"किंमत मोजावी लागेल"- सुप्रियाताई पवार.

आता खऱ्या अर्थाने ताई शरद पवारांच्या कन्या आणि बारामतीकर वाटू लागल्या. बारामतीकर दुसऱ्यांना संपविण्यासाठीच आहेत. फक्त पवारांनी न धमकावता, न बोलता अगदी नियोजनबद्ध कारस्थाने रचत विरोधक आणि स्वकीयांना देखिल न चुकता "किंमत" चुकवायला लावली. ताईंकडे तो छुपागूण काही दिसत नाही.
"आ. शिवतारे हे ताई सारखे जन्मताच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेले नाहीत, हे खरे असले तरी शिवतारे बापूंनाही लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने निवडून दिलेले आहे हेही ताई कदाचित विसरलेल्या नसतील पण आपण पवार साहेबांच्या कन्या आहोत, आणि आपण काहीही बोलू/करू शकतो हा अहंभाव त्याच्यात आहे हे मात्र नक्की झाले. "
लवासा आणि तत्सम कैक प्रकरणे जर त्या दाबू शकतात तर शिवतारे सारखा सामान्य आमदार दाबायला कितीसा काल असा काहीसा भ्रम ताईंचा झाला तर नसेल ना? मुळातच शिवतारे राजकारणात पैसा कमावण्यासाठी आलेले नाहीत हे ताईंनी लक्षात घेतले नाही. त्यांच्या कडे पवारांपेक्षा कमी पैसा आहे, तसे असूनही पेश्यासाठी राजकारण करणार नाही हे ते निक्षून सांगताहेत, तसे वागताहेत देखिल. मुळातच त्यांना "पुरंदरचा बुलंद" आवाज बनायचे आहे हे पैसा आणि सत्ता मिळविण्यात मशगुल झालेल्यांना कळलेलं दिसत नाहीये. आणि म्हणूनच ते त्याच तडफिणे पुरंदरचे प्रश्न मांडताहेत. पुरंदर म्हंजे पुणे महानगर पालिकेचा कचरा डेपो नाही, त्यांनी उचलेल्या या भूमिकेला तेथील खासदार म्ह्ननून आपणही आधार देऊन "लोकप्रतिनिधी" पदाची आब राखायला हवी होती. ते का केले नाही याचे स्पष्टीकरण देणे आपण का टाळता आहात. पुरंदर मधून आपणास कमी मताधिक्य मिळाले म्हणून असे वागत असाल तर पुढच्या वेळी अजून बिकट अवस्था होईल कारण पुरंदरची जनता "पवारांना" बांधील नाही हे न विसरणे. आणि आपल्या सारखेच फाडफाड इंग्लिस शिवतारे आणि इतरांनाही बोलता येते हे ही न विसरणे आणि राग आला तरी मातृभाषाच वापरायलाही न विसरणे.

"ताईसारखे खासदार असलेले लोकप्रतिनिधी जर सरकारी अधिकाऱ्यांची बाजू घेऊन, अधिकाऱ्यांना सुरक्षित करू पाहत असतील तर हा "लोकप्रतिनिधी" ह्या पदाचा सरळ सरळ घनघोर अपमान आहे..."

आयुतांना कडून उत्तर अपेक्षित असताना एका लोकप्रतिनिधीने दुसऱ्या लोकप्रतिनिधीचा त्यांच्याच मतदार संघातील प्रश्नांसाठी अवमान करणे म्हनेजे जनतेचा अपमान करण्यासारखे नाही काय?.


आपण मुळी त्यांना निवडून देतो ते आपले प्रश्न त्यांनी सरकार दरबारी मांडावेत म्हणूनच ना? प्रश्न विचारले तर म्हणे मोठी किंमत चुकवावी लागेल, हा काय प्रकार? आवाज चढवलेला तुम्हाला आवडत नाही, तर मग दुसरं कुणी बोलत असताना मध्येच तोंड घालणे कसे काय बरे आवडते?

सुप्रिया ताईंना पुरंदर मध्ये मते मागण्यासाठी यावे लागते, शिवतारेंना बारामतीत जावे लागत नाही त्यामुळे ताईंनी संयमाने घेतलेले त्यांच्याच फायद्याचे आहे. अजित दादा आणि ताईंचा "वर्चस्वाचा" लढा चालू झाला आहेच तेव्हा भविष्यात दादा शिवतारेंचा उपयोग ताईंच्या मुसक्या आवळण्यासाठी करू शकतात हेही लक्षात घ्यावे.
.

link- http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=75616&boxid=1263915&pgno=7&u_name=0
link - https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitOSg6Hs7vwwon4FwdYpGgsnebbzR0gDrZ7saGFDZsMGLLoqzJCHjFTXg-DgwTb-dl3FGuLNP_QNOfY6Me3ezljKj3R_PuyNGl4lESkPRlpTOufeqshSd3PXrr29NatfY_anEjA92d3jEc/s1600-h/235318531.jpg

8 प्रतिक्रया:

Mahendra ने कहा…

jabari lihilay.. mast!

THANTHANPAL ने कहा…

sattechi nasha dusare kay? Pan janata great aahe .Indira gandhi na hi ghari jave lagale tethe tai mhanaje pala पाचोळा
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे ।

साळसूद पाचोळा ने कहा…

@महेंद्रजी... मनापासून धन्यवाद
@THANTHANPAL,...अगदी रास्त बोललात, जनता जनार्धनाने बड्या बड्यांना घरी पाठवलेली उदाहरणे कैक आहेत.

Vijay Deshmukh ने कहा…

bhaau farach chaan lihilat ki ho... asech lihaa shubhechaa...

सुलभा ने कहा…

Zakas !!!

Jay ने कहा…

tila adarane "tai " vagaire mhananya itaki kartutvane ani vayane sudha ti kahi mothi nahi ..!! Ani Sharad Pawaranchi kanya zali mhanun kahihi upkar janatevar tine kelele nahit. !!

Tina ticha kartutva sidhdha karava magach manaNar. !

Sharad Pawar sudha far adarNiya aahe ashatala sudha bhar nahi .

Aso .. he maza personal opinion zala..

अमित पाटील ने कहा…

एकदम मुद्देसुद बांधणी आहे तुमच्या ब्लॉग ची. तुम्ही पत्रकार आहात काय?

रोशन आतकरी ने कहा…

कटू सत्य !!!

एक टिप्पणी भेजें

..मनापासुन ध्न्यवाद..