कृषीमंत्री-क्रिझ सोडताना...

काही शेतकरी नुकतेच(२ वर्षापूर्वी) मनमोहनसिंगांना भेटले.हात जोडून ते पंतप्रधानांना म्हणाले " मालक, आम्हाला नोकरी द्या, शेती नकोच,........ जगलो वाचलो तर शेती करता येईल". शेतकऱ्यांनी शेतीविषयी एक चक्कार शब्दही काढला नाही. हि उदाहरणे शेती कोमात चालल्याची नाहियेत तर काय आहे? त्याचा संबंध खचितच वीजखात्याशी आणि क्रुषिखात्याशी आहे हे तर सहज समजायला हवेच. शेतकऱ्यांच्या आत्महतेचा दोष मग ह्यांना नाही द्यायचा तर कुणाला द्यायचा? त्या शेतकऱ्यांच्या झोपडीत शिरून त्यांची चौकशी करावी असेही, ह्या मंत्र्यांना कधी वाटले नाही. पंतप्रधान विदर्भात आले तेव्हा त्यांच्या मागून हे विदर्भात आले....

सरदार वल्लभभाई पटेल मान्सून आला की प्रत्येक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना रात्री बेरात्री फोन करून विचारायचे, "पावूस व्यवस्थित आहे का? पेरणी झाली का? "... आणि विशेष म्हणजे ते गृहमंत्री होते, कृषीमंत्री नव्हेते... वल्लभभाईंची ती तळमळ कृषीमंत्र्यांमध्ये कधी दिसलीच नाही.

२५ वर्षापूर्वी देशातील ७०% शेतकरी असलेल्या जनतेचा देशाच्या जी.डी. पी. मध्ये वाटा होता ६०%...आणि आज देशातील ६५% जनता शेतीवर अवलंबून असताना देशाच्या जी.डी.पी. मध्ये शेतीच वाटा २५% पेक्षाही कमी आहे, हे मंत्र्यांची खात्यावर किती आणि कशी पकड आहे हेच तर दाखवतेय... काय परफॉरमंस आहे राव? ६% नि शेतकऱ्यानं कर्ज देतो म्हणाला होतात? कुठे आहे ते? विसरला वाटत? साहेब अजूनही महाराष्टातिल ५५% शेतकऱ्यांवर पर हेड सरासरी १६००० रु कर्ज आहे,.. महागडी औषधे, बी-बियांनी, खते, कीटकनाशके, मशागत खर्च मिळून सरासरी ११००० रु उत्पन्न खर्च, आणि उत्पन्न केवळ १५०००, कसं सुधारायचं आम्ही?

लवकरच तुम्ही पायउतार व्हाल, पण शेतकऱ्यांच्या मानगुटी वरील ह्या अनुत्तरीत प्रश्नांचं काय? ....

ह्या इनिंगची पुरी मैच संपेपर्यंत आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, अगदी एकटक..... मात्र स्कोअर बोर्ड काही हललाच नाहि....

आता क्रिझ सोडण्यापुर्वी, जाता जाता एखांदा चोका-छक्का तरी मारा?
.
.
...सचिन, नारायनगाव, पुणे. 11 may 2009.

एका मावशीची आठवण.

जुलै १९९५ ला मी पुण्याच्या अभिनव कला मंदिरात प्रवेश घेतला... पहिल्यांदाच खेड्या-पाड्यातून उच्चभ्रू जगात आल्यावर आपला गावंढळ साधेपणा सतत आपल्या दरिद्री मनाला टोचत असतो, हिणवत असतो। माझ्याही अवस्था या नियमाच्या बाहेर नव्हती. पण त्याबद्दल मी कधीतरी लिहीलच...
.
हा,॥ तर कॉलेजचा प्रवेश घेतला, पण हॉस्टेलाची मात्र सोय होत नव्हती। रिक्षावाल्यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे विद्यार्थी गुह, मराठा हॉस्टेल, अशी दोन चार स्वस्तातील हॉस्टेल पाहिली पण कुठेही सोय झाली नाही. थकलो होतो त्यापेक्षा निराश च जास्त झालो होतो...
शेवटी मी, आई, आणि दादा तिघांनीही खडकवासला गाठला। मामानं "आत्माराम शंकर नलावडे (गुरुजी)" यांच्या नावे एक चिट्टी लिहून दिली होती. "मुलाची वसतिगृहात सोय होईपर्यंत २-३ दिवस तुमच्याकडे ठेवावे. " दादांनी वर्गावर्गात जाऊन नलावडे गुरुजी कोण असी विचारपूस केली, आई तसी त्यांना पुसटसी ओळखायची. दादांनी त्रयस्थासारखी निमुटपने फक्त चिट्ठी पुढे केली. (ओळख नसतानाही "मुलाला ठेवा" अशी विनंती करायलाही त्यांना मुलासाठी कमीपणा वाटला नसता, तरीही चिट्टी मुळे आपलं काम सोपं होईल म्हणून ते बोलले नसावेत. )
गुरुजी पडवीत उभे राहून चिट्टी वाचत होते आणि आई, दादा मूकपणाने त्यांच्याकडे थकलेल्या आशेने पाहत होते। आई-दादांकडे पाहताना मी मात्र केविलवाणा झालो होतो. दादा काही बोलणार नव्हते, आईनेच गुरुजींना ति व इंदुबाई (गुरुजींची बायको) यांच्यातील नात्याची ओळख सांगावी आणि विनंती करावी असे सांगून ठेवलेले होतेच. पण तेही सांगण्याची गरज नव्हती, कारण काकांनी आनंदाने चालेल म्हणत मान हालविली होती. वर्ग सोडून ते आम्हाला घरी घेऊनही गेले. तिथेच चिऊ भेटली.
.
नाण्देडफाट्याच्या शाळेत जाऊन लगेच तिघेही इंदुबाईंनां भेटलो। आईला पाहून तिला अनपेक्षित आनण्द झाला. आईला त्या "बाई", तर आई तिला "इंदू मावशी" म्हणून हाक मारायची॥ कुठल्यातरी नात्यानं आइची ती मावशी लागायची... मीही मावशीच म्हणू लागलो. मी तिथे राहणार आहे म्हटल्यावरही तो आनंद तसाच टिकून होता, किंबहुना तिला माझं प्रचंड कौतुकच वाटत होतं. त्याच दिवशी तिनं साऱ्या शाळेत मला कितीतरी कौतुकानं मिरवलं होतं, अगदी हेडमास्तरापर्यंत. ..

माझ्या चेहऱ्यावरून आणि डोक्यावरून फिरणारा तिचा तळवा मज आई जैसाच वाटायचा॥ आयुष्यात आक्समातपणे भेटूनही नीस्वार्थपने मदत करणारी नितळ माणसे मिळणे म्हणजे सुदैवच। मावशी-आणि काका मला तसेच होते.
.
संध्याकाळी मावशीचा मुलगा मनू भेटला, मनु आणि चिवुताई बद्दल कधितरी वेगळं लिहिलच...
.
२-३ दिवसानंतर, पुणे विद्यार्थी गृहात सोय झाली पण काका-मावशीने निक्षून सांगितले की आम्ही याला इथेच ठेवणार, अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळू याला. दादांना वाटायचे हॉस्टेलच बरे उगाच अतिपरिचयात अवज्ञा व्हायची आणि मुलाचा नंतर राग-राग व्हायचा। दादा ऐकत नाहीत म्हटल्यावर काकांनी शेवटी "भेदाचं" शश्त्र काढतं म्हणाले " ठीक आहे, शेवटी तुमचा मुलगा आहे, काय करायचे आहे ते करा पण आम्हांस वाटते इथेच ठेवा। "............. दादांना यापुढे काय बोलावे हे कळेनासे झाले। दोन वर्षे मी तिथे राहिलो पण शब्दच काय पण रागीट नजरेनंही मावशीनं कधी माझ्या कडे पाहिलेलं मला आठवत नाही।
.
सकाळी कालेज असायचे। मला तेच सहाला उठवायचे, पण त्याअगोदर माझ्यासाठी अंघोळीच गरम पानी बाथरुम मध्ये काढलेलं असायचे. अंघोळ होईपर्यंत किचन ओट्यावर चहा, बिस्किटे ठेवून काका बाहेर अंगण झाडायला गेलेले असायचे. ज्या ज्या दिवशी घरात बिस्किटे नसायची त्या त्या दिवसी चहा च्या कपाशेजारी दहाची नोट न चुकता ठेवायचे. माझ्या नकळतच सारं काही निमुटपने व्हायचं, जाताना "जाऊ का काका? " एवढाच प्रातःसंवाद व्हायचा...
.
मावशीला माझ्या चित्रकलेचं खास अप्रूप होतं, शेजारी, सारे नातेवाईक आणि घरी येणाऱ्या प्रत्येकास ति आवर्जून माझा उल्लेख करायची। चित्रे दाखवायची. माझ्या नावानंतर "बाळ" हे विशेषण ति बऱ्याचदा वापरायची, अगदी मायेच्या मायेनं. कपड्यानं पासून ते कुठली भाजी करू इतपर्यंत ती मला सामावून घ्यायची. माझ्याकडून कधी- कुठली अपेक्षा मावशीनं ठेवली नव्हती. माझ्या वागण्या-बोलण्यालाही कधी नावं ठेवली नाहीत. कसं वागावं, काय बोलावं ह्याचेही डोस कधी दिले नाहीत. जीवनाचं कुठलंही मामुलीसं तत्त्वज्ञानही तिने मला ऐकविले नाही. पण एखाद्याला जीव कसा लावावा हे मी तिच्या प्रत्येक वागण्यातून, तिच्यानकळत पाहत होतो, अनुभवत होतो. माझ्यावर तिचे अगणित उपकार आजही आहेत, पण तिनं त्याचं प्रदर्शन कधीच केलं नाही. उपकाराच्या भावनेचा हलकासा स्पर्श देखिल तिला कधी शिवलाच नाही. तिच्या साधेपणानं ह्या साऱ्या "मी" पणाच्या दुर्गुणांवर तिच्याही नकळतपणे मात केली होती.
.
मनू आणि चिवुताई ह्या स्वतःच मुलांवर जे तिचे उपजत प्रेम होते तिच सहजता तिने माझ्याबाबतीतही ठेवली होती, सहजतेतून आम्हाला आम्ही सुरक्षित असल्याचा भास व्हायचा। ती सूर्यासारखी नव्हतीच, पण जमेल तेवढा भाग प्रकाशमान करण्यासाठी मिणमिणतं राहणारी पणती मात्र नक्की होती.
.
अशी लोभस मानसं सध्या भेटतच नाहीत, आयुष्यातील कैक मित्रांना मी मावशी बद्दल आवर्जून आत्मीयतेने सांगायचो, अजूनही सांगतो। यापुढेही नक्की सांगत राहिला...
.
.
.
मावशीच्या देहावर पुष्पहार अर्पण करून तिचे शेवटचे अंतदर्शन घेताना, तिच्या हळव्या तळव्यांच्या प्रेमळ स्पर्शाभास होवून डोळ्यांच्या कडा पुन्हा आपसूक ओलावल्या......

.......
सचिन, नारायणगाव, पुणे, ९/५/२००९

शिवरायांच्या यशाचे श्रेय

"ब्राह्मन नसते तर स्वराज्य मिळाले असते काय, आणि एकतरी हिंदु राजा झाल असता काय?" असे विचार एका मित्राने (अर्थात ब्राह्मण) मांडले। त्यास उत्तर देताना....
.
शिवरायांच्या यशाचे श्रेय तर्कशास्त्र द्र्य्ष्ट्या कुणाला द्यावयाचे झाले तर ते शिवरायांच्या स्वतःच्या कल्पकतेला, धैर्याला, संयमाला आणि त्याबरोबरिने असलेल्या उत्कट इच्छेलाच द्यावे लागेल॥ आई-वडील, गुरू, मार्गदशक, संत, देव, दैव, मराठे, मावळे, ब्राह्मण, मुसलमान सरदार, सैन्य गड, किल्ले, सह्यांद्री ह्यांचाही त्यात सहभाग होता। पण म्हणून ब्राहमण किंवा अमुक अमुक नसते तर स्वराज्य मिळाले नसते असे मानणे म्हणजे मानणाराचा फुसका अहंभाव आहे..
.
एकलव्य आणि कर्णाकडे तरी कुठे होते गुरू, राजपद आणि पैसा? पण तरीही ते शून्यांतून उभे राहिले होतेच ना? विजिगिषू मन असेल तर गड, किल्ले सोडा मानसे देखिल तयार करता येतात..
ब्राहमण नाहीत म्हणून स्वराज्याचे काम थांबले असते असे आपणास वाटतेच कसे॥? स्वराज्य म्हणजे काय सत्यनारायण होता की काय?..
.
शून्य असलेले हेरखाते आणि सागरी आरमार जर महाराज उभारू शकत होते तर "ब्राह्मणी डोकी" तैयार करणे कितीसे अवघड होते? उगाच "सामूहिक मीपणाचा" चा भाव धरणे चुकीचे आहे॥ मी म्हणेन जर ब्राहमानानी राज्य आणि राजकारणात सहभाग घेतला नसता तर त्यांच्या उपजिवेकिचे दुसरे साधन ते काय राहिले असते? त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असती..
.
। ब्राहमणच काय पण क्षुद्राति-क्षुद्र समाजाचाही सहभाग होता हे अगदी मान्य आहे॥ अगदी प्रामाणिक, निष्टापुर्ण सहभाग होता,.. पण म्हणून "फक्त" ब्राहमण होते म्हनून राजे होते हे फारच एकलांगी आणि विषारी विधान आहे..
.
.... कुठे अनंतात विलीन झाला असाल तेथून थोडा वेळ काढून या... आणि माफी मागून हे विष पसरविणे थांबवा..

शापिताचे मरण अटळ.

गेले दोन आठवडे निरस झालेलं रूटीन आजपासून परत पूर्वीसारखं आणि पुन्हा (अर्थात माझ्यामनासारखं) सेट होणार होतं ... मी जाम खूश होतो.
.
बातम्यांचा मी जाम शोकिन.. येन निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात माझा टीव्ही कर्णाच्या शापित रथासारखा चालेनासा (निकामी) झाला होता॥ हो हो शापितच झाला होता टीव्ही...
.
ऑफिस आणि रात्रीची झोप सोडून शिल्लक राहिलेला सारा वेळ लक्षभेद टीव्हीचाच करायचो। अगदी जेवताना देखिल लक्षभेद चुकायचा नाही॥ आपल्या पेक्षा दुसऱ्याच कुठल्यातरी भौतिक वस्तूकडे ध्यान लागलंय आणि आपल्याकडे "दुर्लक्ष" होतोय म्हटल्यावर बायकोने त्र्याग्याच्या अभंगाबरोबरिने टाळ कुटणे चालविलेले होतेच.. अधून मधून टीव्हीमुळे आम्हा-दोघात घंटानादही व्हायचा आणि दोन-दोन दिवस निनादत राहायचा.. तरीही मी काही तीवाही कडे पाठ फिरवत नव्हतो... परिणामतः तिने आपला मोर्चा तिच्याकडेच(टिव्हि) वळविला. तो बंद पडावा, फुटावा, त्याला मुंग्या याव्यात असले शिव्या-शाप ती टिव्हिस देऊ लागली... आणि काय आश्चर्य टिव्हिचा एसएमपीएस जळाला आणि टिव्हि बंद पडला... एसएमपीएस नाही तर पुरं कीट जळल्याच मेकॅनिक ने सांगितल्यावर शाप किती मनःपूर्वक आणि अंतःकरणाच्या तळापासून दिले असावेत याचा अंदाज आलाच... मज वेड्याला शेवटी नव्या टिव्हिची सोय करावी लागलि.

.
कुठल्याश्या देशात म्हणे झाड तोडायचे असेल तर त्यास तोडत नाहीत तर सारे गाववाले त्या झाडाभोवती गोळा होतात आणि त्यास शिव्यांची लाखोळि वाहतात, आणि ते शापित झाड झिरून झिरून जळून जाते...
.
सत्यता मनोमन पटली.