वैदिक यज्ञबळी

महाराजा बळी ने यज्ञ केले होते, म्हंजे तोही वैदिकच होता. इतर असुरांप्रमाणे तोही शिवाचा उपासकच होता. आता महाराजा असलेल्या बळीला यज्ञ बळजबरीने "करायला" लावले हे म्हणणे कितीसे पटू शकते....वैदिक लोकांनी सांगितले आणि पटत नसतानाही बळिराजेने ते एकले असे म्हणायचे आहे काय? महाराजा पेक्षा त्याकाळचे वैदिक उपासक मोठे होते काय?.


आणि हो, यज्ञात प्राण्यांची आहुती द्या, असे नसून आपण जे काही अन्न म्हणून भक्षण करतो त्यातला काही भाग देवासही द्या हि संकल्पना आहे ति.
रानटी अवस्थेत राहणाऱ्या समाजाचे सिव्हिलायझेशन करण्याची ती प्रक्रिया होती. नरभक्षण करणाऱ्या समाजाला हळूहळू वनस्पती भक्षणाकडे आणण्याची ति प्रक्रिया होती. जेव्हा एक मानव दुसऱ्या मानवाचे भक्षण करितं होता, तेव्हा तुम्ही त्याला जाऊन "आज पासून माणसे खायचे सोडून वनस्पती खा" असे एकदम म्हणाल तर तो ऐकेल काय?

नरभक्षणाकडुन प्राणी भक्षणाकडे, त्यातही नंतर ठराविक प्राणी खाऊ नका, त्याहिपुढे जाऊन मग ठराविक काळात मांस खावु नका, आणि नंतर वनस्पती खा असे हे रानटी अवस्थेतून नागरीकरणाकडे आणण्याची प्रकिया फार विचारपूर्वक वैदिक ऋषींनी राबविली होती. (ज्या प्राण्यांची संख्या कमी होती, जे उपयुक्त आहेत ते न खाण्यास सांगितले आहे. ज्या विषव्रुत्तिय प्रदेशात हरणे जास्त होती, वनस्पतीसही जी नुकसानकारक होती ती खावीत, त्यांचीच मृगया (शिकार) ) करा. (शिकार करणे, यातही मृग = हरिण, या = जाणे, घालविणे, असेच आहे). ह्यात ज्या हरणाची काहीही चूक नसतानाही मृगया केली जायची, इतर प्राण्यांचा जीव वाचावा म्हणून हा कठोर निर्णयही त्यावेळी फार विचारपूर्वक घेण्यात आला.. त्या हरणांची क्षमाही मागितली जाते, यज्ञाच्या वेळी हरणाच्या कातड्यावर बसून यज्ञ केला जायचा की ज्या मागे हि भावना होती की ह्या यज्ञाचे पुण्य त्याच्या मृतात्म्यासही मिळो. हवन म्हणून नरबळी, प्राणी बळी सोडून आज यज्ञात तीळ, जवस, गहू, इ. वाहिले जाते हे पाहवे... थोडक्यात काय तर जे तुम्ही भक्षण कराल तेच देवासहि अग्नीमार्फत अर्पण करा हेच जे सांगितले होते ते चूक नव्हतेच, हे ध्यानी घ्यावे.

बाकी , चंद्रावर तेच गेले, मंगळावर तेच गेले, इंग्रजांशी संधान त्यांनीच बांधले, तेच शिकले, तेच पुढे गेले, त्यांनी क्षत्रिय राजांना मांडलिक बनविले, त्यांनीच मुसलमानांची भीती घातली हे सगळे आरोप आजतरी १००% निरर्थक आहेत... आणि ह्या आरोपाने काहीही रचनात्मक बदल होणार नाही हे आपणही खास जाणता... तरीही हेच मुद्दे वारंवार का मांडले जातात हेच मला समजत नाही.