खासदारकीच व्होंटिंग


खासदारकीच व्होंटिंग उद्या होणार होतं।

.
रात्रीचे १०।३० वाजले असतानाही, मी पुण्याहून आमच्या गर्भवती सौभाग्यवतीसह गावाला जायला निघालो, राजगुरुनगर मधून विकास लाही घेतला. शेवटी हक्काच्या ३ मतांचा प्रश्न होता.

.
रात्रीचे ११.०० वाजताहेत न वाजताहेत तोच मोबाईल खणानला,.. गावातून मोठ्या भावाचा फोन.
हालो..
आरं.. कुठं पर्यंत आलाय ?
राजगुरुनगर मध्ये आहे, का रे?
आरे तिकडे भोसरी आणि हडपसर मधी ती लोकं १५००-२००० रु मतांमागे वाटायला लागलेत असं म्हणत्यात? जरा चौकशी कर आन लग्गेच फोन मार आम्हाला?
मीही भोसरिच्या स्थानिक मित्रांना फोन मारले, बातमीला दुजोरा मिळाला, आन आमची चलबिचल चालू झाली।

.
रस्त्याने कैक ठिकाणी स्कारपिओ गाड्या आणि त्यांच्या आडोशाला चाललेल्या वाटाघाटी दिसल्या. रात्री १२.३० ला गावात पोहचलो, कार्यकर्ते कट्यावर मतफोडा-फोडी टाळण्यासाठी पहारा देतच होते. मांगवाडा, महारवाडा असल्या वस्त्यांकडे जरा बारकाईने ध्यान द्यावे लागते... नाहीतरी तसेही ते आमच्या बाजूने चालत नाहीतच.. जिकडून पैसा तिकडं उदो उदो हे त्यांचं ठरलेलं. आन आमच्या कडे त्याचा (पेश्यांच्या) सदैव वानवाच.
रात्री दोन सव्वा दोन पर्यंत जागून सकाळी गावात हजर... आम्हाला बूथ टाकण्यासाठी ४००० रु तर विरोधकांना त्यांच्या उमेदवाराकडून १०००० रु मिळालेले. पेश्यांसाठी काम करणारे आम्ही नव्हतोच. नेहमीप्रमाणे उत्फुर्त पणे कामाला लागणारी आमची टीम जमली होती.. स्कार्पिओ, बोलेरो, व्हैन, टु व्हिलर जमेल त्या गाडीवरून वस्त्या-वस्त्यांवरून मतदार गोळा करून बूथवर आणून सोडायचा धडाका चालू झाला... म्हाताऱ्यांना ४-४ वेळा कुठलं बटणं दाबायचं (आणि कुठलं चुकूनही दाबायचं नाही) हे काळजीनं प्रत्येक जणं सांगायचाच.... गायकवाड मळा, धनवाट, झोपडीमळा, खंडागले मळा, थोरात मळा, गावठाण, कधी कधी एका-एका मतासाठी दहा-वीस किलोमीटरची मजल मारायला लागायची तरीही मागे हटायचो नाही... त्यांचा पोलिंग एजंट मतदान केंद्रात काही गडबड करतोय हे कळताच आम्ही सारे तिकडे धावलो.. जाम बाचाभाची झाली. वारंवार केंद्रात घुसून ढवळाढवळ करू पाहणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर द्यायचो. मतदान केंद्रातील रांगेत मत फोडाफोडी होवू नये म्हणून दोन-तीन जन २०-२५ मिनिटांच्या अंतरानं मतदानाला जायचो... ४. ३० वाजता मी मतदान केले. ५ वाजेपर्यंत जास्तीत जास्त म्हणजे ६६ टक्के मतदान करून घ्यायला आम्ही यशस्वी झालो.. मतपेट्या शिलबंद झाल्या "भारत सरकार" च्या महिंद्रा मार्शल मधून पुण्याकडे पार्सल झाल्या... आणि आम्ही निकालापर्यंत (१६ मे)अगदी निर्धास्त झालो.. मुक्ताई च्या समोर छोटी खानी सभा घेऊन साऱ्यांचे आभार प्रदर्शन झाले... साऱ्यांना "झटून" काम केल्याची पावती मिळाली.... आपलाच उमेदवार येणार, अशी साऱ्यांनी अभिमानी अलिखित ग्वाही दिली...
.
सभा संपते ना संपते तोच हळूहळू "थकल्याची" जाणीव झाली.


सचिन, नारायनगाव, पुणे, २३/४/२००९.
फोटो सोजन्य - गुगल. ईमेजेस मधून

महामानवाची जयंती

काल महामानवाची जयंती झाली।।
.
तत्कालीन समाजाने लाथाडलेल्या पतितांना सामाजिक विषमते विरुद्ध अखेरपर्यंत लढत देत धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय उन्नती साठी आकाशपाताळ एक करणाऱ्या "जीवनाचा" हा जन्म दिन। आंबेडकरांच्या शब्दरुपी असलेल्या जीवनपटावर, विचारांवर, विद्वत्तेवर, व्यासंगावर, बुद्धिजिवीपनावर, त्याचबरोबर निर्दोष असूनही जन्मदोष देत मिळालेल्या विटंबनेवरून आठवणींचा प्रकाशझोत फिरवण्याचा हा दिवस.... पण प्रत्यक्षात संध्याकाळी नशेत तर्र होवून नाचणारी अनुयायी मंडळी पाहिली आणि हि "रिपब्लिकन चळवळ" नेमकी उलट दिशेने चालली आहे ह्याची खात्री झाली
.
सामान्य अनुयायांबद्दल चर्चा सध्या बाजूला ठेवूयात, पण त्यांचे नेते, पुढारी आणि बाबासाहेबांचे वंशज म्हणविणाऱ्यांनीही बाबासाहेबांच्या फक्त नावाचा वापर करीत, बाबासाहेबांच्याच विचाराला, हेतूला स्वार्थ, अभिमान आणि मान-मर्यादे पोटी कधी नकळत तर कधी जाणुंबुजून बगल दिली। आरकक्षनाच्या कुबड्या घेतलेल्या ह्या धडधाकट समाजाला या नेत्यांनी खरेखुरे अपंग बनविले, गेल्या ५७-५८ वर्षात त्यांना घटनेतील आरक्षणाचा उपयोग त्यांच्या समाजा साठी करता आला नाही. किंबहुना समाज शिकला सवरला तर तो आपसूकच आपल्याला दूर ढकलून देईल हे कदाचित ते जाणत असावेत।
.
गरिबीवर मात करत, दिव्याखाली रात्रोंदिन अभ्यास करत बॅरिस्टर होणाऱ्या स्वतःच्या नेत्याचं उदाहरणही हा समाज विसरून गेला. असे असताना मग नुसती :जयंती साजरी करण्यात काय अर्थ राहतो?।
.
१९५७ ला स्थापन झालेला रिपब्लिकन १९५८ ला लगेच फुटला। रुपवते, खोब्रागडे, गायकवाड, गवई, आंबेडकर, आठवले, कवाडे, ढसाळ पासून ते मायावती पर्यंत कैक पक्ष, गट, तट पडले. मतांसाठी कांग्रेस, राष्टवादिनेही रिपब्लिकनांचा पुरेपूर वापर करून घेतला. एक खासदारकी मिळविण्यासाठी सारा पक्ष आणि विचार दोन्ही कांग्रेसच्या दावणीला बांधणारे आठवले, गवई पाहिले की हे बाबासाहेबांच्या विचारांचे रखवाले आहेत की वापरकर्ते आहेत हे शहाण्यास आपसूक समजते॥
.
दलितांचा एक रिपब्लिकन पक्ष असावा हे बाबासाहेबांच्या स्वप्न त्यांच्या जाण्यानंतर लगेचच त्यांच्याच अनुयायांनी तुकडे तुकडे करून टाकले...

"ना रा य ण गां व"

"ना रा य ण गां व" असं लांबचक म्हणायच्यापेक्षा "नाऱ्यांगाव" किंवा त्यातहि सुधारित आव्रुत्ति म्हणजे "नारांगाव".आठवडी बाजारालायेणाऱ्या साऱ्या जुन्नरिंच्या तोंडवळनी पडलेलं. त्याचा प्रत्यय दर शनिवारि चांगलाच येतो..पुण्यात नव्यानेच आलेला एकजण दत्त दर्शनासाठि आपल्या बाईक वर चक्क ८० किलोमीटरचा प्रवास करुन या नाऱ्यांगावला आला तेव्हा त्या बेट्याला "नारायणपुर" आणि "नाऱ्यांगाव" हयातला फरक काय तो आयुष्यभरासाठि कळला. "निरा प्यायची ईच्छा आन चुकुन ताडिच्या दुकानात घुसल्यासारखी ससेहोलपट झाली" अशी भावना त्या सभ्य म्हणवुन घेणार्या माणसाची?.आता नारायणगड जवळ आहे म्हणुन "नारायणगाव" असा माझा समज आहे, पण त्याहिपेक्षा "गणपीर" डोंगर जास्त जवळ असताना "नारायणगड"च का? हे मला अजुनही न सुटलेल कोड आहे..गावाला वेढा देवुन जाणारी मीना नदि म्हण्जे "घाण" वाहुन नेण्यासाठि व लोकांनी "घाण" करण्यासाठि आहे ह्याचा प्रत्यय नदिच्या कडेने हिंडल्यानंतरच येतो. प्रत्येक गावाला गावकुशीचा रस्ता असतो ज्याला सुशिक्षित "बायपास" व गावकरी "गोखाडिचा रस्ता" म्हणतात तो नारांगावात नेमका कुठे आहे ह्याचा मात्र गोंधळ आहे.
पुणे-नासिक हायवेवर असण्याचा बिनचुक फायदा उचलत हया गावाने तालुक्याच्या गावावरहि मात केलि. अगदि कानामागुन येवुन तिखट झालयाप्रमाणे, (तशी इथली मिसळहि तिखटच असते बरका) पण......... . वर्षानुवर्षे अगदि रंगरुपानं काडीमात्रहि न बदलले इथलं एस.टि स्टॅडं म्हण्जे मात्र करमणुकिचाच विषय. त्यातल्या "शेवंता थिएटर्स" च्या बोर्डवर कुठलंया पिक्चरचं (कि हिरोईनच) पोस्टर लागलय ह्यावर पोरांची विषेश नजर. (मुंलिबद्दल आपल्या काय माहित नाहि बुवा) शेजारच्या लिंबाच्या जुनाट झाडांखाली लक्ष्मीनारायण, अलंकार क्लाथ सेंटर किंवा प्रकाशचे माक्याचे तेल असले कसले तरी बोर्ड हमखास लागलेले असतातच, त्यांच्या खालि सावलिपाहुन बसायला जावं तर वर टपुनच बसलेल्या कावळ्यानं त्याचा प्रसाद दिलाच. . . सगळं काही जसंच्या तस्सच!!!! . . . ह्या सगळ्यांची त्यांच्यात्यांच्यातच विचित्र "मॅच्युअल डिपेंडंसी" असावी (नव्हे तर आहेच) अशी माझी खात्रीच आहे..उन्हाळ्यातिल खास आकर्षण म्हण्जे तमाशाच्या राव्हट्या. . . मंगला, रघुवीर(लोक याला रघ्या म्हण्त्यात), पांडुरंग मुळे, भिका-भिमा,तांबे, महाडिक,ढवळपुरिकर, आररर र नुसत्या ४०-५० एका चढ एक बाऱ्या. .ह्या रघ्याच्या तमाशात अमुक अमुक नाचनारि आहे ना ती गेल्या वर्षि नित्या बनसोडेच्या फडात "मुंगळा-मुंगळा" या गाण्यावर धिंगाना करायचि. इतपर्यंत इंत्यंभुत माहिति असणारेही अनेक नगहि नारांगावातच सापडतिल. फडासाठि, लोककलेसाठि उभं आयुष्य कष्ट उपसणाऱ्या "विठाबाई भाउ मांग" हिला "नारायणंगावकर" असं उपपद अदरानं बहाल करणारि तमाशापंढरीहि हिच...
.
.जगप्रसिद्ध ओली भेळ"नाऱ्यांगाव" वाचल्यावर मला एका "अनोळखि नाऱ्यांगाववाल्यानं" नाऱ्यांगावची जगप्रसिद्ध ओली भेळ आणि मिसळि बद्दल लिहा असं सुचवल ....
.

आता हे सुचवणारा नक्किच अस्सल खादाड आन खाद्य शोकिन असावा असा माझा पक्का समज झाला कारन नारायणगावची भेळ "जगप्रसिद्ध आहे" हे मला त्याच्या कडुनच कळालं, . . . आन भेळीचि टेस्ट आन गावचा अभिमान एकदम डब्बलच झालयासारखा वाटला.
.
नारांयणगावचा तमाशा, टेलिस्कोप, दारुची फॅक्टरी, विठाबाई भाऊ मांग, रा.प.सबणिस, द्राक्षे असल्या गोष्टि प्रसिद्ध आहेत एवढच बुवा आपल्याला (मण्जे मला) माहित होतं....
....ह्या प्रसिद्ध गोष्टिंपैकि दारुची फॅक्टरी म्हन्जे जाम वैतागवाडी, गावाला जातोय म्हटल्यावर आमच्या मित्रांनी दोन चार प्रसिद्ध बाटल्या (भरलेल्या) आणण्याची विनंति केलि म्हणुन समजाच. म्हणुन आजकाल पुण्या-मुंबईला राहणारे (शहाणे) नारायणगावकर ह्या प्रसिद्धगोष्टिचा (बेवड्यां मित्रमंडळीं मधे) उल्लेख मुद्दामच टाळतात, अस निदर्शनास आलं आहे.
.
आता ह्या भेळिबद्दल कुण्या खादाडंन वाचलं आन तुम्हाला ती आणण्याची विनंति केलिच तर मात्र माझ्या नावाने खडे न फोडता "त्या सुचवणाराच्या" नावाने फोडले तर बरे होईल...
.

कॉलेजच्या पोरी?.
.
त्या कॉलेजात काय (काय) करतात हे नेमकं माहित नाहि... पन एस.टि स्टँडमध्ये आल्यावर प्रत्येकजन (त्यातल्यात्यात पोरांचा ... ) अगदि ट्वाळ आन शहाणे(समजणारे) वीरही चोकशीच्या खिडकी कडे बेमालुमपणे टक्क लावुन असतात. काहि विर तर अर्जुनासारख़े एकाच वेळि अनेक नजरेचे बाण त्या खिडकिच्या देशेने सोडत असतात. ह्या साऱ्या "सुंदऱ्याचा मेळा" त्या "चोकशी खिडकिपाशीच" का भरतो? आन तो हि दररोज (रविवार सोडुन)?.
.
त्या खिडकिवाल्या कंडडाक्टरची आन पोरींची "तोंडओळख" नक्किच झालि असणार.... मग त्याच्याकडेच " हेमा आलि का हो, गुड्डि गेलि का हो? कुणाबरोबर गेलि? अशी चोकशी करायला काय हरकत आहे असं वारंवार वाटायचं .... नाहितरी "आळेफाटा गेलि का हो? खोडद किति वाजता आहे? अस्स काहि त्याला विचारलकि तो साला हमखास "ययील आता, वाट पहा थोडि" असली काहितरि छा छु उत्तर देतोच ना?.
.
मुंग्या जश्या तोंड जवळ आनुन (तोंडात तोंड खुपसुन) संदेश देवाण घेवाण करतात ना, हुबेहुब त्याप्रमाणं गठ्या-गठ्यानं यांचहि च्याव-म्याव चालु असतं... त्यातल्या ४-५ जणी मग एकदम " खि. खी.$ खी,..... बावळटच आहे मेला$ ...सगळे तस्सेच$.. येडपाटच्य. ... सँडल पाहिलि का?... असंल काहितरि बिच्चाऱ्या जवळुन जाणाऱ्या पोरांना त्यांच्या पाठिमागे (तोंडावरदेखिल) ऐकु येईल अश्या आवाजात खडसावतात.... मुद्दाम!
.
तश्या ईथल्या पोरी चवळिच्या शेंगेसारख्याच बऱ्यापैकी सडपातळ असतात हे माझं निरिक्षण, जितक्या अक्कडबाज तितक्याच लहरि ... मुलांकडं ढुंकुनही पाहत नाहीत (असा आव आणण्याचा निष्फळ प्रयत्न करतात). . आन एखाद्यांवर फिदा झाल्यावर त्याच्यावरुन जीव ओवाळुन(एकदाच) टाकायलाही तयार...... दिसायलाही चिक्स, पन गावाकडचा स्पेशल लुकहि त्यात मिसळलेला... चिंगुपणातर यांच्या नसानसात भरलेला.... आपन बळेच बोलण्याचा प्रयत्न केला तरी "हा, हुं, नाय, नको" च्या पुढे बोलतिल तर शप्पथ!! .. फुक्कटच्या बोलण्यातहि चिंगुपना का करतात हे देवलाहि माहित नसावे कदाचित?

GMRT, Narayangaon

GMRT Khodad, located @ 19deg 5’ NORTH, & 74deg 2’ EAST. Its just 8Km from Narayangaon.
.
Giant Meter wave Radio Telescopes are used to collect the wave/radio signals that our universe produces due to graceful substance, stars, satellites, galaxies & so many other unidentified components which r lying in the space.

Total 30 Antennas/reflectors of ~45 m Diameter are positioned in shape of “Y” can revolve in angular direction. The Antenna is having fixed relation with another antenna of a space satellite revolving around Earth. Space satellite orbits @ the same speed that of earth and hence relation betwn both remains stationary with respect to the telescope antenna.
.
All r installed on cements frustruted conical shaped towers & welded structure, using advanced technology.
.
All 30 antennas r connected to each other & LAB using fiber optics cable. GMRT, TIFR (Tata Institute of Fundamental Research) & NCRA (National Centre for Radio Astrophysics) all three related institutes r connected same way.Different Frequency linearly polarized feeds like 50, 150, 210, 325, 610 & 1420 MHz has been utilized on these antennas along with frequency synthesizers.(normal frq for current is just 50Hz)....... Astronomical Observations of space objects can be done @ these freq. & we can get images upto 500:1, 1000:1 scale. Dat means 500 time enlargement & clarity can be possible.
.
GMRT Khodad captures raw data, converts & stores it, process data for detailing. All this is done by using software AIPS. . . AIPS the Astronomical Image Processing System software. Its main use is to standardize, calibrate and display radio astronomical data. Its like a TV Window & displays data or images @ various stages for editing/measuring.
.
There was a interference between GMRTs band frq & FM & Vividhbharati radio frequencies, which effected the projects outcome. I think this problems is resolved.
.
. due to rural area there is a lack of engineers & scientists.
.
As I remember this structure, band & polarization is designed & made by Bangalore based Raman Institute & research.



सचिन, नारायणंगाव २१/६/०७

शिवाजीराव आढळराव, शरद पवार आणि शिरुर लोकसभा.

आजचा "शिरूर" (पूर्वीचा खेड) लोकसभा मतदारसंघ म्हणजे शहाजीराजे भोसले याना दक्षिणेचा अदिलशाही कडून मिळालेला पुणे-सुपा परगणा होय. जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, भोसरी, शिरूर आणि हडपसर हे विधानसभा मतदार ह्याच्या अखत्यारीत येतात. ह्याच "जुन्नर प्रांती" महाराष्ट्राच्या महादेवाने, स्वराज्याच्या उषःकालाचा आरंभ करण्यासाठी १६३० ला अवतार घेतला होता......

ह्याच प्रांतात, दोन्ही काँग्रेसची परंपरागत मजबूत ताकद असतानाही, २००४ च्या लढाईत तो विक्रमी मताधिक्याने सेनेकडे खेचून आणण्याची किमया शिवाजी दादा आढळराव पाटलांनी वादळवाटेच्या झंझावाताप्रमाणेच केली.. हो झंझावातच म्हणावा लागेल याला.. जवळ फौजफाटा नसतानाही बजाजी बांदलाच्या हातून शिवरायांनी १६४४ साली रोहिडा जिंकून यशाची अजिंक्य मेढ जशी रोवली, तश्याच परिस्थितीत, "सेनाबळ" कमी असतानाही, आयुष्यातील पहिल्याच निवडणूकीत २००४ ला भगव्याची मुहूर्त मेढ खेड मध्ये रोवण्याचा पराक्रम आढळरावांनी करून दाखवला.... पुऱ्या आयुष्यातील पाहिलीच निवडणूक!!! तिही खासदारकीची?.....

"एकच वादा.... शिवाजीदादा" ची गर्जना करत जनता जनार्दनाने ह्या तोफेस गर्वाने खांद्यावर उचलून घेतले... आणि मग हि मुलूखमैदानी तोफ आढळपणे शिवनेरी वरून धडधडायला लागली... दिल्ली शिवनेरीच्या पल्ल्यात आली.!!! ग्रामीण प्रश्नांची बत्ती देत ह्या तोफेच्या जबड्यातून निघालेले तोफगोळे दिल्ली दरबारी पडू लागले... एक, दोन, तीन नव्हे तर.... तब्बल १२५१ तोफगोळे... १२५१ प्रश्न विचारून आढळरावांनी १४व्या लोकसभेचा उच्चांक केला... आणि अख्ख्या भारतवर्षातल्या साऱ्या खासदारांमध्ये दादा अव्वलस्थानी पोहचले...

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बैलगाडा शर्यत बंदी, ग्रामीण उद्योजकता, शेती व उत्पादन, गरीब निराधारांच पुनर्वसन, नदी जोड प्रकल्प, नदीच्या तळातील गाळ काढणे, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून केलेले कार्य, वाडी-वस्त्या पर्यंत पोहचण्याची पद्धत, गरजूंना अर्थसाहाय्य, खेड्यामध्येही शहरांच्या तोडीस तोड शिक्षणाची सुविधा, दुरध्वनी जोडणी, रस्ते, पाणी, पायाभूत सुविधा, अश्या कैक कामांची शृंखला चढत असतानाही दादा सामान्याच्या झोपडीतही डोकावायलाही कधी विसरले नाहीत, तेथूनच ते नागरिकांच्या हृदया पर्यंत अगदी अलगद हळुवार पोहचले....... शिवसेनेला त्यांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्रासाठी भक्कम पर्याय मिळाला....
२००९च्या उमेदवारीचा अश्वमेध आढळरावांनी केव्हाचं "शिरूर" मतदारसंघात सोडलाय,.. पण तो पकडण्या, थांबविण्या, आणि दादा विरुद्ध लढण्या कुणी हि धजवत नाही, कैक जनांना राष्टवादीने पुढे केले,... पण मतदारांची चाचणी, सर्व्हे केल्यानंतर साऱ्यांनी माघार घेतली...... कुणीच दादां विरुद्ध उभे राहण्यास धजवेना... उमेदवारच सापडेना?.. दबाव टाकून दादांना राष्ट्रवादी कडे खेचण्याचा डावही फोल ठरला.... शेवटी "आता एकच माणूस आढळरावांच्या विरोधात उभा राहू शकतो........ पवारसाहेबच!!... होय खाशा शरदराव पवार" असा सुर विरोधकांत निघू लागला..... आणि तो अगदी संयुक्तिकही होता... करणं " स्थानिक राजकीय दिवाळखोरी"

आपला मतदारसंघ पोरीला वारसाहक्काप्रमाणे "आंदण" दिल्यामुळे त्यांना "दुसरीकडे" घुसखोरी करावी लागणारच होती.... त्यासाठी त्यांनीही मोर्चा "शिरूर" कडे वळविण्यास तयारी दाखविली.... पण पवारसाहेब असो किंवा कुणीही असो,... घरचा उमेदवार आणि लादलेला उमेदवार हा फरक असतोच ना? समाजमनाचा विश्वास, जिव्हाळा, आदर, आधार, आशा आणि अभिमान जिंकलेल्या आढळरावांविरुद्ध लढताना पवारांनाही आपले पाय "शिरूर" मध्येच घट्ट रोवून ठेवावे लागतील.... "
महाराष्ट्रात इतरत्र त्यांना प्रचारासाठी फिरणे अवघड होईल...... आणि म्हणूनच आढळराव विरुद्ध पवार अशी लढाई झालीच तर आढळरावांचं जितकं नुकसान होईल त्यांपेक्षा जास्त नुकसान पवारांच्या राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात इतरत्र होईल... हे पवार साहेब जाणतंच असतील..... १६८०-१६८९ पर्यंत धर्मवीर संभाजीराजांनी औरंग्याला सतत ९ वर्षे एकट्या दख्खन मध्ये झुंजत ठेवले. त्याला इतरत्र ध्यान देण्यास वेळच मिळाला नाही, परिणामातः तिकडे उत्तरेत, पंजाब, राजस्थान, काश्मीर मध्ये त्याच्या हातून सत्ता गेली.... पवार इथेच शिरूर मध्ये अडकले तर राष्ट्रवादीचे इतरत्र काय होईल ?.... आणि कदाचित म्हणूनच, पवार साहेब हे बोलत नसले तरी शिरूर ऐवजी राजकीय दृष्ट्या जास्त सुरक्षित अश्या माढ्यात जाणे त्यांनी गुपचुप पसंत केले असावे. हाच आढळरावांच्या वर्चस्वाचा विजय आहे असे म्हटले पाहिजे... पवारांनी स्वतःसाठी शिरूर ची चाचपणीही केली, ३-४ सभाही केल्या, अंदाज घेतला आणि माढा मतदारसंघ स्वतःसाठी योग्य समजला... सेना-राष्ट्रवादी युती, पवार-उद्धव भेट हा सारा घटनाक्रम होत असताना, चार महिने हि राजकीय कुरघोडीची धूळवड चालू असतानाही आढळराव न डगमगता "राज्यसभा नाही, विधानसभाही नाही, मावळ मधूनही नाही, मी लढणार ति फक्त लोकसभाच, आणि तिही शिरूर मधूनच!!!" असे म्हणतं आढळ भूमिकेत राहिले.. परिणामातः आपसूकच हा सारा मतदारसंघ उमेदवाराऐवजी "मतदारानेच" ताब्यात घेऊन टाकला आहे. १५ व्या लोकसभेचा शिरूरचा खासदार कोण हे आपसूकच आणि अलिखितपणे ठरले आहे..

शिवाजीरावांच्या प्रचाराच्या फेऱ्या एव्हाना पूर्णं हि झाल्या असतील, अजून समोरचा उमेदवार ठरणे बाकीच आहे. उद्या कदाचित विलास लांडे, प्रकाश म्हस्के, पोपटराव गावडे किंवा दिलीप वळसे पाटीलही रणांगणात असतील,.. पण जो शिवाजीराव, पवारासारख्या मातब्बराशी लढायला डगमगत नव्हता, त्याच्या हिंमतीच एक बुरूज तरी यांना फोडता येईल काय हे विचार करायला लावणारे आहे?


सचिन, नारायणगाव, पुणे. २६/२/२००९
चित्रे - गुगल इमेजेस आणि विकिमेडिया. ओराजी मधून साभार.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्ते मागे एकच कारण आहे किंवा असेल असं मला वाटत नाही. फक्त उरावर कर्ज आहे या एकाच कारणासाठी आत्महत्या करण्याइतकी कुठलीच जनता लोचीपोची नक्कीच नसते.

कर्ज आहे, ते फेडण्याची इच्छा आणि हिंमतही आहे पण उत्पन्न अगदीच शून्य, हिच लाजिरवाणी, पण जीवघेणी यातना "आत्महत्ये" पर्यंत नेण्यास कारणीभूत असते. कर्जापेक्षा कमी उत्पन्न हेच मूळ कारण आहे.

शेतीतून सरासरी उत्पन्न १६००० रुपये, महागडी बी-बियाणे, खते, कीटकनाशके, यांचा खर्च सरासरी ११००० रुपये, शेतीची मशागत, पोटाची भुख, मुलां-मुलीच शिक्षण, हुंडा, लग्न, कसं भागणार ? मग घे कर्ज. ठेव जमिनी गहाण, यातच तो पुरता अडकतो.

मग सरकार पुढे येते आणि कमी व्याज दराच्या कर्जाचा फास्ट इफेक्टिव वेदनाशामक डोस देते. वर्तमानपत्रात भल्या हेर्डिंग मध्ये जाहीर करतात, चांगली व ताबडतोब उपाययोजना केले असा भास केला जातो, पण त्याचा उपयोग या गरीब शेतकऱ्यांना होतच नाही. कारण नियमा प्रमाणे "कमी दराचं" कर्ज घ्यायलाही जमिनी गहाणच ठेवाव्या लागतात, पण त्या तर पहिल्याच कर्जासाठी गहाण पडलेल्या असतात ना?.

सरकारच्या अश्या चिल्लर आणि भन्नाट फालतू योजनांचा फायदा मग फक्त ४-५% बागायतदार शेतकरी पुरेपूर करून किंवा करवून घेतात. मंत्री, संत्री मदतीचे "पॅकेज" जाहीर करतात, त्याचाही फायदा होत नाही, किंबहुना होणार नाही याचीच काळजी ह्या राजकारणी मंडळीकडून घेतली जाते अस कुणाला वाटलं तर त्या गैर ते काय? "पॅकेज" मधील जवळजवळ ६०% रक्कम तुम्ही फक्त सिंचनासाठी बाजूला ठेवत असाल तर होणाऱ्या आत्महत्या तत्काळ थांबूच शकत नाहीत. अरे खडकाळ रास्त्यावरून ओझे वाहता वाहता मरणाऱ्या बैलांच्या अंगावरील ओझं तत्काळ कमी करायचं सोडून, बैलाच्या भविष्यातील सोयीसाठी, खडकाळ रस्ता दुरुस्त करण्यात वेळ आणि पैसा वाया घालवला तर तो नक्की मरणारच. मरणाऱ्या शेतकऱ्यांचा डोक्यावरील कर्जाच ओझं कमी करायचं सोडून "सिंचना"च्यासाठी २/३ रक्कम राखून ठेवाल तर त्याचा तत्काळ उपयोग शून्यच ना?


चीन मधील शेतकऱ्यांना सगळ्या सोयी सवलती सह ०% व्याजाने कर्जे मिळते. आपली वाटचाल शून्य टक्क्यांकडे केव्हा होणार? ६%नी कर्ज देतो म्हणाले होते, मग किती जणांना ६%नी कर्ज भेटलंय ते कळेल का?. बांगलादेशाच्या अहमद साहेबांची यशस्वी "मायक्रोफायनांस" सारखी एखादी चांगली योजना राबवण्याचा विचार केव्हा करणार आपण? कर्जाचा डोंगर का वाढतोय?, तो कसा कमी करता येईल याचा विचार कधी होणार?

विदर्भातील आत्महत्यांचा आणि पर्यायानं शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन गेली २.५ वर्षे आपण काढलीयेत, पण अजूनही योग्य उपाय सापडलाय का? मरण पावलेल्या ७,७०० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा, त्यांच्या "त्या" निर्णयाचा त्यांच्या मागे राहिलेल्या कुटुबियांना,नातेवाईकांना काही फायदा तरी झालाय काय?

त्यांच्या आत्महत्या व्यर्थच गेल्या ना?.


"मरूनही काहीच फायदा होत नाही" हे कळल्यामुळे जेव्हा आत्महत्या थांबतील, तो दिवस मात्र कळस असेल सरकारच्या आणि आपल्याही . . . . ...निष्क्रियपणाचा आणि निर्लज्जपणाचाही.


.सचिन, नारायणगांव, पुणे.
रवि. २९/०४/२००७. ( चित्रे - गुगल इमेजेस मधून साभार.)