रकाशचे माक्याचे तेल असले कसले तरी बोर्ड हमखास लागलेले असतातच, त्यांच्या खालि सावलिपाहुन बसायला जावं तर वर टपुनच बसलेल्या कावळ्यानं त्याचा प्रसाद दिलाच. . . सगळं काही जसंच्या तस्सच!!!! . . . ह्या सगळ्यांची त्यांच्यात्यांच्यातच विचित्र "मॅच्युअल डिपेंडंसी" असावी (नव्हे तर आहेच) अशी माझी खात्रीच आहे..उन्हाळ्यातिल खास आकर्षण म्हण्जे तमाशाच्या राव्हट्या. . . मंगला, रघुवीर(लोक याला रघ्या म्हण्त्यात), पांडुरंग मुळे, भिका-भिमा,तांबे, महाडिक,ढवळपुरिकर, आररर र नुसत्या ४०-५० एका चढ एक बाऱ्या. .ह्या रघ्याच्या तमाशात अमुक अमुक नाचनारि आहे ना ती गेल्या वर्षि नित्या बनसोडेच्या फडात "मुंगळा-मुंगळा" या गाण्यावर धिंगाना करायचि. इतपर्यंत इंत्यंभुत माहिति असणारेही अनेक नगहि नारांगावातच सापडतिल. फडासाठि, लोककलेसाठि उभं आयुष्य कष्ट उपसणाऱ्या "विठाबाई भाउ मांग" हिला "नारायणंगावकर" असं उपपद अदरानं बहाल करणारि तमाशापंढरीहि हिच...&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;strong&gt;.जगप्रसिद्ध ओली भेळ&lt;/strong&gt;"नाऱ्यांगाव" वाचल्यावर मला एका "अनोळखि नाऱ्यांगाववाल्यानं" नाऱ्यांगावची जगप्रसिद्ध ओली भेळ आणि मिसळि बद्दल लिहा असं सुचवल ....&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता हे सुचवणारा नक्किच अस्सल खादाड आन खाद्य शोकिन असावा असा माझा पक्का समज झाला कारन नारायणगावची भेळ "जगप्रसिद्ध आहे" हे मला त्याच्या कडुनच कळालं, . . . आन भेळीचि टेस्ट आन गावचा अभिमान एकदम डब्बलच झालयासारखा वाटला.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;नारांयणगावचा तमाशा, टेलिस्कोप, दारुची फॅक्टरी, विठाबाई भाऊ मांग, रा.प.सबणिस, द्राक्षे असल्या गोष्टि प्रसिद्ध आहेत एवढच बुवा आपल्याला (मण्जे मला) माहित होतं....&lt;br /&gt;....ह्या प्रसिद्ध गोष्टिंपैकि दारुची फॅक्टरी म्हन्जे जाम वैतागवाडी, गावाला जातोय म्हटल्यावर आमच्या मित्रांनी दोन चार प्रसिद्ध बाटल्या (भरलेल्या) आणण्याची विनंति केलि म्हणुन समजाच. म्हणुन आजकाल पुण्या-मुंबईला राहणारे (शहाणे) नारायणगावकर ह्या प्रसिद्धगोष्टिचा (बेवड्यां मित्रमंडळीं मधे) उल्लेख मुद्दामच टाळतात, अस निदर्शनास आलं आहे.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;आता ह्या भेळिबद्दल कुण्या खादाडंन वाचलं आन तुम्हाला ती आणण्याची विनंति केलिच तर मात्र माझ्या नावाने खडे न फोडता "त्या सुचवणाराच्या" नावाने फोडले तर बरे होईल...&lt;br /&gt;.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;कॉलेजच्या पोरी?.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;.&lt;br /&gt;त्या कॉलेजात काय (काय) करतात हे नेमकं माहित नाहि... पन एस.टि स्टँडमध्ये आल्यावर प्रत्येकजन (त्यातल्यात्यात पोरांचा ... ) अगदि ट्वाळ आन शहाणे(समजणारे) वीरही चोकशीच्या खिडकी कडे बेमालुमपणे टक्क लावुन असतात. काहि विर तर अर्जुनासारख़े एकाच वेळि अनेक नजरेचे बाण त्या खिडकिच्या देशेने सोडत असतात. ह्या साऱ्या "सुंदऱ्याचा मेळा" त्या "चोकशी खिडकिपाशीच" का भरतो? आन तो हि दररोज (रविवार सोडुन)?.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;त्या खिडकिवाल्या कंडडाक्टरची आन पोरींची "तोंडओळख" नक्किच झालि असणार.... मग त्याच्याकडेच " हेमा आलि का हो, गुड्डि गेलि का हो? कुणाबरोबर गेलि? अशी चोकशी करायला काय हरकत आहे असं वारंवार वाटायचं .... नाहितरी "आळेफाटा गेलि का हो? खोडद किति वाजता आहे? अस्स काहि त्याला विचारलकि तो साला हमखास "ययील आता, वाट पहा थोडि" असली काहितरि छा छु उत्तर देतोच ना?.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;मुंग्या जश्या तोंड जवळ आनुन (तोंडात तोंड खुपसुन) संदेश देवाण घेवाण करतात ना, हुबेहुब त्याप्रमाणं गठ्या-गठ्यानं यांचहि च्याव-म्याव चालु असतं... त्यातल्या ४-५ जणी मग एकदम " खि. खी.$ खी,..... बावळटच आहे मेला$ ...सगळे तस्सेच$.. येडपाटच्य. ... सँडल पाहिलि का?... असंल काहितरि बिच्चाऱ्या जवळुन जाणाऱ्या पोरांना त्यांच्या पाठिमागे (तोंडावरदेखिल) ऐकु येईल अश्या आवाजात खडसावतात.... मुद्दाम!&lt;br /&gt;.&lt;br /&gt;तश्या ईथल्या पोरी चवळिच्या शेंगेसारख्याच बऱ्यापैकी सडपातळ असतात हे माझं निरिक्षण, जितक्या अक्कडबाज तितक्याच लहरि ... मुलांकडं ढुंकुनही पाहत नाहीत (असा आव आणण्याचा निष्फळ प्रयत्न करतात). . आन एखाद्यांवर फिदा झाल्यावर त्याच्यावरुन जीव ओवाळुन(एकदाच) टाकायलाही तयार...... दिसायलाही चिक्स, पन गावाकडचा स्पेशल लुकहि त्यात मिसळलेला... चिंगुपणातर यांच्या नसानसात भरलेला.... आपन बळेच बोलण्याचा प्रयत्न केला तरी "हा, हुं, नाय, नको" च्या पुढे बोलतिल तर शप्पथ!! .. फुक्कटच्या बोलण्यातहि चिंगुपना का करतात हे देवलाहि माहित नसावे कदाचित?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;GMRT, Narayangaon&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;GMRT Khodad, located @ 19deg 5’ NORTH, &amp;amp; 74deg 2’ EAST. Its just 8Km from Narayangaon.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;Giant Meter wave Radio Telescopes are used to collect the wave/radio signals that our universe produces due to graceful substance, stars, satellites, galaxies &amp;amp; so many other unidentified components which r lying in the space.&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sdt-WhWBkVI/AAAAAAAAAJ4/pLB6c1kCyAY/s1600-h/gmrt2-a.gif"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5321986310041342290" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 216px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sdt-WhWBkVI/AAAAAAAAAJ4/pLB6c1kCyAY/s320/gmrt2-a.gif" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;Total 30 Antennas/reflectors of ~45 m Diameter are positioned in shape of “Y” can revolve in angular direction. The Antenna is having fixed relation with another antenna of a space satellite revolving around Earth. Space satellite orbits @ the same speed that of earth and hence relation betwn both remains stationary with respect to the telescope antenna.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;All r installed on cements frustruted conical shaped towers &amp;amp; welded structure, using advanced technology.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;All 30 antennas r connected to each other &amp;amp; LAB using fiber optics cable. GMRT, TIFR (Tata Institute of Fundamental Research) &amp;amp; NCRA (National Centre for Radio Astrophysics) all three related institutes r connected same way.Different Frequency linearly polarized feeds like 50, 150, 210, 325, 610 &amp;amp; 1420 MHz has been utilized on these antennas along with frequency synthesizers.(normal frq for current is just 50Hz)....... Astronomical Observations of space objects can be done @ these freq. &amp;amp; we can get images upto 500:1, 1000:1 scale. Dat means 500 time enlargement &amp;amp; clarity can be possible.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;GMRT Khodad captures raw data, converts &amp;amp; stores it, process data for detailing. All this is done by using software AIPS. . . AIPS the Astronomical Image Processing System software. Its main use is to standardize, calibrate and display radio astronomical data. Its like a TV Window &amp;amp; displays data or images @ various stages for editing/measuring.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;There was a interference between GMRTs band frq &amp;amp; FM &amp;amp; Vividhbharati radio frequencies, which effected the projects outcome. I think this problems is resolved.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;. due to rural area there is a lack of engineers &amp;amp; scientists.&lt;br /&gt;.&lt;br /&gt;As I remember this structure, band &amp;amp; polarization is designed &amp;amp; made by Bangalore based Raman Institute &amp;amp; research.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सचिन, नारायणंगाव २१/६/०७&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-8757820701070373884?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/8757820701070373884/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/04/blog-post_2115.html#comment-form' title='2 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/8757820701070373884'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/8757820701070373884'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/04/blog-post_2115.html' title='&quot;ना रा य ण गां व&quot;'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sdt9Tp3Pp8I/AAAAAAAAAJw/D08VMfex2Qo/s72-c/st.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-4630933437201052838</id><published>2009-04-07T07:19:00.000-07:00</published><updated>2009-05-04T09:16:54.046-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='khed'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='valase'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='shirur'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Shivaji'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ambegaon'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='junner'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Adhalrao'/><title type='text'>शिवाजीराव आढळराव, शरद पवार आणि शिरुर लोकसभा.</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdthP7Td7NI/AAAAAAAAAIw/Ele6hv2wzAE/s1600-h/shivaji-3.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5321954310913649874" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 184px; CURSOR: hand; HEIGHT: 238px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdthP7Td7NI/AAAAAAAAAIw/Ele6hv2wzAE/s320/shivaji-3.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt; &lt;span class=""&gt;आजचा&lt;/span&gt; "शिरूर" (पूर्वीचा खेड) लोकसभा मतदारसंघ म्हणजे शहाजीराजे भोसले याना दक्षिणेचा अदिलशाही कडून मिळालेला पुणे-सुपा परगणा होय. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, भोसरी, शिरूर आणि हडपसर हे विधानसभा मतदार ह्याच्या अखत्यारीत येतात. &lt;span style="color:#3333ff;"&gt;ह्याच "जुन्नर प्रांती" महाराष्ट्राच्या महादेवाने, स्वराज्याच्या उषःकालाचा आरंभ करण्यासाठी १६३० ला अवतार घेतला होता......&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;ह्याच प्रांतात, दोन्ही काँग्रेसची परंपरागत मजबूत ताकद असतानाही, २००४ च्या लढाईत तो विक्रमी मताधिक्याने सेनेकडे खेचून आणण्याची किमया शिवाजी दादा आढळराव पाटलांनी वादळवाटेच्या झंझावाताप्रमाणेच केली.. हो झंझावातच म्हणावा लागेल याला.. &lt;span style="color:#3333ff;"&gt;जवळ फौजफाटा नसतानाही बजाजी बांदलाच्या हातून शिवरायांनी १६४४ साली रोहिडा जिंकून यशाची अजिंक्य मेढ जशी रोवली&lt;/span&gt;, तश्याच परिस्थितीत, "सेनाबळ" कमी असतानाही, आयुष्यातील पहिल्याच निवडणूकीत २००४ ला भगव्याची मुहूर्त मेढ खेड मध्ये रोवण्याचा पराक्रम आढळरावांनी करून दाखवला.... पुऱ्या आयुष्यातील पाहिलीच निवडणूक!!! तिही खासदारकीची?.....&lt;br /&gt;&lt;br /&gt;"एकच वादा.... शिवाजीदादा" ची गर्जना करत जनता जनार्दनाने ह्या तोफेस गर्वाने खांद्यावर उचलून घेतले... &lt;a href="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdtiJ9A13-I/AAAAAAAAAJI/5OkO2JIqTfc/s1600-h/Tsar_Cannon_mouth.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5321955307804811234" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 222px; CURSOR: hand; HEIGHT: 152px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdtiJ9A13-I/AAAAAAAAAJI/5OkO2JIqTfc/s320/Tsar_Cannon_mouth.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;आणि मग हि &lt;span style="color:#ff9900;"&gt;मुलूखमैदानी तोफ आढळपणे शिवनेरी वरून धडधडायला लागली... दिल्ली शिवनेरीच्या पल्ल्यात आली.!!!&lt;/span&gt; ग्रामीण प्रश्नांची बत्ती देत ह्या तोफेच्या जबड्यातून निघालेले तोफगोळे दिल्ली दरबारी पडू लागले... एक, दोन, तीन नव्हे तर.... तब्बल १२५१ तोफगोळे... १२५१ प्रश्न विचारून आढळरावांनी १४व्या लोकसभेचा उच्चांक केला... आणि अख्ख्या भारतवर्षातल्या साऱ्या खासदारांमध्ये दादा अव्वलस्थानी पोहचले...&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बैलगाडा शर्यत बंदी, ग्रामीण उद्योजकता, शेती व उत्पादन, गरीब निराधारांच पुनर्वसन, नदी जोड प्रकल्प, नदीच्या तळातील गाळ काढणे, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून केलेले कार्य, वाडी-वस्त्या पर्यंत पोहचण्याची पद्धत, गरजूंना अर्थसाहाय्य, खेड्यामध्येही शहरांच्या तोडीस तोड शिक्षणाची सुविधा, दुरध्वनी जोडणी, रस्ते, पाणी, पायाभूत सुविधा, अश्या कैक कामांची शृंखला चढत असतानाही दादा सामान्याच्या झोपडीतही डोकावायलाही कधी विसरले नाहीत, तेथूनच ते नागरिकांच्या हृदया पर्यंत अगदी अलगद हळुवार पोहचले....... शिवसेनेला त्यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रासाठी भक्कम पर्याय मिळाला....&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdthpSMpDvI/AAAAAAAAAI4/aXZ5DJALnvQ/s1600-h/md.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5321954746555764466" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 170px; CURSOR: hand; HEIGHT: 169px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdthpSMpDvI/AAAAAAAAAI4/aXZ5DJALnvQ/s320/md.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;२००९च्या उमेदवारीचा अश्वमेध आढळरावांनी केव्हाचं "शिरूर" मतदारसंघात सोडलाय,.. पण तो पकडण्या, थांबविण्या, आणि दादा विरुद्ध लढण्या कुणी हि धजवत नाही, कैक जनांना राष्टवादीने पुढे केले,... पण मतदारांची चाचणी, सर्व्हे केल्यानंतर साऱ्यांनी माघार घेतली...... कुणीच दादां विरुद्ध उभे राहण्यास धजवेना... उमेदवारच सापडेना?.. दबाव टाकून दादांना राष्ट्रवादी कडे खेचण्याचा डावही फोल ठरला.... शेवटी "आता एकच माणूस आढळरावांच्या विरोधात उभा राहू शकतो........ पवारसाहेबच!!... होय खाशा शरदराव पवार" असा सुर विरोधकांत निघू लागला..... आणि तो अगदी संयुक्तिकही होता... करणं " स्थानिक राजकीय दिवाळखोरी"&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#ff9900;"&gt;आपला मतदारसंघ पोरीला वारसाहक्काप्रमाणे "आंदण" दिल्यामुळे त्यांना "दुसरीकडे" घुसखोरी करावी लागणारच होती....&lt;/span&gt; त्यासाठी त्यांनीही मोर्चा "शिरूर" कडे वळविण्यास तयारी दाखविली.... पण पवारसाहेब असो किंवा कुणीही असो,... घरचा उमेदवार आणि लादलेला उमेदवार हा फरक असतोच ना? समाजमनाचा विश्वास, जिव्हाळा, आदर, आधार, आशा आणि अभिमान जिंकलेल्या आढळरावांविरुद्ध लढताना पवारांनाही आपले पाय "शिरूर" मध्येच घट्ट रोवून ठेवावे लागतील.... "&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdtifmJqipI/AAAAAAAAAJQ/O_NgHg6efDA/s1600-h/pawar.bmp"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5321955679624923794" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 156px; CURSOR: hand; HEIGHT: 207px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdtifmJqipI/AAAAAAAAAJQ/O_NgHg6efDA/s320/pawar.bmp" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;महाराष्ट्रात इतरत्र त्यांना प्रचारासाठी फिरणे अवघड होईल...... आणि म्हणूनच आढळराव विरुद्ध पवार अशी लढाई झालीच तर आढळरावांचं जितकं नुकसान होईल त्यांपेक्षा जास्त नुकसान पवारांच्या राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात इतरत्र होईल... हे पवार साहेब जाणतंच असतील..... &lt;span style="color:#ff9900;"&gt;१६८०-१६८९ पर्यंत धर्मवीर संभाजीराजांनी औरंग्याला सतत ९ वर्षे एकट्या दख्खन मध्ये झुंजत ठेवले. त्याला इतरत्र ध्यान देण्यास वेळच मिळाला नाही, परिणामातः तिकडे उत्तरेत, पंजाब, राजस्थान, काश्मीर मध्ये त्याच्या हातून सत्ता गेली.... पवार इथेच शिरूर मध्ये अडकले तर राष्ट्रवादीचे इतरत्र काय होईल ?....&lt;/span&gt; आणि कदाचित म्हणूनच, पवार साहेब हे बोलत नसले तरी शिरूर ऐवजी राजकीय दृष्ट्या जास्त सुरक्षित अश्या माढ्यात जाणे त्यांनी गुपचुप पसंत केले असावे. हाच आढळरावांच्या वर्चस्वाचा विजय आहे असे म्हटले पाहिजे... पवारांनी स्वतःसाठी शिरूर ची चाचपणीही केली, ३-४ सभाही केल्या, अंदाज घेतला आणि माढा मतदारसंघ स्वतःसाठी योग्य समजला... सेना-राष्ट्रवादी युती, पवार-उद्धव भेट हा सारा घटनाक्रम होत असताना, चार महिने हि राजकीय कुरघोडीची धूळवड चालू असतानाही आढळराव न डगमगता "राज्यसभा नाही, विधानसभाही नाही, मावळ मधूनही नाही, मी लढणार ति फक्त लोकसभाच, आणि तिही शिरूर मधूनच!!!" असे म्हणतं आढळ भूमिकेत राहिले.. परिणामातः आपसूकच हा सारा मतदारसंघ उमेदवाराऐवजी "मतदारानेच" ताब्यात घेऊन टाकला आहे. १५ व्या लोकसभेचा शिरूरचा खासदार कोण हे आपसूकच आणि अलिखितपणे ठरले आहे..&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवाजीरावांच्या प्रचाराच्या फेऱ्या एव्हाना पूर्णं हि झाल्या असतील, अजून समोरचा उमेदवार ठरणे बाकीच आहे. उद्या कदाचित विलास लांडे, प्रकाश म्हस्के, पोपटराव गावडे किंवा दिलीप वळसे पाटीलही रणांगणात असतील,.. &lt;span style="color:#ff9900;"&gt;पण जो शिवाजीराव, पवारासारख्या मातब्बराशी लढायला डगमगत नव्हता, त्याच्या हिंमतीच एक बुरूज तरी यांना फोडता येईल काय हे विचार करायला लावणारे आहे?&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सचिन, नारायणगाव, पुणे. २६/२/२००९&lt;br /&gt;चित्रे - गुगल इमेजेस आणि विकिमेडिया. ओराजी मधून साभार.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-4630933437201052838?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/4630933437201052838/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/04/blog-post_07.html#comment-form' title='2 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/4630933437201052838'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/4630933437201052838'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/04/blog-post_07.html' title='शिवाजीराव आढळराव, शरद पवार आणि शिरुर लोकसभा.'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdthP7Td7NI/AAAAAAAAAIw/Ele6hv2wzAE/s72-c/shivaji-3.jpg' height='72' width='72'/><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7954787360768799249.post-5674623492790408429</id><published>2009-04-07T05:43:00.000-07:00</published><updated>2009-05-04T09:24:24.474-07:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='शेतकरी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='विदर्भ'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='आत्महत्या'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='suicide'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='farmer'/><title type='text'>शेतकऱ्यांच्या आत्महत्या.</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdtLuVd_hOI/AAAAAAAAAII/iEQaW7svqe0/s1600-h/farmers2.bmp"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5321930644077380834" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 278px; CURSOR: hand; HEIGHT: 233px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdtLuVd_hOI/AAAAAAAAAII/iEQaW7svqe0/s320/farmers2.bmp" border="0" /&gt;&lt;/a&gt;विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्ते मागे एकच कारण आहे किंवा असेल असं मला वाटत नाही. फक्त उरावर कर्ज आहे या एकाच कारणासाठी आत्महत्या करण्याइतकी कुठलीच जनता लोचीपोची नक्कीच नसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कर्ज आहे, ते फेडण्याची इच्छा आणि हिंमतही आहे पण उत्पन्न अगदीच शून्य, हिच लाजिरवाणी, पण जीवघेणी यातना "आत्महत्ये" पर्यंत नेण्यास कारणीभूत असते. कर्जापेक्षा कमी उत्पन्न हेच मूळ कारण आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेतीतून सरासरी उत्पन्न १६००० रुपये, महागडी बी-बियाणे, खते, कीटकनाशके, यांचा खर्च सरासरी ११००० रुपये, शेतीची मशागत, पोटाची भुख, मुलां-मुलीच शिक्षण, हुंडा, लग्न, कसं भागणार ? मग घे कर्ज. ठेव जमिनी गहाण, यातच तो पुरता अडकतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग सरकार पुढे येते आणि कमी &lt;span style="color:#ffcc00;"&gt;व्याज दराच्या कर्जाचा फास्ट इफेक्टिव वेदनाशामक डोस देते.&lt;/span&gt; वर्तमानपत्रात भल्या हेर्डिंग मध्ये जाहीर करतात, चांगली व ताबडतोब उपाययोजना केले असा भास केला जातो, पण त्याचा उपयोग या गरीब शेतकऱ्यांना होतच नाही.&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdtM6E5LkuI/AAAAAAAAAIQ/BBxwG3uqcvU/s1600-h/farmers1.bmp"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5321931945298072290" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 232px; CURSOR: hand; HEIGHT: 310px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdtM6E5LkuI/AAAAAAAAAIQ/BBxwG3uqcvU/s320/farmers1.bmp" border="0" /&gt;&lt;/a&gt; कारण नियमा प्रमाणे "कमी दराचं" कर्ज घ्यायलाही जमिनी गहाणच ठेवाव्या लागतात, पण त्या तर पहिल्याच कर्जासाठी गहाण पडलेल्या असतात ना?.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सरकारच्या अश्या चिल्लर आणि भन्नाट फालतू योजनांचा फायदा मग फक्त ४-५% बागायतदार शेतकरी पुरेपूर करून किंवा करवून घेतात. मंत्री, संत्री मदतीचे "पॅकेज" जाहीर करतात, त्याचाही फायदा होत नाही, किंबहुना होणार नाही याचीच काळजी ह्या राजकारणी मंडळीकडून घेतली जाते अस कुणाला वाटलं तर त्या गैर ते काय? "पॅकेज" मधील जवळजवळ ६०% रक्कम तुम्ही फक्त सिंचनासाठी बाजूला ठेवत असाल तर होणाऱ्या आत्महत्या तत्काळ थांबूच शकत नाहीत. अरे खडकाळ रास्त्यावरून ओझे वाहता वाहता मरणाऱ्या बैलांच्या अंगावरील ओझं तत्काळ कमी करायचं सोडून, बैलाच्या भविष्यातील सोयीसाठी, खडकाळ रस्ता दुरुस्त करण्यात वेळ आणि पैसा वाया घालवला तर तो नक्की मरणारच. मरणाऱ्या शेतकऱ्यांचा डोक्यावरील कर्जाच ओझं कमी करायचं सोडून "सिंचना"च्यासाठी २/३ रक्कम राखून ठेवाल तर त्याचा तत्काळ उपयोग शून्यच ना?&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdtK_SHSh4I/AAAAAAAAAH4/qPGzyVgq65M/s1600-h/farmers.bmp"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5321929835722999682" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 279px; CURSOR: hand; HEIGHT: 178px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdtK_SHSh4I/AAAAAAAAAH4/qPGzyVgq65M/s320/farmers.bmp" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;चीन मधील शेतकऱ्यांना सगळ्या सोयी सवलती सह ०% व्याजाने कर्जे मिळते. आपली वाटचाल शून्य टक्क्यांकडे केव्हा होणार? ६%नी कर्ज देतो म्हणाले होते, मग किती जणांना ६%नी कर्ज भेटलंय ते कळेल का?. बांगलादेशाच्या अहमद साहेबांची यशस्वी "मायक्रोफायनांस" सारखी एखादी चांगली योजना राबवण्याचा विचार केव्हा करणार आपण? कर्जाचा डोंगर का वाढतोय?, तो कसा कमी करता येईल याचा विचार कधी होणार?&lt;br /&gt;&lt;br /&gt;विदर्भातील आत्महत्यांचा आणि पर्यायानं शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन गेली २.५ वर्षे आपण काढलीयेत, पण अजूनही योग्य उपाय सापडलाय का? मरण पावलेल्या ७,७०० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा, त्यांच्या "त्या" निर्णयाचा त्यांच्या मागे राहिलेल्या कुटुबियांना,नातेवाईकांना काही फायदा तरी झालाय काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांच्या आत्महत्या व्यर्थच गेल्या ना?.&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdtLT4c529I/AAAAAAAAAIA/D-1FtPQsPoc/s1600-h/farmers3.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5321930189611588562" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 277px; CURSOR: hand; HEIGHT: 167px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdtLT4c529I/AAAAAAAAAIA/D-1FtPQsPoc/s320/farmers3.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color:#ffcc33;"&gt;"मरूनही काहीच फायदा होत नाही"&lt;/span&gt; हे कळल्यामुळे जेव्हा आत्महत्या थांबतील, तो दिवस मात्र कळस असेल सरकारच्या आणि आपल्याही . . . . ...निष्क्रियपणाचा आणि निर्लज्जपणाचाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;.सचिन, नारायणगांव, पुणे.&lt;br /&gt;&lt;em&gt;रवि. २९/०४/२००७. ( चित्रे - गुगल इमेजेस मधून साभार.)&lt;/em&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7954787360768799249-5674623492790408429?l=sachingandhul1.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://sachingandhul1.blogspot.com/feeds/5674623492790408429/comments/default' title='टिप्पणियाँ भेजें'/><link rel='replies' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/04/blog-post.html#comment-form' title='3 टिप्पणियाँ'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/5674623492790408429'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7954787360768799249/posts/default/5674623492790408429'/><link rel='alternate' type='text/html' href='http://sachingandhul1.blogspot.com/2009/04/blog-post.html' title='शेतकऱ्यांच्या आत्महत्या.'/><author><name>साळसूद पाचोळा</name><uri>http://www.blogger.com/profile/07181412998233898032</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='25' height='32' src='http://1.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/Sx202nHjKGI/AAAAAAAAAOE/eW9JMZb2UDg/S220/sachin_office1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_Jiv_KXPZZ84/SdtLuVd_hOI/AAAAAAAAAII/iEQaW7svqe0/s72-c/farmers2.bmp' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry></feed>
