शिवरायांच्या यशाचे श्रेय

"ब्राह्मन नसते तर स्वराज्य मिळाले असते काय, आणि एकतरी हिंदु राजा झाल असता काय?" असे विचार एका मित्राने (अर्थात ब्राह्मण) मांडले। त्यास उत्तर देताना....
.
शिवरायांच्या यशाचे श्रेय तर्कशास्त्र द्र्य्ष्ट्या कुणाला द्यावयाचे झाले तर ते शिवरायांच्या स्वतःच्या कल्पकतेला, धैर्याला, संयमाला आणि त्याबरोबरिने असलेल्या उत्कट इच्छेलाच द्यावे लागेल॥ आई-वडील, गुरू, मार्गदशक, संत, देव, दैव, मराठे, मावळे, ब्राह्मण, मुसलमान सरदार, सैन्य गड, किल्ले, सह्यांद्री ह्यांचाही त्यात सहभाग होता। पण म्हणून ब्राहमण किंवा अमुक अमुक नसते तर स्वराज्य मिळाले नसते असे मानणे म्हणजे मानणाराचा फुसका अहंभाव आहे..
.
एकलव्य आणि कर्णाकडे तरी कुठे होते गुरू, राजपद आणि पैसा? पण तरीही ते शून्यांतून उभे राहिले होतेच ना? विजिगिषू मन असेल तर गड, किल्ले सोडा मानसे देखिल तयार करता येतात..
ब्राहमण नाहीत म्हणून स्वराज्याचे काम थांबले असते असे आपणास वाटतेच कसे॥? स्वराज्य म्हणजे काय सत्यनारायण होता की काय?..
.
शून्य असलेले हेरखाते आणि सागरी आरमार जर महाराज उभारू शकत होते तर "ब्राह्मणी डोकी" तैयार करणे कितीसे अवघड होते? उगाच "सामूहिक मीपणाचा" चा भाव धरणे चुकीचे आहे॥ मी म्हणेन जर ब्राहमानानी राज्य आणि राजकारणात सहभाग घेतला नसता तर त्यांच्या उपजिवेकिचे दुसरे साधन ते काय राहिले असते? त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असती..
.
। ब्राहमणच काय पण क्षुद्राति-क्षुद्र समाजाचाही सहभाग होता हे अगदी मान्य आहे॥ अगदी प्रामाणिक, निष्टापुर्ण सहभाग होता,.. पण म्हणून "फक्त" ब्राहमण होते म्हनून राजे होते हे फारच एकलांगी आणि विषारी विधान आहे..
.
.... कुठे अनंतात विलीन झाला असाल तेथून थोडा वेळ काढून या... आणि माफी मागून हे विष पसरविणे थांबवा..

4 प्रतिक्रया:

अमोल सुरोशे (नांदापूरकर) ने कहा…

शिवरायासारख्या स्वयंप्रकाशित सूर्याला कोणी दुसर्याने ते हि ब्राम्हणांनी उजेड दाखवला म्हणणाऱ्या त्या महाभागाची खरच मला कीव करावीशी वाटते ....

हजारो वर्षामध्ये एखादाच असा युग पुरुष जन्माला येतो, आणि हा सह्याद्रीचा छावा आमच्या या मायभूमी मध्ये जन्माला आला हे खरच आमचे महत-भाग्य. आठरा पगड जातींना एकत्र करून सामान्य शेतकऱ्याचा - कष्ट कर्यांचे राज्य उभे केले. जिजाऊ माउलींच्या विचारातील स्वराज्य प्रत्यक्षात उतरवले..

सचिन तुम्ही दिलेले हे उत्तर नक्कीच त्यांची तोंडे बंद करील .. पण का हा व्यक्ती द्वेष .. ह्याच व्यक्ती द्वेष पायी आम्ही आमच्या दुसर्या चात्रापातींना म्हणजेच आमच्या संभाजी राजांना मुकलो.. स्वकीयांनीच केलेल्या विश्वासघाता मुळे हा धर्मवीर . ज्ञानवीर संभाजी राजा त्या दुष्ट औरंग्याच्या हाती लागला.. याच संभाजी चा इतिहास जाणीव पूर्वक बिघडवला गेला .. पण आत्ता हे होणे नाही.. आता समाज जागा झाला आहे, भावना भडकावून अशा गोष्टींची फार चर्चा होणार नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे ..

बाकी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्या इतिहासीतील के तेजपुंज सूर्य .. त्यांच्या कडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांची दृष्टी क्षणात जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही.

जय महाराष्ट्र .. जय जिजाऊ .. जय शिवराय

अमोल

प्रकाश बा. पिंपळे ने कहा…

सचिन आणि अमोल ने बऱ्या पैकी क्लियर केलाय इश्यू. तरी, थोड वेगळ्या भाषेत. मी जातीयवादी नाही, मला कुण्या एखाद्या जातीचा द्वेष ही नाही. पण अशी हि पुस्तक ज्यात 'असा' इतिहास लिहिलेला असतो ही यांना मिळतातच कुठून? का ही पैदावळ यांच्याच डोक्यातली? बरं तसं आहे तर मग हे सगळे एकाच वेळी सगळे असा विचार करतातच कसा? ब्राम्हण समाजाचे महाराष्ट्राला खूप मोठे देणे आहे. त्यांचा अवघा समाज आजही आदर करतोच. अहो पण आपलं छत्र मोठ आहे तर तो मोठे पणा घ्या ना, [सगळ्याच ब्राम्हणांना हे वाक्य नाही, खूप लोक समजूतदार आहेत ते समजतील हे] कशाला स्वयंप्रकाशित सूर्याला आपल्या छत्रा खाली घेण्याचा प्रयत्न करताय? जळेल ते एकदिवस!
कधी कधी वाटते इतकी अ.ब.क. खोरी येतेच कुठून असं बोलणार्यात?
का हा अवघा मराठीजन एकत्र होऊन आपल्या घराबाहेर पडून पुन्हा जग पादाक्रांत करायला निघत नाही? अहो खूप प्रश्न आहेत; सोडवा की ते! मग बघुत ब्राम्हण विरोध, मराठा विरोध, दलित विरोध या सगळ्यात इंटरेस्ट दाखवणारे किती पुढाकार घेतात ते.
छत्रपतींच्या स्वयंप्रकाशित पणा बद्दल पुन्हा कुणी संशय घेऊ नये!

-प्रकाश पिंपळे
[मी संभाजी ब्रिगेड किंवा त्या प्रकारच्या कोणत्या ही जातीय संघटनेशी संबंधित नाही ]

Mayur Chitnis ने कहा…

I really hate these people , who are think like this. Those are the brahmins who opposed shivaji maharaj's coronation. Because of this reason, Gaga bhatta came from Kasi. One thing to mentioned here , he received 1 Lac rupees 'Dakshina' from Shivaji. Then how can you say brahmin made him king ?
Another example of Hiroji Indulkar ( I don't know his cast). Chief architect in the Maratha wing. He did not taken single penny from Maharaj,for his exemplary efforts to built 'Raigad'. ('Seve si tatpar hiroji Indulkar').

If any body brahmin by cast must think about whatever example i have given above.

There are so many brahmins who had given unconditional devotion to Shivaji's swarajya. Everybody salute to them. Few people deliberately spread hatred about Brahman. Even i read few books in that very shameful language is written about Dyaneshwar, Ramdas, dadoji kondev etc. But i don't feel one should start giving answer to it in same manner.

Rest what i will say ? Everybody is learned here.

Well educated people are only doing castism is really a fate of today.

साळसूद पाचोळा ने कहा…

श्री अमोल सुरोशे, प्रकाश pipale, मयूर .. आपली comments खरोखर बहुमोल आहेत, आणि त्यात समंजसपणा पुरेपुर आहे हे त्यापेक्ष्हा महत्त्वाचे वाटले..
. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, किवा तत्सम संघटना शिवरायांच्या नावाने जे काही करू पाहत आहेत त्या मुले "शिवराय' एक संवेदनशील विषय बनत आहेत. (राम मंदिराप्रमाने) .... ह्याचा तोटा क्षनो क्षनि होणार आहे...
.
आपण तिघानी दिलेले स्फटिकरन प्रगल्भ विचारांची प्रचिती आहे...

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..